शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

चिंतातुर राज ठाकरे

By admin | Updated: December 28, 2016 02:45 IST

हाती फारसे काम उरले नाही म्हणून म्हणा किंवा येताजाता डाफरता यावे असे फारसे मनसैनिकच सेनेत राहिले नाहीत म्हणून म्हणा, सध्या राज ठाकरे आत्मरत होऊन विचार

हाती फारसे काम उरले नाही म्हणून म्हणा किंवा येताजाता डाफरता यावे असे फारसे मनसैनिकच सेनेत राहिले नाहीत म्हणून म्हणा, सध्या राज ठाकरे आत्मरत होऊन विचार करतेसे झालेले असावेत आणि त्यापायीच दोन गहन चिंतांनी त्यांचे मुखमंडल व्यापून टाकलेले दिसते. उभय चिंता महाराष्ट्राशी आणि त्यातही पुन्हा शिव छत्रपतींच्या संदर्भातील असल्याने या मुलखातील तमाम आया-बहिणींनी आणि बाप-बंधूंनी राज यांच्या चिंतांची चिंता करणे क्रमप्राप्त ठरते. पैकी पहिली चिंता म्हणजे अरबी समुद्रात छत्रपतींचे स्मारक उभे केल्याने महाराष्ट्रात शिवशाही कशी अवतरणार आणि दुसरी चिंता म्हणजे या स्मारकासाठी जे अमाप द्रव्य सांडावे लागणार ते कोठून येणार? यातील पहिल्या चिंतेला स्वानुभवाची आणि स्वयंअध्ययनाची जोड आहे. कारण या आधी महाराष्ट्रात जेव्हां युतीची सत्ता स्थापन झाली होती तेव्हां शिवशाही अवतरल्याच्या ज्या गर्जना मातोश्रीवरुन केल्या जात होत्या, त्या गर्जनांमध्ये एक आवाज राज ठाकरे यांचाही होता. प्रत्यक्षात ती शिवशाही नव्हे तर ‘शिव शिव शाही’ असल्याचे त्यांनाच उमगले आणि जो प्रयोग एकदा फसला तो पुन्हा कसा काय यशस्वी होऊ शकतो, हे त्यांनीच मांडलेले त्रैराशिक तसे नि:संशय बिनतोडच म्हणायचे! दुसरी चिंता शिव स्मारकासाठी लागणारे द्रव्य गोळा होणार कसे? खरे तर हा प्रश्न त्यांना का पडावा हाच एक मोठा प्रश्न. नाशिकच्या महापालिकेची सत्ता त्यांनी काबीज केली तेव्हां ही संस्थादेखील गळ्यापर्यंत कर्जात डुंबत होती. तरीदेखील या कर्जाचे ओझे न बाळगता त्यांनी काही कोटींच्या योजनांचे गाजर नाशिककरांना दाखविले. या योजनांसाठी पैसे कोठून आणणार याचेही उत्तर त्यांच्यापाशी म्हणे होते. टाटा आणि अंबानी यांनी काही योजना म्हणे दत्तक घेतल्या व त्यांनाच दत्तकविधानात सहभागी करुन घेतल्याबद्दल लटके रागावलेल्या महिन्द्र यांची कशीबशी समजूत काढून त्यांना शांत करणे भाग पडले. परंतु प्रत्यक्षात त्यातून काय निर्माण झाले हे नाशिककरच जाणोत. पण मुद्दा तो नाही. जे धनिक उद्योगपती राज ठाकरे यांच्या शब्दाखातर आपल्या थैल्यांची तोंडे मोकळी करायला सिद्ध झाले ते लोक वरती नरेंद्र आणि खालती देवेंद्र यांच्यासाठी त्याच थैल्या रित्या करणार नाहीत? पण त्याचीही गरज नाही. भाववाढ लक्षात घेता हा पंचवार्षिक स्मारक प्रकल्प ४० हजार कोटींचा म्हणजे दरसाल ८ हजार कोटींचा व राज्याची लोकसंख्या १२ कोटी. याचा अर्थ दरडोई दरमहा अवघे ५५ रुपये मिळाले की काम झाले. राज्यातील शिवभक्त हे शिवधनुष्य लीलया पेलणार नाहीत?