शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीतील आणखी एका स्फोटाने पुन्हा हादरली डोंबिवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 04:31 IST

गेल्या वर्षी मे महिन्यात प्रोबेस कंपनीतील स्फोटामुळे हादरलेली डोंबिवली सावरण्याची चिन्हे नाहीत, हे एमआयडीसीतील आणखी एका स्फोटाने दाखवून दिले.

गेल्या वर्षी मे महिन्यात प्रोबेस कंपनीतील स्फोटामुळे हादरलेली डोंबिवली सावरण्याची चिन्हे नाहीत, हे एमआयडीसीतील आणखी एका स्फोटाने दाखवून दिले. दुर्घटनेनंतर एमआयडीसी हटवण्याचा नारा देऊन राजकीय नेते मोकळे होतात. पण औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेच्या मुद्द्यावर गांभीर्याने चर्चेस कोणीच तयार नाही. कारखाने हटवणे इतके सोपे असते, तर आजवर ठिकठिकाणच्या औद्योगिक वसाहती गरजेनुसार स्थलांतरित झाल्या असत्या! डोंबिवलीच नव्हे, तर ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात बहुतांश औद्योगिक वसाहती सुरक्षेशी फटकून वागत असल्याची परिस्थिती आहे. दरवर्षी लागणाºया आगी, वायुगळती, प्रक्रिया न करता फेकून दिलेला औद्योगिक कचरा आणि सांडपाणी यामुळे आसपासच्या वस्त्यांना त्याचा फटका बसतो. प्रोबेस कंपनीतील स्फोटानंतर अशाच कारणांचा शोध घेण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने वर्ष उलटले तरी अहवालच सादर केलेला नाही. त्याचे कारण सांगायलाही कोणी तयार नाही. खरेतर, या अहवालातून स्फोटाची जबाबदारी निश्चित होण्यासह सुरक्षेच्या उपाययोजना, त्याचे आॅडिट, कारखान्यांतून सोडले जाणारे रसायनमिश्रित पाणी आणि वायू यावरील प्रक्रियेचा मुद्दा, कामगारांच्या सुरक्षेचे मापदंड, उद्योग आणि निवासी वसाहतीत मोकळ्या सोडलेल्या भूखंडांवर (बफर झोन) बांधलेली घरे, अग्निसुरक्षा, कारखान्यांनी बळकावलेल्या मोकळ्या जागा यांची जबाबदारी निश्चित झाली असती. पण अहवालाच्या दिरंगाईमुळे या पळवाटा तशाच राहिल्या. औद्योगिक वसाहतींना खेटून निवासी वस्त्या असू नयेत, हा नियम आहे. त्यासाठीची मोकळी जागा किती असावी हेही ठरलेले आहे. मात्र हे नियम सर्रास पायदळी तुडवून भूखंड मोकळे करण्याची आणि तेथे घरे बांधून विकण्याची स्पर्धा तेथील रहिवाशांच्या जिवावर बेतते आहे. एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षेवर काम करणाºया अन्य संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर याची संयुक्त जबाबदारी येते. पण घटना घडल्यावर जबाबदारी झटकण्याचाच खेळ सुरू होतो आणि ज्या उद्योगांवर त्याची प्राथमिक जबाबदारी येते, ते पायाभूत सुविधांची वानवा असल्याचे सांगत त्याचे खापर यंत्रणांवर फोडतात. पण ज्यांचा जीव जातो किंवा अपंगत्व येते त्यांची मात्र परवड होते. अनेकदा अशा घटना दडपण्याकडेच संबंधितांचा कल असतो. कधी कामगारांच्या नोंदीही अधिकृत नसतात. त्यामुळे पुरेशी भरपाई मिळत नाही. हे टाळण्यासाठी कारखान्यांसह सर्व यंत्रणांची वेळीच झाडाझडती घ्यायला हवी. पण ज्यांनी ती घ्यायची तेच बोटचेपे धोरण स्वीकारत शरण गेल्याचा परिणाम स्फोटाचे भीषण रूप घेऊन समोर येतो; आणि पुन्हा एकदा चौकशीसाठी समितीचा सोपस्कार पार पाडला जातो...

टॅग्स :dombivaliडोंबिवली