शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
4
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
5
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
6
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
7
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
8
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
9
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
10
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
12
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
13
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
15
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
16
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
17
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
19
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
20
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले

एमआयडीसीतील आणखी एका स्फोटाने पुन्हा हादरली डोंबिवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 04:31 IST

गेल्या वर्षी मे महिन्यात प्रोबेस कंपनीतील स्फोटामुळे हादरलेली डोंबिवली सावरण्याची चिन्हे नाहीत, हे एमआयडीसीतील आणखी एका स्फोटाने दाखवून दिले.

गेल्या वर्षी मे महिन्यात प्रोबेस कंपनीतील स्फोटामुळे हादरलेली डोंबिवली सावरण्याची चिन्हे नाहीत, हे एमआयडीसीतील आणखी एका स्फोटाने दाखवून दिले. दुर्घटनेनंतर एमआयडीसी हटवण्याचा नारा देऊन राजकीय नेते मोकळे होतात. पण औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेच्या मुद्द्यावर गांभीर्याने चर्चेस कोणीच तयार नाही. कारखाने हटवणे इतके सोपे असते, तर आजवर ठिकठिकाणच्या औद्योगिक वसाहती गरजेनुसार स्थलांतरित झाल्या असत्या! डोंबिवलीच नव्हे, तर ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात बहुतांश औद्योगिक वसाहती सुरक्षेशी फटकून वागत असल्याची परिस्थिती आहे. दरवर्षी लागणाºया आगी, वायुगळती, प्रक्रिया न करता फेकून दिलेला औद्योगिक कचरा आणि सांडपाणी यामुळे आसपासच्या वस्त्यांना त्याचा फटका बसतो. प्रोबेस कंपनीतील स्फोटानंतर अशाच कारणांचा शोध घेण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने वर्ष उलटले तरी अहवालच सादर केलेला नाही. त्याचे कारण सांगायलाही कोणी तयार नाही. खरेतर, या अहवालातून स्फोटाची जबाबदारी निश्चित होण्यासह सुरक्षेच्या उपाययोजना, त्याचे आॅडिट, कारखान्यांतून सोडले जाणारे रसायनमिश्रित पाणी आणि वायू यावरील प्रक्रियेचा मुद्दा, कामगारांच्या सुरक्षेचे मापदंड, उद्योग आणि निवासी वसाहतीत मोकळ्या सोडलेल्या भूखंडांवर (बफर झोन) बांधलेली घरे, अग्निसुरक्षा, कारखान्यांनी बळकावलेल्या मोकळ्या जागा यांची जबाबदारी निश्चित झाली असती. पण अहवालाच्या दिरंगाईमुळे या पळवाटा तशाच राहिल्या. औद्योगिक वसाहतींना खेटून निवासी वस्त्या असू नयेत, हा नियम आहे. त्यासाठीची मोकळी जागा किती असावी हेही ठरलेले आहे. मात्र हे नियम सर्रास पायदळी तुडवून भूखंड मोकळे करण्याची आणि तेथे घरे बांधून विकण्याची स्पर्धा तेथील रहिवाशांच्या जिवावर बेतते आहे. एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षेवर काम करणाºया अन्य संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर याची संयुक्त जबाबदारी येते. पण घटना घडल्यावर जबाबदारी झटकण्याचाच खेळ सुरू होतो आणि ज्या उद्योगांवर त्याची प्राथमिक जबाबदारी येते, ते पायाभूत सुविधांची वानवा असल्याचे सांगत त्याचे खापर यंत्रणांवर फोडतात. पण ज्यांचा जीव जातो किंवा अपंगत्व येते त्यांची मात्र परवड होते. अनेकदा अशा घटना दडपण्याकडेच संबंधितांचा कल असतो. कधी कामगारांच्या नोंदीही अधिकृत नसतात. त्यामुळे पुरेशी भरपाई मिळत नाही. हे टाळण्यासाठी कारखान्यांसह सर्व यंत्रणांची वेळीच झाडाझडती घ्यायला हवी. पण ज्यांनी ती घ्यायची तेच बोटचेपे धोरण स्वीकारत शरण गेल्याचा परिणाम स्फोटाचे भीषण रूप घेऊन समोर येतो; आणि पुन्हा एकदा चौकशीसाठी समितीचा सोपस्कार पार पाडला जातो...

टॅग्स :dombivaliडोंबिवली