शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

भाष्य - मानवजातीला धोका

By admin | Updated: February 18, 2017 00:23 IST

जागतिक हवामानाविषयीच्या २०१७च्या अहवालानुसार, घटत्या ओझोनच्या थरामुळे मृत्यूदराच्या प्रमाणात वाढ होत आहे.

जागतिक हवामानाविषयीच्या २०१७च्या अहवालानुसार, घटत्या ओझोनच्या थरामुळे मृत्यूदराच्या प्रमाणात वाढ होत आहे. भारतातील हे प्रमाण १ लाख ७ हजार ८०० एवढे आहे. प्रदूषित हवेमुळे होणाऱ्या अकाली मृत्यूच्या प्रमाणात कमालीची वाढ झाल्याचे हा अहवाल सांगतो. असे अनेक अहवाल यापूर्वी प्रसिद्ध झाले असून, भविष्यातही प्रसिद्ध होतील. मात्र भूतकाळाप्रमाणेच आपण वर्तमानकाळातही ‘धोक्याची घंटा’ देणाऱ्या अहवालांकडे दुर्लक्ष केले तर याची किंमत संपूर्ण मानवजातीला मोजावी लागणार आहे. १९८० सालच्या सुमारास वातावरण बदलाचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागले. भारतीय मान्सून तेव्हापासून अनियमित झाला. वेळापत्रक चुकू लागले. ऋतुचक्र विस्कळीत झाले. बाष्पीभवनाचा वेग वाढू लागला. आणि अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनांत भर पडली. १ हजार ५०० शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास गटाने आपल्या चौथ्या आणि अंतिम अहवालात ‘जागतिक तपमानवाढ’ ही वस्तुस्थिती असल्याचे नमूद केले आहे. १७५० सालानंतर कार्बन डायआॅक्साइड आणि उष्णता शोषून घेणारी द्रव्ये व वायू मोठ्या प्रमाणावर वातावरणात सोडण्यात आले आहेत. मानवी कृतीमुळे दरवर्षी एक हजार कोटी टन कार्बन डायआॅक्साइड व तत्सम वायूची भर वातावरणात पडते आहे. १७५० सालाच्या तुलनेत पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तपमानात सुमारे १.५ अंश सेल्सिअस एवढी वाढ झाली आहे. पृथ्वीवर यापूर्वी आलेल्या सर्वांत मोठ्या उष्णयुगात म्हणजे २५ कोटी वर्षांपूर्वी ९० टक्के जीवजाती नाहीशा झाल्या होत्या. मानवनिर्मिती उष्णयुगात या शतकात मानवासह सर्व जीवजाती नाहीशा होतील, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. युनोच्या जागतिक हवामान संघटनेचा अहवाल १८ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध झाला आहे. या अहवालाप्रमाणे सन २०१६ हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे. मात्र याची दखल कोणीही घेत नाही.‘न्यू यॉर्क टाइम्स’ या अमेरिकेतील वर्तमानपत्राने १९ जानेवारी रोजी याची पहिल्या पानावर मुख्य बातमी दिली. बातमीवर ठळक अक्षरात म्हटले आहे की, ‘न्यू यॉर्क टाइम्स पृथ्वीवरील सर्वात मोठी बातमी तिच्या योग्य महत्त्वानुसार देत आहे. सन २०१६ हे आजपर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष होते. आणि याच्या आपल्या जीवनावरील परिणामांची कल्पनाही करता येणार नाही.’ बातमीच्या शीर्षकात मानवजात व जीवसृष्टीला नष्ट होण्याचा धोका तयार झाला असल्याचे व सातत्याने उच्चतम तपमान नोंदले गेल्याने शास्त्रज्ञांना धक्का बसल्याचे नमूद केले आहे. सध्या हिमालयाच्या पाकिस्तान व अफगाणिस्तानाकडील बाजूस अतिबर्फवृष्टी सुरू आहे. अफगाणिस्तानात दोन गावे बर्फाखाली पूर्ण गाडली गेली आहेत व हजारो हेक्टर शेती नष्ट झाली. सुमारे १५० माणसे या बर्फाच्या सुनामीखाली मरण पावली. त्यामुळे या सर्वांचा विचार करत वेळीच जागे होण्याची वेळ आली आहे.