शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

भाष्य - मानवजातीला धोका

By admin | Updated: February 18, 2017 00:23 IST

जागतिक हवामानाविषयीच्या २०१७च्या अहवालानुसार, घटत्या ओझोनच्या थरामुळे मृत्यूदराच्या प्रमाणात वाढ होत आहे.

जागतिक हवामानाविषयीच्या २०१७च्या अहवालानुसार, घटत्या ओझोनच्या थरामुळे मृत्यूदराच्या प्रमाणात वाढ होत आहे. भारतातील हे प्रमाण १ लाख ७ हजार ८०० एवढे आहे. प्रदूषित हवेमुळे होणाऱ्या अकाली मृत्यूच्या प्रमाणात कमालीची वाढ झाल्याचे हा अहवाल सांगतो. असे अनेक अहवाल यापूर्वी प्रसिद्ध झाले असून, भविष्यातही प्रसिद्ध होतील. मात्र भूतकाळाप्रमाणेच आपण वर्तमानकाळातही ‘धोक्याची घंटा’ देणाऱ्या अहवालांकडे दुर्लक्ष केले तर याची किंमत संपूर्ण मानवजातीला मोजावी लागणार आहे. १९८० सालच्या सुमारास वातावरण बदलाचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागले. भारतीय मान्सून तेव्हापासून अनियमित झाला. वेळापत्रक चुकू लागले. ऋतुचक्र विस्कळीत झाले. बाष्पीभवनाचा वेग वाढू लागला. आणि अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनांत भर पडली. १ हजार ५०० शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास गटाने आपल्या चौथ्या आणि अंतिम अहवालात ‘जागतिक तपमानवाढ’ ही वस्तुस्थिती असल्याचे नमूद केले आहे. १७५० सालानंतर कार्बन डायआॅक्साइड आणि उष्णता शोषून घेणारी द्रव्ये व वायू मोठ्या प्रमाणावर वातावरणात सोडण्यात आले आहेत. मानवी कृतीमुळे दरवर्षी एक हजार कोटी टन कार्बन डायआॅक्साइड व तत्सम वायूची भर वातावरणात पडते आहे. १७५० सालाच्या तुलनेत पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तपमानात सुमारे १.५ अंश सेल्सिअस एवढी वाढ झाली आहे. पृथ्वीवर यापूर्वी आलेल्या सर्वांत मोठ्या उष्णयुगात म्हणजे २५ कोटी वर्षांपूर्वी ९० टक्के जीवजाती नाहीशा झाल्या होत्या. मानवनिर्मिती उष्णयुगात या शतकात मानवासह सर्व जीवजाती नाहीशा होतील, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. युनोच्या जागतिक हवामान संघटनेचा अहवाल १८ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध झाला आहे. या अहवालाप्रमाणे सन २०१६ हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे. मात्र याची दखल कोणीही घेत नाही.‘न्यू यॉर्क टाइम्स’ या अमेरिकेतील वर्तमानपत्राने १९ जानेवारी रोजी याची पहिल्या पानावर मुख्य बातमी दिली. बातमीवर ठळक अक्षरात म्हटले आहे की, ‘न्यू यॉर्क टाइम्स पृथ्वीवरील सर्वात मोठी बातमी तिच्या योग्य महत्त्वानुसार देत आहे. सन २०१६ हे आजपर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष होते. आणि याच्या आपल्या जीवनावरील परिणामांची कल्पनाही करता येणार नाही.’ बातमीच्या शीर्षकात मानवजात व जीवसृष्टीला नष्ट होण्याचा धोका तयार झाला असल्याचे व सातत्याने उच्चतम तपमान नोंदले गेल्याने शास्त्रज्ञांना धक्का बसल्याचे नमूद केले आहे. सध्या हिमालयाच्या पाकिस्तान व अफगाणिस्तानाकडील बाजूस अतिबर्फवृष्टी सुरू आहे. अफगाणिस्तानात दोन गावे बर्फाखाली पूर्ण गाडली गेली आहेत व हजारो हेक्टर शेती नष्ट झाली. सुमारे १५० माणसे या बर्फाच्या सुनामीखाली मरण पावली. त्यामुळे या सर्वांचा विचार करत वेळीच जागे होण्याची वेळ आली आहे.