शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - मानवजातीला धोका

By admin | Updated: February 18, 2017 00:23 IST

जागतिक हवामानाविषयीच्या २०१७च्या अहवालानुसार, घटत्या ओझोनच्या थरामुळे मृत्यूदराच्या प्रमाणात वाढ होत आहे.

जागतिक हवामानाविषयीच्या २०१७च्या अहवालानुसार, घटत्या ओझोनच्या थरामुळे मृत्यूदराच्या प्रमाणात वाढ होत आहे. भारतातील हे प्रमाण १ लाख ७ हजार ८०० एवढे आहे. प्रदूषित हवेमुळे होणाऱ्या अकाली मृत्यूच्या प्रमाणात कमालीची वाढ झाल्याचे हा अहवाल सांगतो. असे अनेक अहवाल यापूर्वी प्रसिद्ध झाले असून, भविष्यातही प्रसिद्ध होतील. मात्र भूतकाळाप्रमाणेच आपण वर्तमानकाळातही ‘धोक्याची घंटा’ देणाऱ्या अहवालांकडे दुर्लक्ष केले तर याची किंमत संपूर्ण मानवजातीला मोजावी लागणार आहे. १९८० सालच्या सुमारास वातावरण बदलाचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागले. भारतीय मान्सून तेव्हापासून अनियमित झाला. वेळापत्रक चुकू लागले. ऋतुचक्र विस्कळीत झाले. बाष्पीभवनाचा वेग वाढू लागला. आणि अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनांत भर पडली. १ हजार ५०० शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास गटाने आपल्या चौथ्या आणि अंतिम अहवालात ‘जागतिक तपमानवाढ’ ही वस्तुस्थिती असल्याचे नमूद केले आहे. १७५० सालानंतर कार्बन डायआॅक्साइड आणि उष्णता शोषून घेणारी द्रव्ये व वायू मोठ्या प्रमाणावर वातावरणात सोडण्यात आले आहेत. मानवी कृतीमुळे दरवर्षी एक हजार कोटी टन कार्बन डायआॅक्साइड व तत्सम वायूची भर वातावरणात पडते आहे. १७५० सालाच्या तुलनेत पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तपमानात सुमारे १.५ अंश सेल्सिअस एवढी वाढ झाली आहे. पृथ्वीवर यापूर्वी आलेल्या सर्वांत मोठ्या उष्णयुगात म्हणजे २५ कोटी वर्षांपूर्वी ९० टक्के जीवजाती नाहीशा झाल्या होत्या. मानवनिर्मिती उष्णयुगात या शतकात मानवासह सर्व जीवजाती नाहीशा होतील, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. युनोच्या जागतिक हवामान संघटनेचा अहवाल १८ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध झाला आहे. या अहवालाप्रमाणे सन २०१६ हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे. मात्र याची दखल कोणीही घेत नाही.‘न्यू यॉर्क टाइम्स’ या अमेरिकेतील वर्तमानपत्राने १९ जानेवारी रोजी याची पहिल्या पानावर मुख्य बातमी दिली. बातमीवर ठळक अक्षरात म्हटले आहे की, ‘न्यू यॉर्क टाइम्स पृथ्वीवरील सर्वात मोठी बातमी तिच्या योग्य महत्त्वानुसार देत आहे. सन २०१६ हे आजपर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष होते. आणि याच्या आपल्या जीवनावरील परिणामांची कल्पनाही करता येणार नाही.’ बातमीच्या शीर्षकात मानवजात व जीवसृष्टीला नष्ट होण्याचा धोका तयार झाला असल्याचे व सातत्याने उच्चतम तपमान नोंदले गेल्याने शास्त्रज्ञांना धक्का बसल्याचे नमूद केले आहे. सध्या हिमालयाच्या पाकिस्तान व अफगाणिस्तानाकडील बाजूस अतिबर्फवृष्टी सुरू आहे. अफगाणिस्तानात दोन गावे बर्फाखाली पूर्ण गाडली गेली आहेत व हजारो हेक्टर शेती नष्ट झाली. सुमारे १५० माणसे या बर्फाच्या सुनामीखाली मरण पावली. त्यामुळे या सर्वांचा विचार करत वेळीच जागे होण्याची वेळ आली आहे.