शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - तिच्या धाडसाला सलाम"

By admin | Updated: July 5, 2017 00:22 IST

सध्या कर्जमाफी या विषयावर रान उठले असताना अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट येथील एक महिला शेतकरी पुढे येते, आपण कर्जाची परतफेड करण्यास सक्षम

सध्या कर्जमाफी या विषयावर रान उठले असताना अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट येथील एक महिला शेतकरी पुढे येते, आपण कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असल्याचे सांगत शासनाने दिलेली कर्जमाफी अतिशय नम्रपणे नाकारते. इतकेच नव्हे तर आपल्याला देण्यात आलेल्या कर्जमाफीचा लाभ दुसऱ्या गरजूला देण्याची विनंती करीत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देते. सोपं नाही हे; पण अर्चना सुधीर रसे या शेतकरी महिलेने हे धाडस दाखवून गरज नसताना आणि सक्षम असताना शासनाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या काही सधन शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा दिवसेगणिक वाढणारा आकडा चिंतनीय आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळामुळे बळीराजा हतबल झाला आहे. त्यामुळे विदर्भात तर दररोज या दुर्दैवी घटना घडतात. यावर कर्जमाफी हाच एकमेव उपाय असल्याची भाषा आजवर शासनात विरोधी बाकावर बसलेली मंडळी करायची. परंतु यंदा स्वत: शेतकरी रस्त्यावर उतरला. कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत माघार नाही, असे शासनाला ठणकावून सांगितले. अखेर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. यावरही राजकारणाची वेगवेगळी गणिते मांडली जात आहेत. राजकीय श्रेय लाटण्याची संधी कुणीही सोडू इच्छित नाही. सत्तापक्ष कर्जमाफीचे स्वागत करीत आहे तर यातून शेतकरी कधीही कर्जमुक्त होऊ शकत नसल्याचा दावा करत विरोधक टीकेची झोड उठवीत आहेत. असे असताना घेतलेले पीककर्ज फेडण्यास आपण सक्षम असल्याचा दाखला देत अचलपूर तालुक्यातील अर्चना सुधीर रसे या शेतकरी महिलेने दीड लक्ष रुपये असलेले युनियन बँकेचे कर्ज स्वत: भरणार असल्याचे जाहीर करून सकारात्मक पाऊल उचलले. अर्चनासारखे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या शेतकऱ्यांनी पुढाकार घेत हा कित्ता गिरवायला हवा. अर्चना यांचे पती भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत. एरवी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यात सत्तापक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेच आघाडीवर असतात, हा समजही या शेतकरी महिलेने दूर केला आहे. शासनाने कर्जमाफी जाहीर केली. ४४ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली. ८९ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचा दावाही केला पण गरजूंना तो मिळाला नाही तर पुणतांब्यापासून सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाचे हे अपयश ठरेल.