शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भाष्य - तिच्या धाडसाला सलाम"

By admin | Updated: July 5, 2017 00:22 IST

सध्या कर्जमाफी या विषयावर रान उठले असताना अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट येथील एक महिला शेतकरी पुढे येते, आपण कर्जाची परतफेड करण्यास सक्षम

सध्या कर्जमाफी या विषयावर रान उठले असताना अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट येथील एक महिला शेतकरी पुढे येते, आपण कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असल्याचे सांगत शासनाने दिलेली कर्जमाफी अतिशय नम्रपणे नाकारते. इतकेच नव्हे तर आपल्याला देण्यात आलेल्या कर्जमाफीचा लाभ दुसऱ्या गरजूला देण्याची विनंती करीत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देते. सोपं नाही हे; पण अर्चना सुधीर रसे या शेतकरी महिलेने हे धाडस दाखवून गरज नसताना आणि सक्षम असताना शासनाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या काही सधन शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा दिवसेगणिक वाढणारा आकडा चिंतनीय आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळामुळे बळीराजा हतबल झाला आहे. त्यामुळे विदर्भात तर दररोज या दुर्दैवी घटना घडतात. यावर कर्जमाफी हाच एकमेव उपाय असल्याची भाषा आजवर शासनात विरोधी बाकावर बसलेली मंडळी करायची. परंतु यंदा स्वत: शेतकरी रस्त्यावर उतरला. कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत माघार नाही, असे शासनाला ठणकावून सांगितले. अखेर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. यावरही राजकारणाची वेगवेगळी गणिते मांडली जात आहेत. राजकीय श्रेय लाटण्याची संधी कुणीही सोडू इच्छित नाही. सत्तापक्ष कर्जमाफीचे स्वागत करीत आहे तर यातून शेतकरी कधीही कर्जमुक्त होऊ शकत नसल्याचा दावा करत विरोधक टीकेची झोड उठवीत आहेत. असे असताना घेतलेले पीककर्ज फेडण्यास आपण सक्षम असल्याचा दाखला देत अचलपूर तालुक्यातील अर्चना सुधीर रसे या शेतकरी महिलेने दीड लक्ष रुपये असलेले युनियन बँकेचे कर्ज स्वत: भरणार असल्याचे जाहीर करून सकारात्मक पाऊल उचलले. अर्चनासारखे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या शेतकऱ्यांनी पुढाकार घेत हा कित्ता गिरवायला हवा. अर्चना यांचे पती भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत. एरवी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यात सत्तापक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेच आघाडीवर असतात, हा समजही या शेतकरी महिलेने दूर केला आहे. शासनाने कर्जमाफी जाहीर केली. ४४ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली. ८९ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचा दावाही केला पण गरजूंना तो मिळाला नाही तर पुणतांब्यापासून सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाचे हे अपयश ठरेल.