शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

भाष्य - तिच्या धाडसाला सलाम"

By admin | Updated: July 5, 2017 00:22 IST

सध्या कर्जमाफी या विषयावर रान उठले असताना अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट येथील एक महिला शेतकरी पुढे येते, आपण कर्जाची परतफेड करण्यास सक्षम

सध्या कर्जमाफी या विषयावर रान उठले असताना अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट येथील एक महिला शेतकरी पुढे येते, आपण कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असल्याचे सांगत शासनाने दिलेली कर्जमाफी अतिशय नम्रपणे नाकारते. इतकेच नव्हे तर आपल्याला देण्यात आलेल्या कर्जमाफीचा लाभ दुसऱ्या गरजूला देण्याची विनंती करीत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देते. सोपं नाही हे; पण अर्चना सुधीर रसे या शेतकरी महिलेने हे धाडस दाखवून गरज नसताना आणि सक्षम असताना शासनाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या काही सधन शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा दिवसेगणिक वाढणारा आकडा चिंतनीय आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळामुळे बळीराजा हतबल झाला आहे. त्यामुळे विदर्भात तर दररोज या दुर्दैवी घटना घडतात. यावर कर्जमाफी हाच एकमेव उपाय असल्याची भाषा आजवर शासनात विरोधी बाकावर बसलेली मंडळी करायची. परंतु यंदा स्वत: शेतकरी रस्त्यावर उतरला. कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत माघार नाही, असे शासनाला ठणकावून सांगितले. अखेर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. यावरही राजकारणाची वेगवेगळी गणिते मांडली जात आहेत. राजकीय श्रेय लाटण्याची संधी कुणीही सोडू इच्छित नाही. सत्तापक्ष कर्जमाफीचे स्वागत करीत आहे तर यातून शेतकरी कधीही कर्जमुक्त होऊ शकत नसल्याचा दावा करत विरोधक टीकेची झोड उठवीत आहेत. असे असताना घेतलेले पीककर्ज फेडण्यास आपण सक्षम असल्याचा दाखला देत अचलपूर तालुक्यातील अर्चना सुधीर रसे या शेतकरी महिलेने दीड लक्ष रुपये असलेले युनियन बँकेचे कर्ज स्वत: भरणार असल्याचे जाहीर करून सकारात्मक पाऊल उचलले. अर्चनासारखे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या शेतकऱ्यांनी पुढाकार घेत हा कित्ता गिरवायला हवा. अर्चना यांचे पती भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत. एरवी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यात सत्तापक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेच आघाडीवर असतात, हा समजही या शेतकरी महिलेने दूर केला आहे. शासनाने कर्जमाफी जाहीर केली. ४४ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली. ८९ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचा दावाही केला पण गरजूंना तो मिळाला नाही तर पुणतांब्यापासून सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाचे हे अपयश ठरेल.