शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - नैतिकतेचा ऱ्हास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2017 00:19 IST

पूर्वीच्या काळी राजकीय नेते बोलण्याआधी विचार करायचे, हल्लीचे राजकारणी विचार करून बोलणे तर सोडाच

पूर्वीच्या काळी राजकीय नेते बोलण्याआधी विचार करायचे, हल्लीचे राजकारणी विचार करून बोलणे तर सोडाच बोलूनही विचार करताना दिसत नाही. इतकी निगरगठ्ठता आणि वैचारिक अध:पतन झाल्याचा प्रत्यय महाराष्ट्रासह अन्य राज्यातील निवडणुकातूनही येऊ लागला आहे. सत्तासंघर्ष केवळ आताच पहायला मिळतो, अशातला भाग नाही. तो पूर्वापार चालत आलेला आहे. पूर्वी त्यास वैचारिकतेचे आणि नैतिकतेचे अधिष्ठान जरूर होते. विचारांचे विचारांशी केलेले ते शाब्दिक युद्ध असायचे. पक्षीय ध्येयधोरणांवर व सरकारच्या यशापयशावर आरोप-प्रत्त्यारोप व्हायचे. वैयक्तिक आरोपांना त्याठिकाणी थारा नसायचा. आताच्या निवडणुकांनी आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या प्रचारांनी अत्यंत किळसवाणे, लाजिरवाणे आणि घृणास्पद असे वळण घेतले आहे. यातून राजकारणातील नैतिकतेचा ऱ्हास झाल्याचे तर अधोरेखित होतेच, त्याचसोबत केवळ सत्तेसाठी राजकारणी कोणत्या थराला जाऊ शकतात याचे दर्शनही जनतेला घडते. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना गेल्या दोन दशकाहून अधिक काळ वरकरणी युतीच्या नावाखाली सोयीचे राजकारण करीत आल्याचे जनतेने पाहिले आणि अनुभवले आहे. सध्या तर शिवसेना सत्तेत राहूनही विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. एकीकडे केंद्र आणि राज्यात सत्तेत वाटेकरी असताना दुसरीकडे परस्परांवर आरोप करीत राहायचे हे भल्याभल्यांना आजवर न उलगडणारे कोडे आहे. यावेळच्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये हे दोन पक्ष बेरजेच्या गणितावरून विभक्त झाले त्यादिवसापासून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. कोण कोणाची औकात काढतो तर कोण जबड्यात हात घालून दात मोजायची भाषा करतो. केवळ खुर्चीसाठी गल्लीतल्या दोन लहान मुलांसारखे भांडणाऱ्या या नेत्यांनी सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात असंस्कृतपणाचे दर्शन घडविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशातील नेते आरोप-प्रत्त्यारोपाच्या फैरी डागण्यात तसूभरही मागे राहिलेले नाहीत. मोदी म्हणतात, ‘ही तर बहेनजी संपत्ती पार्टी’, मायावती म्हणतात, ‘मोदी म्हणजे निगेटिव्ह दलित मॅन’. यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव हे बिग बी अमिताभला ‘गुजरातच्या गाढवांसाठी जाहिरात करू नका’ असा सल्ला देतात. एकंदरीत या सर्व नेतेमंडळींची भाषणे ऐकली आणि पाहिली तर राजकारणाचा प्रवास कोणत्या दिशेकडे मार्गक्रमण करतो आहे, हे दिसून येते. सभा वैचारिक मुद्द्यांवर जिंकता आल्या पाहिजेत. वैयक्तिक शिंतोडे उडवून आणि नकला करून श्रोत्यांचे केवळ मनोरंजन घडविता येते, जनमत जिंकता येत नाही. पण त्यांना हे सांगणार कोण?