शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - नैतिकतेचा ऱ्हास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2017 00:19 IST

पूर्वीच्या काळी राजकीय नेते बोलण्याआधी विचार करायचे, हल्लीचे राजकारणी विचार करून बोलणे तर सोडाच

पूर्वीच्या काळी राजकीय नेते बोलण्याआधी विचार करायचे, हल्लीचे राजकारणी विचार करून बोलणे तर सोडाच बोलूनही विचार करताना दिसत नाही. इतकी निगरगठ्ठता आणि वैचारिक अध:पतन झाल्याचा प्रत्यय महाराष्ट्रासह अन्य राज्यातील निवडणुकातूनही येऊ लागला आहे. सत्तासंघर्ष केवळ आताच पहायला मिळतो, अशातला भाग नाही. तो पूर्वापार चालत आलेला आहे. पूर्वी त्यास वैचारिकतेचे आणि नैतिकतेचे अधिष्ठान जरूर होते. विचारांचे विचारांशी केलेले ते शाब्दिक युद्ध असायचे. पक्षीय ध्येयधोरणांवर व सरकारच्या यशापयशावर आरोप-प्रत्त्यारोप व्हायचे. वैयक्तिक आरोपांना त्याठिकाणी थारा नसायचा. आताच्या निवडणुकांनी आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या प्रचारांनी अत्यंत किळसवाणे, लाजिरवाणे आणि घृणास्पद असे वळण घेतले आहे. यातून राजकारणातील नैतिकतेचा ऱ्हास झाल्याचे तर अधोरेखित होतेच, त्याचसोबत केवळ सत्तेसाठी राजकारणी कोणत्या थराला जाऊ शकतात याचे दर्शनही जनतेला घडते. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना गेल्या दोन दशकाहून अधिक काळ वरकरणी युतीच्या नावाखाली सोयीचे राजकारण करीत आल्याचे जनतेने पाहिले आणि अनुभवले आहे. सध्या तर शिवसेना सत्तेत राहूनही विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. एकीकडे केंद्र आणि राज्यात सत्तेत वाटेकरी असताना दुसरीकडे परस्परांवर आरोप करीत राहायचे हे भल्याभल्यांना आजवर न उलगडणारे कोडे आहे. यावेळच्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये हे दोन पक्ष बेरजेच्या गणितावरून विभक्त झाले त्यादिवसापासून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. कोण कोणाची औकात काढतो तर कोण जबड्यात हात घालून दात मोजायची भाषा करतो. केवळ खुर्चीसाठी गल्लीतल्या दोन लहान मुलांसारखे भांडणाऱ्या या नेत्यांनी सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात असंस्कृतपणाचे दर्शन घडविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशातील नेते आरोप-प्रत्त्यारोपाच्या फैरी डागण्यात तसूभरही मागे राहिलेले नाहीत. मोदी म्हणतात, ‘ही तर बहेनजी संपत्ती पार्टी’, मायावती म्हणतात, ‘मोदी म्हणजे निगेटिव्ह दलित मॅन’. यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव हे बिग बी अमिताभला ‘गुजरातच्या गाढवांसाठी जाहिरात करू नका’ असा सल्ला देतात. एकंदरीत या सर्व नेतेमंडळींची भाषणे ऐकली आणि पाहिली तर राजकारणाचा प्रवास कोणत्या दिशेकडे मार्गक्रमण करतो आहे, हे दिसून येते. सभा वैचारिक मुद्द्यांवर जिंकता आल्या पाहिजेत. वैयक्तिक शिंतोडे उडवून आणि नकला करून श्रोत्यांचे केवळ मनोरंजन घडविता येते, जनमत जिंकता येत नाही. पण त्यांना हे सांगणार कोण?