शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

भाष्य - नैतिकतेचा ऱ्हास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2017 00:19 IST

पूर्वीच्या काळी राजकीय नेते बोलण्याआधी विचार करायचे, हल्लीचे राजकारणी विचार करून बोलणे तर सोडाच

पूर्वीच्या काळी राजकीय नेते बोलण्याआधी विचार करायचे, हल्लीचे राजकारणी विचार करून बोलणे तर सोडाच बोलूनही विचार करताना दिसत नाही. इतकी निगरगठ्ठता आणि वैचारिक अध:पतन झाल्याचा प्रत्यय महाराष्ट्रासह अन्य राज्यातील निवडणुकातूनही येऊ लागला आहे. सत्तासंघर्ष केवळ आताच पहायला मिळतो, अशातला भाग नाही. तो पूर्वापार चालत आलेला आहे. पूर्वी त्यास वैचारिकतेचे आणि नैतिकतेचे अधिष्ठान जरूर होते. विचारांचे विचारांशी केलेले ते शाब्दिक युद्ध असायचे. पक्षीय ध्येयधोरणांवर व सरकारच्या यशापयशावर आरोप-प्रत्त्यारोप व्हायचे. वैयक्तिक आरोपांना त्याठिकाणी थारा नसायचा. आताच्या निवडणुकांनी आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या प्रचारांनी अत्यंत किळसवाणे, लाजिरवाणे आणि घृणास्पद असे वळण घेतले आहे. यातून राजकारणातील नैतिकतेचा ऱ्हास झाल्याचे तर अधोरेखित होतेच, त्याचसोबत केवळ सत्तेसाठी राजकारणी कोणत्या थराला जाऊ शकतात याचे दर्शनही जनतेला घडते. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना गेल्या दोन दशकाहून अधिक काळ वरकरणी युतीच्या नावाखाली सोयीचे राजकारण करीत आल्याचे जनतेने पाहिले आणि अनुभवले आहे. सध्या तर शिवसेना सत्तेत राहूनही विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. एकीकडे केंद्र आणि राज्यात सत्तेत वाटेकरी असताना दुसरीकडे परस्परांवर आरोप करीत राहायचे हे भल्याभल्यांना आजवर न उलगडणारे कोडे आहे. यावेळच्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये हे दोन पक्ष बेरजेच्या गणितावरून विभक्त झाले त्यादिवसापासून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. कोण कोणाची औकात काढतो तर कोण जबड्यात हात घालून दात मोजायची भाषा करतो. केवळ खुर्चीसाठी गल्लीतल्या दोन लहान मुलांसारखे भांडणाऱ्या या नेत्यांनी सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात असंस्कृतपणाचे दर्शन घडविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशातील नेते आरोप-प्रत्त्यारोपाच्या फैरी डागण्यात तसूभरही मागे राहिलेले नाहीत. मोदी म्हणतात, ‘ही तर बहेनजी संपत्ती पार्टी’, मायावती म्हणतात, ‘मोदी म्हणजे निगेटिव्ह दलित मॅन’. यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव हे बिग बी अमिताभला ‘गुजरातच्या गाढवांसाठी जाहिरात करू नका’ असा सल्ला देतात. एकंदरीत या सर्व नेतेमंडळींची भाषणे ऐकली आणि पाहिली तर राजकारणाचा प्रवास कोणत्या दिशेकडे मार्गक्रमण करतो आहे, हे दिसून येते. सभा वैचारिक मुद्द्यांवर जिंकता आल्या पाहिजेत. वैयक्तिक शिंतोडे उडवून आणि नकला करून श्रोत्यांचे केवळ मनोरंजन घडविता येते, जनमत जिंकता येत नाही. पण त्यांना हे सांगणार कोण?