शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भाष्य - अंदाज हवामानाचा

By admin | Updated: March 27, 2017 00:16 IST

सरकारचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मुंबईसह भारतात काही वर्षांपासून पर्यटन व्यवसाय बहरत आहे. पण अनेकदा हवामान

सरकारचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मुंबईसह भारतात काही वर्षांपासून पर्यटन व्यवसाय बहरत आहे. पण अनेकदा हवामान बदलामुळे सागरी पर्यटन, डोंगराळ भागातील तीर्थयात्रा व हिल स्टेशनवरील पर्यटन व्यवसायाचे नुकसान टाळण्यासाठी मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून हवामान बदलाचे पूर्वानुमान दिले जाणार आहे. हे अ‍ॅप पर्यटक आणि पर्यटनस्थळावरील व्यावसायिकांच्या सोयीचे होणार आहे. औरंगाबाद ही तशी पर्यटनाचीही राजधानी समजली जाते. बीबी का मकबरा, पाणचक्कीसह शहरापासून जवळ असलेला दौलताबादचा किल्ला, वेरूळची लेणी, पांडव लेणी, अजिंठ्याची लेणी ही सर्व स्थळे पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येथे येतात. पर्यटकांचा येण्याचा काळ म्हणजे हिवाळा. साधारण आॅक्टोबरपासून तो सुरू होतो. गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात ३ लाख २० हजार ४४ भारतीय, तर पाच हजार ९४२ विदेशी पर्यटकांनी या स्थळांना भेट दिली. नोव्हेंबर महिन्यात ८ हजार ८३९ विदेशी पर्यटकांची स्थळांना भेट दिली. यावर्षी आॅक्टोबरमध्ये ५ हजार ७१० आणि नोव्हेंबरमध्ये ६ हजार ८०० विदेशी पर्यटकांनी भेट दिली. हवामान बदलाची सूचना देणाऱ्या या अ‍ॅपचा सर्वांना फायदाच होणार आहे. हवामान खात्याने घेतलेला हा पुढाकार निश्चितच प्रशंसनीय आहे. मात्र, हवामान बदलामुळे गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तीन वर्षांपासून सलग अवकाळीचा फटका बसत आहे. या गारपिटीतून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, त्यांचा माल खराब होऊ नये म्हणून सरकारने काय केले? आपल्याकडे हवामान खात्याचा अंदाज सर्वांनाच ठाऊक. आज पाऊस पडणार असे हवामान खात्याकडून ज्या दिवशी सांगितले जाते त्या दिवशी आकाश स्वच्छ राहणार, हे सर्वांनीच गृहीत धरलेले असते. अनेक वर्षांच्या अनुभवानेच हे शहाणपण आले आहे. असे हे हवामान खात्याचे अ‍ॅप पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिकांना किती लाभदायक ठरेल, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. त्यामुळे हवामान खाते आणि सरकारने हवामानाचा अंदाज देताना जसे शेतकऱ्याला गृहीत धरले, तसे विदेशी पर्यटकांना गृहीत धरू नये एवढेच.