शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - अंदाज हवामानाचा

By admin | Updated: March 27, 2017 00:16 IST

सरकारचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मुंबईसह भारतात काही वर्षांपासून पर्यटन व्यवसाय बहरत आहे. पण अनेकदा हवामान

सरकारचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मुंबईसह भारतात काही वर्षांपासून पर्यटन व्यवसाय बहरत आहे. पण अनेकदा हवामान बदलामुळे सागरी पर्यटन, डोंगराळ भागातील तीर्थयात्रा व हिल स्टेशनवरील पर्यटन व्यवसायाचे नुकसान टाळण्यासाठी मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून हवामान बदलाचे पूर्वानुमान दिले जाणार आहे. हे अ‍ॅप पर्यटक आणि पर्यटनस्थळावरील व्यावसायिकांच्या सोयीचे होणार आहे. औरंगाबाद ही तशी पर्यटनाचीही राजधानी समजली जाते. बीबी का मकबरा, पाणचक्कीसह शहरापासून जवळ असलेला दौलताबादचा किल्ला, वेरूळची लेणी, पांडव लेणी, अजिंठ्याची लेणी ही सर्व स्थळे पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येथे येतात. पर्यटकांचा येण्याचा काळ म्हणजे हिवाळा. साधारण आॅक्टोबरपासून तो सुरू होतो. गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात ३ लाख २० हजार ४४ भारतीय, तर पाच हजार ९४२ विदेशी पर्यटकांनी या स्थळांना भेट दिली. नोव्हेंबर महिन्यात ८ हजार ८३९ विदेशी पर्यटकांची स्थळांना भेट दिली. यावर्षी आॅक्टोबरमध्ये ५ हजार ७१० आणि नोव्हेंबरमध्ये ६ हजार ८०० विदेशी पर्यटकांनी भेट दिली. हवामान बदलाची सूचना देणाऱ्या या अ‍ॅपचा सर्वांना फायदाच होणार आहे. हवामान खात्याने घेतलेला हा पुढाकार निश्चितच प्रशंसनीय आहे. मात्र, हवामान बदलामुळे गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तीन वर्षांपासून सलग अवकाळीचा फटका बसत आहे. या गारपिटीतून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, त्यांचा माल खराब होऊ नये म्हणून सरकारने काय केले? आपल्याकडे हवामान खात्याचा अंदाज सर्वांनाच ठाऊक. आज पाऊस पडणार असे हवामान खात्याकडून ज्या दिवशी सांगितले जाते त्या दिवशी आकाश स्वच्छ राहणार, हे सर्वांनीच गृहीत धरलेले असते. अनेक वर्षांच्या अनुभवानेच हे शहाणपण आले आहे. असे हे हवामान खात्याचे अ‍ॅप पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिकांना किती लाभदायक ठरेल, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. त्यामुळे हवामान खाते आणि सरकारने हवामानाचा अंदाज देताना जसे शेतकऱ्याला गृहीत धरले, तसे विदेशी पर्यटकांना गृहीत धरू नये एवढेच.