शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

भाष्य - अंदाज हवामानाचा

By admin | Updated: March 27, 2017 00:16 IST

सरकारचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मुंबईसह भारतात काही वर्षांपासून पर्यटन व्यवसाय बहरत आहे. पण अनेकदा हवामान

सरकारचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मुंबईसह भारतात काही वर्षांपासून पर्यटन व्यवसाय बहरत आहे. पण अनेकदा हवामान बदलामुळे सागरी पर्यटन, डोंगराळ भागातील तीर्थयात्रा व हिल स्टेशनवरील पर्यटन व्यवसायाचे नुकसान टाळण्यासाठी मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून हवामान बदलाचे पूर्वानुमान दिले जाणार आहे. हे अ‍ॅप पर्यटक आणि पर्यटनस्थळावरील व्यावसायिकांच्या सोयीचे होणार आहे. औरंगाबाद ही तशी पर्यटनाचीही राजधानी समजली जाते. बीबी का मकबरा, पाणचक्कीसह शहरापासून जवळ असलेला दौलताबादचा किल्ला, वेरूळची लेणी, पांडव लेणी, अजिंठ्याची लेणी ही सर्व स्थळे पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येथे येतात. पर्यटकांचा येण्याचा काळ म्हणजे हिवाळा. साधारण आॅक्टोबरपासून तो सुरू होतो. गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात ३ लाख २० हजार ४४ भारतीय, तर पाच हजार ९४२ विदेशी पर्यटकांनी या स्थळांना भेट दिली. नोव्हेंबर महिन्यात ८ हजार ८३९ विदेशी पर्यटकांची स्थळांना भेट दिली. यावर्षी आॅक्टोबरमध्ये ५ हजार ७१० आणि नोव्हेंबरमध्ये ६ हजार ८०० विदेशी पर्यटकांनी भेट दिली. हवामान बदलाची सूचना देणाऱ्या या अ‍ॅपचा सर्वांना फायदाच होणार आहे. हवामान खात्याने घेतलेला हा पुढाकार निश्चितच प्रशंसनीय आहे. मात्र, हवामान बदलामुळे गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तीन वर्षांपासून सलग अवकाळीचा फटका बसत आहे. या गारपिटीतून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, त्यांचा माल खराब होऊ नये म्हणून सरकारने काय केले? आपल्याकडे हवामान खात्याचा अंदाज सर्वांनाच ठाऊक. आज पाऊस पडणार असे हवामान खात्याकडून ज्या दिवशी सांगितले जाते त्या दिवशी आकाश स्वच्छ राहणार, हे सर्वांनीच गृहीत धरलेले असते. अनेक वर्षांच्या अनुभवानेच हे शहाणपण आले आहे. असे हे हवामान खात्याचे अ‍ॅप पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिकांना किती लाभदायक ठरेल, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. त्यामुळे हवामान खाते आणि सरकारने हवामानाचा अंदाज देताना जसे शेतकऱ्याला गृहीत धरले, तसे विदेशी पर्यटकांना गृहीत धरू नये एवढेच.