शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

भाष्य - रक्ताचे नाते दुरावू नये...

By admin | Updated: May 3, 2017 00:15 IST

लातूर आणि बीदर या दोन जिल्ह्यांची भाषा वेगळी. राज्य वेगळे. संस्कृतीही वेगळी. तरी दोन्ही जिल्ह्यांत एक रक्ताचे नाते आहे. म्हणूनच

लातूर आणि बीदर या दोन जिल्ह्यांची भाषा वेगळी. राज्य वेगळे. संस्कृतीही वेगळी. तरी दोन्ही जिल्ह्यांत एक रक्ताचे नाते आहे. म्हणूनच या दोन्ही जिल्ह्यांत रोटीबेटी व्यवहार चालतो. एवढे वेगळेपण असतानाही कोणाच्या संसारात बाधा येत नाही. बीदरमध्ये मराठी भाषा जेवढ्या प्रेमाने बोलली जाते तेवढाच आदर लातूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात कानडी भाषेला घराघरात दिला जातो. अशा या दोन जिल्ह्यांतील रक्ताच्या नात्यामध्ये अलीकडे दरी वाढत आहे. निमित्त केवळ एका रेल्वेचे आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रचंड प्रयत्नानंतर २००७ साली पहिल्यांदा लातूर-मुंबई एक्स्प्रेस धावली. एकूण १८ बोगी असलेल्या या रेल्वेची प्रवासी क्षमता १२७६ इतकी आहे. मुंबईला जाण्यासाठी लातूरकरांना सोयीचा दुसरा पर्याय नसल्याने या रेल्वेतून दररोज २२०० ते २३०० जण प्रवास करतात. यातले अनेक जण उभे राहून प्रवास करतात. असे असताना ही रेल्वे मागील आठवड्यापासून बीदरपासून धावू लागली असून, ती आता बीदर एक्स्प्रेस झाली आहे. आरक्षण मिळण्यास आधीच मारामार असताना आता बीदर, उदगीरची भर पडल्याने लातूरकर संतापले आहेत. या निर्णयाविरुद्ध मोठे आंदोलन उभारले जात आहे. लातूरचे खासदार सुनील गायकवाड आणि बीदरचे खासदार भगवंत खुब्बा या निर्णयावर आनंदी आहेत, तर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांसह इतर सर्वच पक्षांचे नेते विरोधात आहेत. मूळ प्रश्न बाजूला ठेवून वातावरण तापविण्याचेच हे दिवस आहेत. लातुरात तेच होताना दिसत आहे. आता बीदरपर्यंत धावणाऱ्या या रेल्वेला प्रतिसाद किती मिळतो हे पाहून बोग्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या १८ वरून २४ बोग्यांची रेल्वे या मार्गावरून धावू शकते. त्यामुळे या रेल्वेला २४ बोग्या कराव्यात आणि त्यातील काही बोग्या लातूर, काही उदगीरसाठी, तर काही बोग्या बीदरसाठी आरक्षित ठेवाव्यात हा सर्वांच्या सोयीचा मार्ग होऊ शकतो; परंतु अशी मागणी कोणीच करताना दिसत नाही. आम्ही मोठ्या कष्टाने आणलेली रेल्वे तुम्हाला कशासाठी द्यायची, हा भावनिक मुद्दा रेल्वेच्या कोर्टात कधीच टिकणारा नाही. ही रेल्वे लातूरला थांबवून ठेवण्यापेक्षा पुढे उदगीर-बीदरपर्यंत नेणे शक्य असेल तर व्यावहारिकदृष्ट्या ते योग्यच आहे. असे करून लातूरकरांवर अन्याय होऊ नये एवढेच. याच मागणीसाठी आंदोलन व्हायला हवे; पण तसे होताना दिसत नाही. भावनिक प्रश्न उपस्थित करून सर्वसामान्यांना कामाला लावायचे, हाच उद्योग सर्वत्र सुरू आहे. लातूरही त्याला अपवाद नाही. बीदर एक्स्प्रेसचा फायदा एकट्या बीदरला नाही तर, लातूर जिल्ह्याचाच मोठा भाग असलेल्या उदगीर, देवणी तालुक्यांनाही होणार आहे. लातूरनंतर जिल्ह्यात उदगीर हीच मोठी व्यापारपेठ आहे. त्यामुळे बोग्यांची संख्या वाढवा म्हणून बीदर, उदगीर आणि लातूरकरांनी एकत्रित आंदोलन करायला हवे. रक्ताचे नाते न तोडता अशी प्रेमाची हाक देऊन सर्वांचाच प्रश्न सुटू शकतो. मग तोडण्याचीच भाषा कशासाठी?