शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

भाष्य - रक्ताचे नाते दुरावू नये...

By admin | Updated: May 3, 2017 00:15 IST

लातूर आणि बीदर या दोन जिल्ह्यांची भाषा वेगळी. राज्य वेगळे. संस्कृतीही वेगळी. तरी दोन्ही जिल्ह्यांत एक रक्ताचे नाते आहे. म्हणूनच

लातूर आणि बीदर या दोन जिल्ह्यांची भाषा वेगळी. राज्य वेगळे. संस्कृतीही वेगळी. तरी दोन्ही जिल्ह्यांत एक रक्ताचे नाते आहे. म्हणूनच या दोन्ही जिल्ह्यांत रोटीबेटी व्यवहार चालतो. एवढे वेगळेपण असतानाही कोणाच्या संसारात बाधा येत नाही. बीदरमध्ये मराठी भाषा जेवढ्या प्रेमाने बोलली जाते तेवढाच आदर लातूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात कानडी भाषेला घराघरात दिला जातो. अशा या दोन जिल्ह्यांतील रक्ताच्या नात्यामध्ये अलीकडे दरी वाढत आहे. निमित्त केवळ एका रेल्वेचे आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रचंड प्रयत्नानंतर २००७ साली पहिल्यांदा लातूर-मुंबई एक्स्प्रेस धावली. एकूण १८ बोगी असलेल्या या रेल्वेची प्रवासी क्षमता १२७६ इतकी आहे. मुंबईला जाण्यासाठी लातूरकरांना सोयीचा दुसरा पर्याय नसल्याने या रेल्वेतून दररोज २२०० ते २३०० जण प्रवास करतात. यातले अनेक जण उभे राहून प्रवास करतात. असे असताना ही रेल्वे मागील आठवड्यापासून बीदरपासून धावू लागली असून, ती आता बीदर एक्स्प्रेस झाली आहे. आरक्षण मिळण्यास आधीच मारामार असताना आता बीदर, उदगीरची भर पडल्याने लातूरकर संतापले आहेत. या निर्णयाविरुद्ध मोठे आंदोलन उभारले जात आहे. लातूरचे खासदार सुनील गायकवाड आणि बीदरचे खासदार भगवंत खुब्बा या निर्णयावर आनंदी आहेत, तर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांसह इतर सर्वच पक्षांचे नेते विरोधात आहेत. मूळ प्रश्न बाजूला ठेवून वातावरण तापविण्याचेच हे दिवस आहेत. लातुरात तेच होताना दिसत आहे. आता बीदरपर्यंत धावणाऱ्या या रेल्वेला प्रतिसाद किती मिळतो हे पाहून बोग्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या १८ वरून २४ बोग्यांची रेल्वे या मार्गावरून धावू शकते. त्यामुळे या रेल्वेला २४ बोग्या कराव्यात आणि त्यातील काही बोग्या लातूर, काही उदगीरसाठी, तर काही बोग्या बीदरसाठी आरक्षित ठेवाव्यात हा सर्वांच्या सोयीचा मार्ग होऊ शकतो; परंतु अशी मागणी कोणीच करताना दिसत नाही. आम्ही मोठ्या कष्टाने आणलेली रेल्वे तुम्हाला कशासाठी द्यायची, हा भावनिक मुद्दा रेल्वेच्या कोर्टात कधीच टिकणारा नाही. ही रेल्वे लातूरला थांबवून ठेवण्यापेक्षा पुढे उदगीर-बीदरपर्यंत नेणे शक्य असेल तर व्यावहारिकदृष्ट्या ते योग्यच आहे. असे करून लातूरकरांवर अन्याय होऊ नये एवढेच. याच मागणीसाठी आंदोलन व्हायला हवे; पण तसे होताना दिसत नाही. भावनिक प्रश्न उपस्थित करून सर्वसामान्यांना कामाला लावायचे, हाच उद्योग सर्वत्र सुरू आहे. लातूरही त्याला अपवाद नाही. बीदर एक्स्प्रेसचा फायदा एकट्या बीदरला नाही तर, लातूर जिल्ह्याचाच मोठा भाग असलेल्या उदगीर, देवणी तालुक्यांनाही होणार आहे. लातूरनंतर जिल्ह्यात उदगीर हीच मोठी व्यापारपेठ आहे. त्यामुळे बोग्यांची संख्या वाढवा म्हणून बीदर, उदगीर आणि लातूरकरांनी एकत्रित आंदोलन करायला हवे. रक्ताचे नाते न तोडता अशी प्रेमाची हाक देऊन सर्वांचाच प्रश्न सुटू शकतो. मग तोडण्याचीच भाषा कशासाठी?