शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

भाष्य - भ्रष्टाचाराची वाळवी

By admin | Updated: June 2, 2017 00:14 IST

राजकीय नेत्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी सध्या सारा देश ढवळून निघाला आहे. पूर्वी भ्रष्टाचाराच्या लहानसहान घटना उघडकीस

राजकीय नेत्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी सध्या सारा देश ढवळून निघाला आहे. पूर्वी भ्रष्टाचाराच्या लहानसहान घटना उघडकीस येत असत. आता तर त्याचे रूपांतर कोट्यवधीच्या महाघोटाळ्यांमध्ये झाले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांचा जणू महापूरच आला आहे. मग ते हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांचे प्रकरण असो वा पश्चिम बंगालचा नारद आणि शारदा घोटाळा. थोडक्यात काय तर हा भ्रष्टाचार म्हणजे अघोषित सर्वपक्षीय कार्यक्रमच झाला असून वरपासून खालपर्यंत पसरत गेलेल्या या वाळवीने संपूर्ण देशाला पोखरून टाकले आहे. गावखेड्यांमध्ये सुद्धा अगदी रेशन कार्ड काढण्यापासून तर सातबाराचा उतारा मिळविण्यापर्यंत प्रत्येक काम चिरीमिरी दिल्याशिवाय होत नाही, अशी स्थिती आहे. भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर एवढी घट्ट रुजली आहेत की, निकट भविष्यात सर्वसामान्यांची यातून सुटका होईल, असे वाटत नाही. नीती आयोगाच्या सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या अकराव्या ‘इंडिया करप्शन स्टडी-२०१७’च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालातूनही नेमके हेच अधोरेखित झाले आहे. या वाळवीने सामान्य माणसांचे कंबरडे पार मोडले आहे. या अहवालानुसार गेल्या वर्षी ३१ टक्के लोकांना शाळा, न्यायालये, बँका आणि इतर कामांसाठी १० रुपयांपासून तर ५० हजार रुपयांपर्यंत लाच द्यावी लागली. अर्थात २००५ च्या तुलनेत ही टक्केवारी कमी असली तरी त्यातून लोकांची सुटका मात्र होऊ शकलेली नाही. लाचखोरीत यंदा कर्नाटकने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, पंजाब या राज्यांचा क्रमांक येतो. हिमाचल प्रदेश, केरळ आणि छत्तीसगडचे लोक त्यामानाने भाग्यवान म्हणायचे कारण तेथे सर्वात कमी भ्रष्टाचाराची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे हा अहवाल सरकारी कामात दिल्या जाणाऱ्या घुसखोरीवर आधारित आहे. खासगी क्षेत्रातही लाचखोरीने घुसखोरी केली आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दुसरे म्हणजे या अहवालाच्या तुलनात्मक अध्ययनात भ्रष्टाचार कमी झाला असल्याचे दिसत असले तरी अजून खूप काही करण्याची गरज आहे. त्याशिवाय जनजीवनावरील त्याचा व्यापक परिणाम कमी होणार नाही. सार्वजनिक सेवा ज्या सर्वसामान्य लोकांचा हक्क मानल्या जातात त्या प्राप्त करून घेण्याकरिताही या देशातील गरिबांना लाच द्यावी लागते, ही दुर्दैवी बाब आहे.