शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - आत्महत्त्यांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2017 00:21 IST

केंद्र आणि राज्य सरकारांकडून वेळोवेळी जाहीर होणारे कोट्यवधींचे पॅकेज आणि उपाययोजनांनंतरही देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या

केंद्र आणि राज्य सरकारांकडून वेळोवेळी जाहीर होणारे कोट्यवधींचे पॅकेज आणि उपाययोजनांनंतरही देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या थांबायचे नाव नाही. एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी दोन ते अडीच हजार शेतकरी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्त्या करतात. २०१५ मध्ये तर हा आकडा तीन हजारांवर गेला होता. या आत्महत्त्या रोखण्यासाठी देशव्यापी धोरण का नाही? याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता आणि आश्चर्य व्यक्त केले आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांमागील नेमक्या कारणांचा तपास करण्याचे आदेशही केंद्र तसेच राज्य शासनांना दिले आहेत. सातत्याने होणारा हवामान बदल, दर दोन-तीन वर्षांनी येणारा दुष्काळ, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने बळीराजा पार खचला आहे. गेल्या काही वर्षात नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढणे महत्त्वाचे आहे. परंतु दुर्दैवाने शासनाचे आर्थिक धोरण मात्र शेतकऱ्यांच्या विरोधात राहिले, असेच म्हणावे लागेल. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यासुद्धा दुसरे काय सांगतात? शेतकऱ्यांना आपल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार अजूनही मिळालेला नाही. त्यांच्या मालाला मिळणारी आधारभूत किंमत ही उत्पादन खर्चाच्या अत्यल्प असते. त्यामुळे तो अगतिक होऊन मृत्यूस कवटाळतो. शेतकऱ्यांना या चक्रव्यूहातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सरकारकडून होतच नाहीत असे नाही. पीककर्जाचे पुनर्गठन, मोफत बियाणे, अन्नसुरक्षा, पीकविमा अशा अनेक योजना वेळोवेळी जाहीर झाल्या आहेत. परंतु त्या केवळ तात्पुरत्या दिलासा देणाऱ्याच ठरत आहेत. कारण या उपाययोजनांची गांभीर्याने अंमलबजावणी होत नाही. यापैकी अनेक योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही, हे वास्तव नाकारता येणार नाही. यंदाच्या अर्थसंकल्पातही पीककर्जाच्या व्याजात कपात तसेच कृषिकर्जासाठी दहा लाख कोटींच्या तरतुदीसह शेतकऱ्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले आहेत खरे ! पण त्याचा लाभ गरजू शेतकऱ्यांना किती मिळणार याबाबत साशंकता आहे. त्यामुळे बळीराजाच्या आत्महत्त्या रोखण्यास ते पुरेसे नाही.