शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

अण्णांचा स्वप्नभंग

By admin | Updated: September 8, 2016 04:40 IST

आपले शिष्य असूनही अरविंद केजरीवालसुद्धा ‘त्याच वळणावर’ जावेत आणि त्यांच्या सभोवती घोटाळेबाजांचा राबता असावा याचे अण्णा हजारे यांना परम दु:ख झाल्याचे त्यांनीच बोलून दाखविले आहे

आपले शिष्य असूनही अरविंद केजरीवालसुद्धा ‘त्याच वळणावर’ जावेत आणि त्यांच्या सभोवती घोटाळेबाजांचा राबता असावा याचे अण्णा हजारे यांना परम दु:ख झाल्याचे त्यांनीच बोलून दाखविले आहे आणि त्यांना तसे वाटणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. काँग्रेस राजवटीत अण्णा हजारे यांच्या उपोषणास्त्राने केन्द्रातील संपुआचे आणि महाराष्ट्रातील आघाडीचे अशी दोन्ही सरकारे पुन:पुन्हा घायाळ होत होती. अण्णांना सावरणे हा तेव्हांचा त्या दोन्ही सरकारांचा मोठा कटकटीचा पण तरीही प्राधान्याचा विषय बनला होता. हजारे यांना दोन्ही आणि विशेषत: केन्द्रातील सरकार वचकून राहाते हे ज्ञात झाल्यानंतर ज्या अनेकांचा अण्णांना गराडा पडला त्यात किरण बेदी, अण्णा हजारे, भूषण पितापुत्र असे अनेक होते. यातील केजरीवाल मूलत: सनदी नोकर असल्याने लोकांच्या माहितीचे असण्याचे काही कारणच नव्हते. अण्णांच्या सान्निध्यात राहिल्याने त्यांना ओळख प्राप्त झाली. एकदा ती झाल्यावर मग केजरीवाल यांनी त्यांच्या सुप्त मनातील कार्यक्रमाला उजेडात आणण्यास सुरुवात केली. हा कार्यक्रम होता सक्रीय राजकारणात प्रवेश करुन सत्ताकारणास प्रारंभ करण्याचा. हजारे यांना ते अजिबातच मान्य नव्हते. सरकारबाहेर राहून सरकारवर सतत अंकुश ठेऊन आपण लोकांचे जेवढे भले करु शकतो तेवढे सरकारात जाऊन वा स्वत: सरकार बनवून करु शकत नाही, ही त्यांची मानसिकता होती. साहजिकच हजारे आणि केजरीवाल यांचे रस्ते तिथेच वेगळे झाले. केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीची स्थापना केली आणि एकदा नव्हे दोनदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता त्यांच्या ताबडतोबीच्या लक्ष्यावर पंजाब आणि गोवा ही राज्ये आहेत. पण तिकडे दिल्लीत त्यांच्या पक्षाचे सुमारे अर्धा डझन आमदार आणि पाव डझन मंत्री गैरव्यवहार ते गैर वर्तणूक अशा आरोपांमध्ये अडकले आहेत. अण्णांच्या दु:खाचे तेच महत्वाचे कारण आहे. केजरीवाल यांचे प्रारंभ काळातील सहकारी व आजचे टीकाकार योगेन्द्र यादव यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करताना केजरीवालांनी अण्णांना कधी गांभीर्याने घेतलेच नाही असे म्हटले आहे. याचा अर्थ अण्णा हजारे केजरीवालांना त्यांचा शिष्योत्तम धनुर्धारी चक्रधर श्रीकृष्ण मानीत असले म्हणून केजरीवाल अण्णांना सांदिपनी मानतात असे नाही.