शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
3
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
4
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
5
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
6
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
7
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
8
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
9
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
10
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
11
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
12
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
13
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
14
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
15
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
16
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
17
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
18
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
19
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
20
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

अण्णांचा स्वप्नभंग

By admin | Updated: September 8, 2016 04:40 IST

आपले शिष्य असूनही अरविंद केजरीवालसुद्धा ‘त्याच वळणावर’ जावेत आणि त्यांच्या सभोवती घोटाळेबाजांचा राबता असावा याचे अण्णा हजारे यांना परम दु:ख झाल्याचे त्यांनीच बोलून दाखविले आहे

आपले शिष्य असूनही अरविंद केजरीवालसुद्धा ‘त्याच वळणावर’ जावेत आणि त्यांच्या सभोवती घोटाळेबाजांचा राबता असावा याचे अण्णा हजारे यांना परम दु:ख झाल्याचे त्यांनीच बोलून दाखविले आहे आणि त्यांना तसे वाटणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. काँग्रेस राजवटीत अण्णा हजारे यांच्या उपोषणास्त्राने केन्द्रातील संपुआचे आणि महाराष्ट्रातील आघाडीचे अशी दोन्ही सरकारे पुन:पुन्हा घायाळ होत होती. अण्णांना सावरणे हा तेव्हांचा त्या दोन्ही सरकारांचा मोठा कटकटीचा पण तरीही प्राधान्याचा विषय बनला होता. हजारे यांना दोन्ही आणि विशेषत: केन्द्रातील सरकार वचकून राहाते हे ज्ञात झाल्यानंतर ज्या अनेकांचा अण्णांना गराडा पडला त्यात किरण बेदी, अण्णा हजारे, भूषण पितापुत्र असे अनेक होते. यातील केजरीवाल मूलत: सनदी नोकर असल्याने लोकांच्या माहितीचे असण्याचे काही कारणच नव्हते. अण्णांच्या सान्निध्यात राहिल्याने त्यांना ओळख प्राप्त झाली. एकदा ती झाल्यावर मग केजरीवाल यांनी त्यांच्या सुप्त मनातील कार्यक्रमाला उजेडात आणण्यास सुरुवात केली. हा कार्यक्रम होता सक्रीय राजकारणात प्रवेश करुन सत्ताकारणास प्रारंभ करण्याचा. हजारे यांना ते अजिबातच मान्य नव्हते. सरकारबाहेर राहून सरकारवर सतत अंकुश ठेऊन आपण लोकांचे जेवढे भले करु शकतो तेवढे सरकारात जाऊन वा स्वत: सरकार बनवून करु शकत नाही, ही त्यांची मानसिकता होती. साहजिकच हजारे आणि केजरीवाल यांचे रस्ते तिथेच वेगळे झाले. केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीची स्थापना केली आणि एकदा नव्हे दोनदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता त्यांच्या ताबडतोबीच्या लक्ष्यावर पंजाब आणि गोवा ही राज्ये आहेत. पण तिकडे दिल्लीत त्यांच्या पक्षाचे सुमारे अर्धा डझन आमदार आणि पाव डझन मंत्री गैरव्यवहार ते गैर वर्तणूक अशा आरोपांमध्ये अडकले आहेत. अण्णांच्या दु:खाचे तेच महत्वाचे कारण आहे. केजरीवाल यांचे प्रारंभ काळातील सहकारी व आजचे टीकाकार योगेन्द्र यादव यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करताना केजरीवालांनी अण्णांना कधी गांभीर्याने घेतलेच नाही असे म्हटले आहे. याचा अर्थ अण्णा हजारे केजरीवालांना त्यांचा शिष्योत्तम धनुर्धारी चक्रधर श्रीकृष्ण मानीत असले म्हणून केजरीवाल अण्णांना सांदिपनी मानतात असे नाही.