शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाह जेवले!

By admin | Updated: June 3, 2016 02:18 IST

अन्न आणि पाणी या कोणत्याही सजीवाच्या अत्यंत मूलभूत अशा जीवनावश्यक गरजा असल्याने कोणत्याही स्थितीत तो त्या भागवतच असतो.

अन्न आणि पाणी या कोणत्याही सजीवाच्या अत्यंत मूलभूत अशा जीवनावश्यक गरजा असल्याने कोणत्याही स्थितीत तो त्या भागवतच असतो. साहजिकच मग आज आपण आपली भूक भागवली, आपण जेवलो असे काही कोणी कोणाला आवर्जून सांगत बसत नाही. त्यामुळेच मग कोण, कुठे, कधी, का, कसा आणि कोणाबरोबर जेवला याची वाच्यता होण्याचे कारण नाही व तशी ती होतही नसते. आणि म्हणूनच जेव्हां भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी दलिताघरी जेवण केले याची छायाचित्रासकट बातमी होते तेव्हां त्याचा अर्थ एकच असतो आणि तो म्हणजे आजही दलितांना कुठेतरी निम्न किंवा दुय्यम स्तरावर नेऊन बसविणे आणि त्यांच्या समवेत भोजन घेऊन आपण त्यांना जणू उपकृत केले आहे असे त्यांना आणि जगालाही दाखवून देणे. जर तसे नसते आणि अमित शाह यांचे शाही भोजन हा प्रसार माध्यमांच्या नजरेत आकर्षणाचा आणि कुतुहलाचा विषय असता तर रोजच त्यांनी न्याहारी कुठे केली, दुपारचे भोजन कुठे केले आणि रात्रीभोज घेताना त्यांच्या समवेत कोण होते याच्याही बातम्या झाल्या असत्या. पण त्या होत नाहीत. पण अशी चातुर्वर्णाश्रमी मानसिकता बाळगणारे अमित शाह एकटे आहेत म्हणावे तर तसेही नाही. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विदर्भातील कलावतीचा घेतलेला पाहुणचार आणि उत्तर प्रदेशात असेच एका दलिताघरी स्वीकारलेले भोजन ही याच मानसिकतेची उदाहरणे. राहुल गांधी यांनी एका दलिताघरी निवास केल्यानंतर विशिष्ट प्रकारच्या सुगंधी साबणाने आंघोळ केल्याची कडवट टीका मायावती यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर देशाचे माजी राष्ट्रपती के.आर.नारायणन यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली तेव्हां देशाचे पहिले दलित राष्ट्रपती अशा बातम्या झळकल्या. पण त्यांनी त्या यथार्थपणे नामंजूर केल्या. विद्वत्तेच्या जोरावर त्यांना देशातील सर्वोच्च पद लाभले होते. पण ते अमान्य करण्यासाठी त्यांच्यातील दलितत्वाचा उल्लेख करणे आणि अमित शाह यांच्या दलिताघरच्या जेवणाला अकारण महत्व देणे यामागील मानसिकता एकसारखीच आहे.