शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

अमित शाह जेवले!

By admin | Updated: June 3, 2016 02:18 IST

अन्न आणि पाणी या कोणत्याही सजीवाच्या अत्यंत मूलभूत अशा जीवनावश्यक गरजा असल्याने कोणत्याही स्थितीत तो त्या भागवतच असतो.

अन्न आणि पाणी या कोणत्याही सजीवाच्या अत्यंत मूलभूत अशा जीवनावश्यक गरजा असल्याने कोणत्याही स्थितीत तो त्या भागवतच असतो. साहजिकच मग आज आपण आपली भूक भागवली, आपण जेवलो असे काही कोणी कोणाला आवर्जून सांगत बसत नाही. त्यामुळेच मग कोण, कुठे, कधी, का, कसा आणि कोणाबरोबर जेवला याची वाच्यता होण्याचे कारण नाही व तशी ती होतही नसते. आणि म्हणूनच जेव्हां भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी दलिताघरी जेवण केले याची छायाचित्रासकट बातमी होते तेव्हां त्याचा अर्थ एकच असतो आणि तो म्हणजे आजही दलितांना कुठेतरी निम्न किंवा दुय्यम स्तरावर नेऊन बसविणे आणि त्यांच्या समवेत भोजन घेऊन आपण त्यांना जणू उपकृत केले आहे असे त्यांना आणि जगालाही दाखवून देणे. जर तसे नसते आणि अमित शाह यांचे शाही भोजन हा प्रसार माध्यमांच्या नजरेत आकर्षणाचा आणि कुतुहलाचा विषय असता तर रोजच त्यांनी न्याहारी कुठे केली, दुपारचे भोजन कुठे केले आणि रात्रीभोज घेताना त्यांच्या समवेत कोण होते याच्याही बातम्या झाल्या असत्या. पण त्या होत नाहीत. पण अशी चातुर्वर्णाश्रमी मानसिकता बाळगणारे अमित शाह एकटे आहेत म्हणावे तर तसेही नाही. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विदर्भातील कलावतीचा घेतलेला पाहुणचार आणि उत्तर प्रदेशात असेच एका दलिताघरी स्वीकारलेले भोजन ही याच मानसिकतेची उदाहरणे. राहुल गांधी यांनी एका दलिताघरी निवास केल्यानंतर विशिष्ट प्रकारच्या सुगंधी साबणाने आंघोळ केल्याची कडवट टीका मायावती यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर देशाचे माजी राष्ट्रपती के.आर.नारायणन यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली तेव्हां देशाचे पहिले दलित राष्ट्रपती अशा बातम्या झळकल्या. पण त्यांनी त्या यथार्थपणे नामंजूर केल्या. विद्वत्तेच्या जोरावर त्यांना देशातील सर्वोच्च पद लाभले होते. पण ते अमान्य करण्यासाठी त्यांच्यातील दलितत्वाचा उल्लेख करणे आणि अमित शाह यांच्या दलिताघरच्या जेवणाला अकारण महत्व देणे यामागील मानसिकता एकसारखीच आहे.