शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा

By admin | Updated: January 29, 2017 00:33 IST

दोन महिन्यांपूर्वी मी नोकरीनिमित्त दुबईमध्ये स्थायिक झालो. नवीन देश, नवीन लोक, नवीन भाषा... सर्व काही नवीन. पहिल्यांदाच देशाबाहेर आणि तेही राहण्यासाठी जात असल्याने खूप

- प्रवीण जोगळेदोन महिन्यांपूर्वी मी नोकरीनिमित्त दुबईमध्ये स्थायिक झालो. नवीन देश, नवीन लोक, नवीन भाषा... सर्व काही नवीन. पहिल्यांदाच देशाबाहेर आणि तेही राहण्यासाठी जात असल्याने खूप टेन्शन होतं. दुबईमध्ये भारतीयांचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे जास्त अडचणी येत नाहीत, असं ऐकून होतो. मात्र, त्याचा पुरेपूर अनुभव मी घेतला आहे. दुबईमध्ये जवळजवळ ६० टक्के भारतीय असल्याने मी आपल्याच देशात असल्याचं अनुभवत आहे.मात्र, तरीही कुटुंबीयांची, मित्रांची आठवण येतच राहते. त्यात आपले सण, उत्सव यापासून दूर असल्याने केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून काय तो आनंद मिळवावा लागतो. अशातच नुकताच झालेला आपला प्रजासत्ताक दिन मी अत्यंत वेगळ्या प्रकारे साजरा केला. कदाचित मी देशाबाहेर असल्याने असेल, परंतु यंदाच्या २६ जानेवारीला मी भारतीय असल्याचा अभिमान खूप वेगळा अनुभव देणारा ठरला. २४ जानेवारीच्या संध्याकाळी माझ्या मित्राने प्रजासत्ताक दिनी बुर्ज खलिफा इमारतीवर भारताच्या तिरंग्याची रोषणाई होणार असल्याचे कळवले. त्याला त्याचे फोटो आणि व्हिडीओ पाहिजे होते. आधी वाटलं असं काही नसेल. परंतु, जेव्हा आॅफिसमध्ये याबाबत मित्रांना विचारलं असता बातमी पक्की असल्याचं कळलं. तेव्हा मात्र, खूप उत्सुकता लागली. शिवाय यंदाच्या प्रजासत्ताक दिनी यूएईचा प्रिन्स भारतात प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित असल्याने बुर्ज खलिफा इमारतीजवळ नक्कीच जल्लोष असणार अशी खात्री पटली. त्यानुसार सर्व प्लानिंग करून ठरवलेल्या वेळेला मी बुर्ज खलिफा इमारतीजवळ गेलो आणि चकितच झालो. शेकडो भारतीय ‘भारतमाता की जय’ आणि ‘जय हिंद’ अशा घोषणा देत होते. इतकंच नाही, तर रस्त्यावरील बहुतेक दुकानांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त सजावट करण्यात आली होती. भारताचा तिरंगा दुकानांबाहेर फडकत होता. एक वेळ मी भारतातच फिरत असल्याचा भास झाला. बुर्ज खलिफा परिसरात पोहोचताच क्षणी इमारतीवर लेझर शो सुरू झाला आणि क्षणात माझ्या डोळ्यांसमोर त्या गगनचुंबी इमारतीवर तिरंगा झळकू लागला. तो क्षण तर कधीच विसरता येणार नाही. मी पूर्णपणे गुंग झालो होतो. मी दुबईत असल्याचा विसर पडला. सुरुवातीला दबकत दबकत आलेलो मी अचानकपणे अभिमानाने त्या भव्य इमारतीकडे पाहत होतो आणि नकळत मी म्हणालो ‘भारतमाता की जय...’शिवाय या वेळी आॅस्कर विजेत्या ए.आर. रेहमान यांचं ‘जय हो’ हे गाणं वाजत होतं. सर्व काही अद्भुत होतं माझ्यासाठी. माझ्या डोळ्यांतून अचानकपणे अश्रू वाहू लागले होते. भारतीय असल्याचा खूप अभिमान वाटत होता. दुसरीकडे, उपस्थित भारतीय उत्स्फूर्तपणे घोषणा देत असताना मी केवळ तो क्षण अनुभवत होतो. माझ्या तोंडून शब्दच पडत नव्हते. शाळेतला प्रजासत्ताक दिन सतत आठवत होता. आज परक्या देशात हा दिवस साजरा करताना आपले पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांचं म्हणणं खरंच पटलं, ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा...’

(लेखक नोकरीनिमित्त दुबईत स्थायिक आहेत.)