शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: पाकिस्तानवर सडकून टीका करणारे असदुद्दीन ओवैसी झाले अवघ्या भारताचे हिरो!
2
मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ‘त्या’ वक्तव्याने वाद; विरोधकांकडून टीका; भाजपची सारवासारव
3
पदवीच्या दुसऱ्या यादीचा कट ऑफ घटला; १० ते १५ टक्क्यांची घट, विद्यार्थ्यांना दिलासा
4
राज्यात चार हजार १३५ चार्जिंग स्टेशनसाठी नवीन ईव्ही पॉलिसीनुसार सबसिडी
5
अग्रलेख: नाशिक-त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला उरले फक्त ७९१ दिवस!
6
‘स्नॅपचॅट’वरील ओळख विद्यार्थिनीला महागात! अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
7
४० लॉ कॉलेजांना प्रवेशबंदी; मान्यताप्राप्त प्राध्यापक भरती न केल्यास लाखाचा दंड
8
बीड: पालखी महामार्गावर टेम्पो व रिक्षाचा भीषण अपघात, पती-पत्नीसह एकूण चार जण ठार
9
IPL 2025 PBKS In Final: एक चूक नडली! कॅच सुटला तिथंच MI च्या हातून मॅचही निसटली (VIDEO)
10
महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण
11
यंदा नवा चॅम्पियन! MI 'आउट'; PBKS ला फायनलमध्ये नेत श्रेयस अय्यरनं रचला इतिहास
12
रायगड किल्ल्यावर उत्खननात आढळले 'यंत्रराज' सौम्ययंत्र खगोलशास्त्रीय उपकरण
13
IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास
14
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
15
IPL 2025 Qualifier 2 : हार्दिक पांड्यानं Josh Inglis ची विकेट घेतली अन् अंपायर आला चर्चेत, कारण...
16
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
17
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
18
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
19
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
20
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल

साऱ्यांनाच ‘नकोशी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 03:26 IST

तूर्तास तरी आयपीएल नावाची मर्यादित षटकांची क्रिकेटची स्पर्धा देशातील बव्हंशी राज्यांना ‘नकोशी’ ठरत असावी असे अनुमान काढण्यास हरकत नाही

तूर्तास तरी आयपीएल नावाची मर्यादित षटकांची क्रिकेटची स्पर्धा देशातील बव्हंशी राज्यांना ‘नकोशी’ ठरत असावी असे अनुमान काढण्यास हरकत नाही. क्रिकेटच्या विश्वचषकाच्या स्पर्धांमध्ये अधूनमधून जो कथित देशाभिमान वा देशप्रेम दिसून येते आणि अशा स्पर्धेतील जय-पराजयावर खेळाडूंच्या निकटच्या भवितव्याचाही फैसला होत असतो तसे आयपीएलबाबत होत नाही. तरीही या स्पर्धा लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे ज्यांना केवळ क्रिकेट या खेळातच स्वारस्य आहे आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडंूचा खेळ एकाच वेळी पाहाण्यात रुची आहे असे लोक आयपीएलच्या सामन्यांना गर्दी करतात वा छोट्या पडद्याला चिकटून बसतात. अशा सामन्यांचे पहिले नामकरण ‘सर्कस’ असे करण्यात आले होते आणि कोणत्याही सर्कशीला मोठी पूर्वतयारी आवश्यक असते. आज देशात जे सामने खेळवले जात आहेत त्यांची तयारीदेखील बऱ्याच अगोदरपासून सुरु होती. त्या काळात देशाच्या एक तृतीयांश भागात कमालीचा भाषण दुष्काळ पडणार असल्याची शक्यता कोणाच्याही मनाला स्पर्शून जाणेही अशक्य होते. पण दुर्दैवाने तो पडला आणि आयपीएलच्या महाराष्ट्रात खेळविल्या जाणाऱ्या सामन्यांना सर्वात आधी विरोध झाला. एका जनहित याचिकेच्या निमित्ताने मग मुंबई उच्च न्यायालयाने सरकार तसेच क्रिकेट नियामक मंडळ यांना धारेवर धरण्यास सुरुवात केली. ज्या मैदानावर सामने होणार ती मैदाने हिरवीगार होण्यासाठी व ते हिरवेपण अबाधित राखण्यासाठी लाखो लिटर पाण्याचा वापर म्हणजेच न्यायालयाच्या भाषेत नासाडी होणार तेव्हां या सामन्यांना मुबंईबाहेर आणि पर्यायाने महाराष्ट्राबाहेर हुसकावून लावा असा सज्जड दमच न्यायालयाने भरला. लाखो-कोटी रुपयांच्या उलाढालीचा संबंध असल्याने आयोजकांचे धाबेच दणाणले. मुंबईचा सामना रद्द केला गेला खरा पण आयोजकांनी मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी सामने व्हावेत हा प्रयत्न अजून पूर्णपणे सोडलेला नाही. दरम्यान काही सामने राजस्थानात खेळविण्याची तडजोड आयोजकांनी स्वीकारली. पण आता तेथील उच्च न्यायालयानेही राज्य सरकारसकट पाण्याशी संबंधित सर्व यंत्रणांना जाब विचारला असून राजस्थानातही आयपीएलच्या सामन्यांना पाय ठेवता येणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.