शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

सर्वस्पर्शी

By admin | Updated: December 23, 2015 23:24 IST

स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही भारतीय घटनेतील तीन मूलभूत तत्त्वे. यातील बंधुता हे तत्त्व भारतीय समाजात किती खोलपर्यंत रुजले आहे

स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही भारतीय घटनेतील तीन मूलभूत तत्त्वे. यातील बंधुता हे तत्त्व भारतीय समाजात किती खोलपर्यंत रुजले आहे, याची प्रचिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यांमधून येत आहे. राजकारणात अजातशत्रू राहणे तसे फार कठीण; पण आपल्या उण्यापुऱ्या साडेपाच दशकांच्या राजकारणात शरद पवार यांनी काही मुलभूत तत्त्वांची जपणूक केली. तात्त्विक, वैचारिक मतभेद असले, तरी वैयक्तिक संबंधांवर परिणाम होऊ द्यायचा नाही, या मूल्याची पेरणी या जाणत्या राजाने आयुष्यभर केली. एकमेकांबद्दल कटुता न बाळगता परस्परांप्रति आदर व सन्मान बाळगणारी व सद्भाव जपणारी राजकीय संस्कृती त्यांनी विकसित केली. दिल्लीत झालेल्या अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी देशातील सर्वोच्च नेत्यांची उपस्थिती पुरेशी बोलकी आहे. या सगळ्यांमधील विचारधारा वेगवेगळ्या असल्या, तरी शरद पवार यांच्याशी मैत्रीचा अनुबंध एक होता. जाणता राजा, लोकनेता, महानायक आदी अनेक उपाध्यांनी शरद पवार यांना गौरविण्यात येते; मात्र, ही सगळी विशेषणे थिटी पडावीत, असे त्यांचे अमीट कर्तृत्व आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाच्या ५५ वर्षांच्या प्रवासातील प्रत्येक पान शरद पवार यांच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण राहील. यशवंतराव चव्हाण यांचा सुसंस्कृत वारसा सांगत नव्या पिढीला विकासाभिमुख राजकारणाचा वसा देणाऱ्या या नेत्याने राजकारणातील सभ्यता व शालीनता कायम जपली. राज्य आणि केंद्रात अनेक पदे भूषविताना त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. विवेकवादाची कास धरत पुरोगामित्वाची महाराष्ट्राची परंपरा जपली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून सत्ता जाण्याचीही तमा बाळगली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देऊन देशापुढे आदर्श ठेवला. महाराष्ट्राच्या हिताचा आणि देशाच्या भवितव्याचा विचार करून धडाडीने अनेक निर्णय घेतले. त्यांच्यावर अनेकदा जहरी टीका झाल्या, प्रहार झाले. वेदनादायी आरोपांची राळ उठली. मात्र, विचलित न होता त्यांनी आपली वाटचाल अविरत चालू ठेवली. विरोधकांवरही त्यांनी कधी सभ्यतेच्या मर्यादा सोडून टीका केली नाही. सत्तेत असो किंवा नसो, ते सदैव कार्यरत राहिले. त्यांचे कर्तृत्व प्रांतांच्या सीमा ओलांडून गेले. त्यामुळेच विरोधी पक्षात असतानाही राजीव गांधी असोत की चंद्रशेखर किंवा अगदी अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्यावर वेळोवेळी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या. राजीव गांधी-संत लोंगोवाल कराराचे शिल्पकार शरद पवार होते. रामजन्मभूमीच्या प्रश्नावर दोन्ही बाजूंना एकत्र आणण्याची किमया शरद पवार यांनीच केली होती. किल्लारीत त्यांनी केलेल्या अद्वितीय कामाची आठवण ठेवून भुज भूकंपानंतर वाजपेयींनी आपत्ती व्यवस्थापन समितीचे नेतृत्व त्यांच्याकडे विश्वासाने सोपविले. शेतकरी, कष्टकरी, कामगार हितैषी भूमिका ठेवतानाच नव्यायुगाची, आधुनिक तंत्रज्ञानाची हाक ओळखून उद्योजकतेला प्रोत्साहन दिले. साखर कारखानदारी, पोल्ट्री, सूतगिरण्या आदी क्षेत्रात देशात आणि विदेशातही कोणते वेगवेगळे प्रयोग झाले आहेत, याचा सातत्याने अभ्यास केला. त्यांचे काही निर्णय चुकलेही असतील, त्यांच्या भूमिकांबद्दल संशयही निर्माण झाला असेल; पण म्हणून त्यांचे असीम कर्तृत्व व योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. आज पंचाहत्तराव्या वर्षीही त्याच ऊर्जेने, त्याच उमेदीने, त्याच उर्मीने काम करणाऱ्या शरद पवारांच्या कार्यक्षमतेचे अनेक किस्से सांगितले जातात. संपूर्ण महाराष्ट्र उभा-आडवा माहीत असणारा दुसरा नेता नाही, असे उगीच म्हटले जात नाही एवढा त्यांचा अफाट लोकसंग्रह आणि आवाका आहे. शरद पवार यांचा सत्कार म्हणजे प्रगतिशील महाराष्ट्राच्या प्रवासातील एक सोनेरी पान आहे. लोकमत माध्यम समूहातर्फे आज त्यांचा सत्कार होत आहे. राज्य आणि देशात झालेले व होत असलेले शरद पवार यांचे सत्कार त्यांनी आजवर जोडलेल्या माणसांचा, मैत्रीच्या जपणुकीचा प्रत्यय देत आहेत. विचारधारांचा संघर्ष वैयक्तिक पातळीवर आल्याने निर्माण झालेल्या राजकीय अहिष्णुततेच्या वातावरणात शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी सत्कारांमुळे निकोप राजकीय वातावरण निर्माण झाले आहे. देशवासियांना शरद पवार यांनी जणु ही भेट दिली आहे. - विजय बाविस्कर