शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दलालमुक्तीचा ‘अकोला’ पॅटर्न

By admin | Updated: January 24, 2017 01:05 IST

कधीकधी एखादे संकटही पर्वणी ठरते. अकोलेकर नागरिक आणि जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर नुकतेच असेच एक संकट कोसळले.

कधीकधी एखादे संकटही पर्वणी ठरते. अकोलेकर नागरिक आणि जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर नुकतेच असेच एक संकट कोसळले. अकोला शहरातील मुख्य भाजी मंडईतील अतिक्रमण महापालिकेने हटविले. त्यामध्ये वर्षानुवर्षांपासून भाजीपाला अडतीच्या व्यवसायावर कब्जा करून बसलेल्या अडत्यांची दुकाने तुटली. त्याच्या निषेधार्थ त्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. अडत्यांच्या बेमुदत बंदमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांची कोंडी सुरू झाली. त्यामुळे पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला दुकाने थाटून भाजीपाला विक्री सुरू केली. त्याचा परिणाम असा झाला, की ग्राहकांना ताजा भाजीपाला स्वस्तात मिळू लागला, तर शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळू लागले. ही व्यवस्था दोन्ही घटकांसाठी सोयीची ठरल्यामुळे, अडत्यांना बाजूला सारून, हीच व्यवस्था कायम करावी, अशी मागणी सर्वसामान्य ग्राहक आणि शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. या मागणीत तसे नवीन असे काही नाही. इतर काही राज्यांमध्ये अशी व्यवस्था अनेक वर्षांपासून सुरू आहे. सर्वप्रथम पंजाबमध्ये ‘अपना बजार’ या नावाखाली शेतकरी व ग्राहकांना थेट जोडणारी व्यवस्था सुरू झाली. पुढे १९९९ मध्ये आंध्र प्रदेशने ‘रयतू बाजार’ या नावाने ती अंगिकारली. महाराष्ट्रात फडणवीस सरकारनेही तसे सूतोवाच केले आहे; मात्र अद्याप तरी ठोस असे काही निष्पन्न झालेले नाही. नफेखोर मध्यस्थांना हटवले म्हणजे आपोआपच शेतकरी व ग्राहक या दोन्ही घटकांना लाभ मिळेल, ही मांडणी ऐकायला फार छान वाटते. संपत्तीचे समान वाटप किंवा बड्या चलनी नोटा बंद केल्या की काळा पैसा आपोआप बाहेर येईल, अशा तऱ्हेची ही मांडणी! अशा मांडण्या कागदावर किंवा ऐकायला फार आकर्षक वाटतात. प्रत्यक्ष अंमलबजावणी दरम्यान काय होते, याचा अनुभव संपूर्ण भारतवर्षाने नुकताच घेतला. कोणत्याही व्यवस्थेच्या यशस्वीतेसाठी तिची शाश्वती फार महत्त्वाची असते. अकोल्याचेच उदाहरण घ्या. गरजेपोटी एक तात्पुरती व्यवस्था आपोआप उभी झाली. सध्याच्या घडीला ती उभय घटकांना लाभदायक वाटत आहे; पण ती आहे त्या स्वरूपात कायमस्वरूपी टिकू शकेल का? या व्यवस्थेमध्ये भाजीपाला उत्पादकाला संपूर्ण दिवसभर बाजारात बसून आपल्या मालाची विक्री करावी लागत आहे. काही अपवाद वगळल्यास शेतकरी हे वर्षभर नक्कीच करू शकणार नाहीत; कारण उत्पादन हे त्यांचे प्रमुख काम आहे. थोडक्यात, मध्यस्थ हा घटक पूर्णपणे बाजूला सारून उत्पादक व ग्राहकांना थेट जोडणे, ही व्यवस्था अत्यंत लाभदायक वाटत असली, तरी ती प्रत्यक्षात आणणे वाटते तेवढे सोपे नाही. याचा अर्थ शेतकरी व ग्राहकांना अडत्यांच्या मनमानीचे बळी ठरू द्यावे, असाही होत नाही. नेमकी इथे प्रशासनाला त्याची भूमिका अदा करावी लागेल. आंध्र प्रदेशमध्ये प्रशासनाने ती भूमिका बजावली आहे. म्हणूनच त्या राज्यात जवळपास वीस वर्षांपासून ‘रयतू बाजार’ ही व्यवस्था यशस्वीरीत्या कार्यरत आहे. अशा बाजारांसाठी जागा उपलब्ध करून देणे, जागांवर कुणी कायमस्वरूपी मक्तेदारी निर्माण करणार नाही याची दक्षता घेणे, शेतकऱ्यांना संरक्षण देणे, किमान पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, आदी जबाबदाऱ्या प्रशासनाला उचलाव्या लागतील. ते झाल्यास ‘रयतू बाजार’सारखी व्यवस्था महाराष्ट्रातही यशस्वी होऊ शकते; पण त्यासाठी पुढाकार घेणार कोण? योगायोगाने अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे आंध्र प्रदेशातील आहेत. त्यांना विकासाची दृष्टी आहे. त्यांनी मनावर घेतल्यास दलालांपासून मुक्तीचा ‘अकोला पॅटर्न’ उभा होऊ शकतो. - रवी टाले