शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

हवाई क्रांती

By admin | Updated: June 17, 2016 09:08 IST

आयुष्यात किमान एकदा तरी विमान प्रवास करण्याचे बहुतांश भारतीयांचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल अशी आशा आता निर्माण झाली आहे.

आयुष्यात किमान एकदा तरी विमान प्रवास करण्याचे बहुतांश भारतीयांचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल अशी आशा आता निर्माण झाली आहे. केंद्रीय मत्रिमंडळाने बहुप्रतीक्षित नागरी विमान वाहतूक धोरणास मंजुरी दिल्याने अनेकांची स्वप्नपूर्ती तर होऊच शकेल, शिवाय त्यातून देशात हवाई क्रांतीदेखील होऊ शकेल. सरकारच्या ताज्या निर्णयामुळे आता देशात तासाभराच्या विमान प्रवासासाठी अवघे २५०० तर अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी अवघे १२०० रुपये भाडे आकारले जाणार आहे. खरं पाहू जाता भारतासारख्या खंडप्राय देशात आता विमान प्रवास ही चैनीची नव्हे, तर गरजेची बाब बनली आहे. मात्र दुर्दैवाने आज तरी विमान प्रवास ही मुठभर लोकांचीच मक्तेदारी आहे. प्रचंड अंतरे आणि रस्त्यांची व रेल्वेगाड्यांची दयनीय अवस्था, या पार्श्वभूमीवर जलद आणि तुलनात्मकरीत्या सुरक्षित प्रवासी वाहतुकीसाठी विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणणे अत्यंत निकडीचे होते. आजच्या घडीला देशात एकूण ४८२ विमानतळ असले तरी त्यापैकी केवळ ७७ विमानतळांवरूनच नियमित विमानसेवा उपलब्ध आहे. विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणून, उर्वरित विमानतळांवरूनही नियमित विमानसेवा सुरू केल्यास, रेल्वे आणि महामार्गांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. खरं म्हटलं तर केन्द्रातील मोदी सरकारने बुलेट टे्रनच्या खर्चिक स्वप्नाच्या मागे लागण्यापेक्षा विमान सेवेचे धोरण अगोदरच अंमलात आणायला हवे होते. एक तर त्यासाठी आवश्यक विमानतळांची पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात आधीच उपलब्ध आहे. गरज आहे ती त्या ठिकाणी विस्तारीकरण व आधुनिकीकरण करण्याची! त्यासाठी बुलेट टे्रनच्या तुलनेत निश्चितच कमी खर्च लागेल. अमेरिकेसारख्या प्रगत देशाला अतिवेगवान रेल्वेचे जाळे उभारणे, तंत्रज्ञान व वित्त पुरवठा या दोन्ही अंगांनी कठीण नाही; पण तरीही तो देश बुलेट टे्रनच्या मागे लागला नाही. आकाराच्या बाबतीत आपली तुलना जपान नव्हे, तर अमेरिकेसोबतच होऊ शकते. त्यामुळे आपणही अतिजलद प्रवासासाठी जपानप्रमाणे बुलेट टे्रनचा नव्हे, तर अमेरिकेप्रमाणे विमानसेवेचा अंगिकार करणेच सयुक्तिक होते. अर्थात सरकारने निर्णय घेतला म्हणजे लगेचच देशांतर्गत हवाई प्रवासाची सारे दालने खुली होतील असे नाही. अशी सेवा सुरु करण्यासाठी पूर्वापार चालत आलेले कठोर निकष अत्यंत सौम्य करण्याचा निर्णय घेऊन सरकारने आपले काम केले आहे. आता त्याला प्रतिसाद देणे ही हवाई प्रवासी सेवेत कार्यरत असलेल्या वा कार्यप्रवण होऊ इच्छिणाऱ्या खासगी क्षेत्राची जबाबदारी आहे. खासगी क्षेत्राच्या प्रतिसादावरच जनसामान्यांची स्वप्नपूर्ती अवलंबून राहाणार आहे.