शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
2
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
3
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
4
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
5
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
6
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
7
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
8
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
9
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
10
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
11
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
12
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
13
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
15
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
16
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
17
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
18
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
19
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
20
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल

हवाई क्रांती

By admin | Updated: June 17, 2016 09:08 IST

आयुष्यात किमान एकदा तरी विमान प्रवास करण्याचे बहुतांश भारतीयांचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल अशी आशा आता निर्माण झाली आहे.

आयुष्यात किमान एकदा तरी विमान प्रवास करण्याचे बहुतांश भारतीयांचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल अशी आशा आता निर्माण झाली आहे. केंद्रीय मत्रिमंडळाने बहुप्रतीक्षित नागरी विमान वाहतूक धोरणास मंजुरी दिल्याने अनेकांची स्वप्नपूर्ती तर होऊच शकेल, शिवाय त्यातून देशात हवाई क्रांतीदेखील होऊ शकेल. सरकारच्या ताज्या निर्णयामुळे आता देशात तासाभराच्या विमान प्रवासासाठी अवघे २५०० तर अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी अवघे १२०० रुपये भाडे आकारले जाणार आहे. खरं पाहू जाता भारतासारख्या खंडप्राय देशात आता विमान प्रवास ही चैनीची नव्हे, तर गरजेची बाब बनली आहे. मात्र दुर्दैवाने आज तरी विमान प्रवास ही मुठभर लोकांचीच मक्तेदारी आहे. प्रचंड अंतरे आणि रस्त्यांची व रेल्वेगाड्यांची दयनीय अवस्था, या पार्श्वभूमीवर जलद आणि तुलनात्मकरीत्या सुरक्षित प्रवासी वाहतुकीसाठी विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणणे अत्यंत निकडीचे होते. आजच्या घडीला देशात एकूण ४८२ विमानतळ असले तरी त्यापैकी केवळ ७७ विमानतळांवरूनच नियमित विमानसेवा उपलब्ध आहे. विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणून, उर्वरित विमानतळांवरूनही नियमित विमानसेवा सुरू केल्यास, रेल्वे आणि महामार्गांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. खरं म्हटलं तर केन्द्रातील मोदी सरकारने बुलेट टे्रनच्या खर्चिक स्वप्नाच्या मागे लागण्यापेक्षा विमान सेवेचे धोरण अगोदरच अंमलात आणायला हवे होते. एक तर त्यासाठी आवश्यक विमानतळांची पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात आधीच उपलब्ध आहे. गरज आहे ती त्या ठिकाणी विस्तारीकरण व आधुनिकीकरण करण्याची! त्यासाठी बुलेट टे्रनच्या तुलनेत निश्चितच कमी खर्च लागेल. अमेरिकेसारख्या प्रगत देशाला अतिवेगवान रेल्वेचे जाळे उभारणे, तंत्रज्ञान व वित्त पुरवठा या दोन्ही अंगांनी कठीण नाही; पण तरीही तो देश बुलेट टे्रनच्या मागे लागला नाही. आकाराच्या बाबतीत आपली तुलना जपान नव्हे, तर अमेरिकेसोबतच होऊ शकते. त्यामुळे आपणही अतिजलद प्रवासासाठी जपानप्रमाणे बुलेट टे्रनचा नव्हे, तर अमेरिकेप्रमाणे विमानसेवेचा अंगिकार करणेच सयुक्तिक होते. अर्थात सरकारने निर्णय घेतला म्हणजे लगेचच देशांतर्गत हवाई प्रवासाची सारे दालने खुली होतील असे नाही. अशी सेवा सुरु करण्यासाठी पूर्वापार चालत आलेले कठोर निकष अत्यंत सौम्य करण्याचा निर्णय घेऊन सरकारने आपले काम केले आहे. आता त्याला प्रतिसाद देणे ही हवाई प्रवासी सेवेत कार्यरत असलेल्या वा कार्यप्रवण होऊ इच्छिणाऱ्या खासगी क्षेत्राची जबाबदारी आहे. खासगी क्षेत्राच्या प्रतिसादावरच जनसामान्यांची स्वप्नपूर्ती अवलंबून राहाणार आहे.