शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरची चित्रनगरी

By admin | Updated: March 2, 2017 00:06 IST

अहमदनगरसारख्या ग्रामीण भागातून फॅन्ड्री, सैराट, ख्वाडा, घुमा हे चित्रपट साकारले.

अहमदनगरसारख्या ग्रामीण भागातून फॅन्ड्री, सैराट, ख्वाडा, घुमा हे चित्रपट साकारले. खेड्यातील मुले दिग्दर्शक बनताहेत व आपल्या गावातच चित्रपटाची निर्मिती करताहेत. चित्रपटसृष्टी व सरकार या दोघांनाही या बदलाची नोंद घ्यावी लागेल. त्यासाठी सुविधा द्यावा लागतील. कोल्हापूरची कलानगरी म्हणून ओळख आहे. एकेकाळी या कलानगरीने दर्जेदार कलावंत व चित्रपट दिले. मुंबई ही तर सिनेमाची मायानगरीच आहे. मात्र, आता हा सिनेमा नगरसारख्या ग्रामीण भागातही बनू लागला आहे व तो दखलपात्रही ठरतो आहे. गत महिन्यात पुण्यात झालेल्या १५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) नगरच्या मातीत तयार झालेला ‘घुमा’ या चित्रपटाला ‘बेस्ट आॅडियन्स अवॉर्ड’ मिळाला. नगरला कलेचा जुनाच वारसा आहे. रंगभूमीवर नगरच्या शाहू मोडक यांनी सर्वप्रथम कृष्णाची भूमिका साकारली. कृष्ण हा मोडकांच्या रूपात प्रेक्षकांनी प्रथम पाहिला.नाटककार प्रा. मधुकर तोरडमल यांचा प्राध्यापक ते नट हा प्रवास नगरच्याच भूमीतील. त्यांनी नगरला असताना ‘काळे बेट लाल बत्ती’ लिहिले जे राज्य नाट्यस्पर्धेत प्रथम आले. सदाशिव अमरापूरकर, मधू कांबीकर, राम नगरकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, रघुवीर खेडकर, मिलिंद शिंदे असे अनेक सिने, नाट्य व तमाशा कलावंत नगरी भूमीने दिले. प्रभाकर पणशीकर यांच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकातील फिरता रंगमंच हा नगरच्याच वस्तुसंग्रहालयात जतन करण्यात आला आहे. हा वारसा आता चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही पुढे जाताना दिसतो आहे. नगरलाच प्रशिक्षण घेऊन अनेक तरुण चित्रपटसृष्टीत पुढे येत आहेत. नागराज मंजुळे हे त्यातील पहिले उदाहरण. मंजुळे यांनी नगरला संज्ञापनशास्त्राचे शिक्षण घेतानाच ‘पिस्तुल्या’ हा लघुपट साकारला. या लघुपटास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांच्या ‘फॅन्ड्री’चे सगळे चित्रीकरण नगरला झाले. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक विक्रम प्रस्थापित केलेल्या ‘सैराट’चाही काही भाग नगर जिल्ह्यात चित्रित झाला. भाऊराव कऱ्हाडे यांच्या ‘ख्वाडा’चे बहुतांश चित्रीकरणही नगर जिल्हा व शिरुर या ग्रामीण भागात झाले. ‘परतू’, ‘गणवेश’ व प्रदर्शनाच्या वाटेवर असलेले ‘घुमा’ अणि ‘भॉ’ यांचे सर्व चित्रीकरणही नगरलाच झाले.तांत्रिक बाबी सोडल्या तर चित्रीकरणासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा निर्माण करून या दिग्दर्शकांनी नगरसारख्या ग्रामीण भागाला चित्रनगरी बनविले. आहे त्या साधनसामग्रीचा वापर करत त्यांनी ही निर्मिती केली. मुंबईसारख्या मोठ्या शहरांतच दर्जेदार सिनेमा साकारू शकतो या समजुतीला यातून छेद दिला गेला आहे. ‘पिफ’मध्ये पुरस्कार मिळविलेल्या ‘घुमा’चा दिग्दर्शक महेश काळे हा खेड्यात राहतो. स्थानिक कलाकार घेऊन त्याने सिनेमा बनविला. मंजुळे, कऱ्हाडे हे सगळेच प्रतिकूलतेवर मात करून दिग्दर्शक बनले व सिनेमांचे निर्माते झाले. कऱ्हाडे यांनी तर जमीन विकून चित्रपटात पैसे लावले. या चित्रपटांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार व संधी मिळाली.‘मेक इन इंडिया’ म्हणतात तो हाच तर आहे. त्यामुळे कलाक्षेत्रात मोठ्या शहरांमध्ये गुंतवणूक करताना नगरसारख्या जिल्ह्यांकडेही राज्यकर्त्यांना यापुढे लक्ष द्यावे लागेल. सिनेमा उद्योगाला आता ग्रामीण भागातही संधी आहेत. जिल्ह्यातील लोकधुरिण व शासनालाही या बाबीचा विचार करावा लागेल. दुर्दैवाने जिल्ह्यातील राजकारण्यांनी याकडे म्हणावे तसे गांभीर्याने पाहिलेले नाही. साखर कारखाने, सोसायट्या या घिसेपिटे राजकारणातून नेते अद्याप बाहेर पडायला तयार नाहीत. ‘सैराट’सारखे चित्रपट आपल्या खुर्द-बुद्रूकमध्ये निर्माण होऊ शकतात, याचे आकलन राजकीय व प्रशासकीय क्षेत्राला करून घ्यावे लागेल.नगर शहराजवळ पिंपळगाव माळवी तलाव आहे. या तलावाच्या परिसरात महापालिकेच्या मालकीची ७०० एकर जमीन आहे. या जमिनीवर चित्रपटनगरी साकारावी, असा प्रस्ताव मध्यंतरी येथील जिप्सी प्रतिष्ठानने जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. या प्रस्तावावर प्रशासन व सरकार या दोघांनीही विचार करावा, असे वातावरण जिल्ह्यात निर्माण होत आहे. - सुधीर लंके