शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरची चित्रनगरी

By admin | Updated: March 2, 2017 00:06 IST

अहमदनगरसारख्या ग्रामीण भागातून फॅन्ड्री, सैराट, ख्वाडा, घुमा हे चित्रपट साकारले.

अहमदनगरसारख्या ग्रामीण भागातून फॅन्ड्री, सैराट, ख्वाडा, घुमा हे चित्रपट साकारले. खेड्यातील मुले दिग्दर्शक बनताहेत व आपल्या गावातच चित्रपटाची निर्मिती करताहेत. चित्रपटसृष्टी व सरकार या दोघांनाही या बदलाची नोंद घ्यावी लागेल. त्यासाठी सुविधा द्यावा लागतील. कोल्हापूरची कलानगरी म्हणून ओळख आहे. एकेकाळी या कलानगरीने दर्जेदार कलावंत व चित्रपट दिले. मुंबई ही तर सिनेमाची मायानगरीच आहे. मात्र, आता हा सिनेमा नगरसारख्या ग्रामीण भागातही बनू लागला आहे व तो दखलपात्रही ठरतो आहे. गत महिन्यात पुण्यात झालेल्या १५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) नगरच्या मातीत तयार झालेला ‘घुमा’ या चित्रपटाला ‘बेस्ट आॅडियन्स अवॉर्ड’ मिळाला. नगरला कलेचा जुनाच वारसा आहे. रंगभूमीवर नगरच्या शाहू मोडक यांनी सर्वप्रथम कृष्णाची भूमिका साकारली. कृष्ण हा मोडकांच्या रूपात प्रेक्षकांनी प्रथम पाहिला.नाटककार प्रा. मधुकर तोरडमल यांचा प्राध्यापक ते नट हा प्रवास नगरच्याच भूमीतील. त्यांनी नगरला असताना ‘काळे बेट लाल बत्ती’ लिहिले जे राज्य नाट्यस्पर्धेत प्रथम आले. सदाशिव अमरापूरकर, मधू कांबीकर, राम नगरकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, रघुवीर खेडकर, मिलिंद शिंदे असे अनेक सिने, नाट्य व तमाशा कलावंत नगरी भूमीने दिले. प्रभाकर पणशीकर यांच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकातील फिरता रंगमंच हा नगरच्याच वस्तुसंग्रहालयात जतन करण्यात आला आहे. हा वारसा आता चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही पुढे जाताना दिसतो आहे. नगरलाच प्रशिक्षण घेऊन अनेक तरुण चित्रपटसृष्टीत पुढे येत आहेत. नागराज मंजुळे हे त्यातील पहिले उदाहरण. मंजुळे यांनी नगरला संज्ञापनशास्त्राचे शिक्षण घेतानाच ‘पिस्तुल्या’ हा लघुपट साकारला. या लघुपटास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांच्या ‘फॅन्ड्री’चे सगळे चित्रीकरण नगरला झाले. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक विक्रम प्रस्थापित केलेल्या ‘सैराट’चाही काही भाग नगर जिल्ह्यात चित्रित झाला. भाऊराव कऱ्हाडे यांच्या ‘ख्वाडा’चे बहुतांश चित्रीकरणही नगर जिल्हा व शिरुर या ग्रामीण भागात झाले. ‘परतू’, ‘गणवेश’ व प्रदर्शनाच्या वाटेवर असलेले ‘घुमा’ अणि ‘भॉ’ यांचे सर्व चित्रीकरणही नगरलाच झाले.तांत्रिक बाबी सोडल्या तर चित्रीकरणासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा निर्माण करून या दिग्दर्शकांनी नगरसारख्या ग्रामीण भागाला चित्रनगरी बनविले. आहे त्या साधनसामग्रीचा वापर करत त्यांनी ही निर्मिती केली. मुंबईसारख्या मोठ्या शहरांतच दर्जेदार सिनेमा साकारू शकतो या समजुतीला यातून छेद दिला गेला आहे. ‘पिफ’मध्ये पुरस्कार मिळविलेल्या ‘घुमा’चा दिग्दर्शक महेश काळे हा खेड्यात राहतो. स्थानिक कलाकार घेऊन त्याने सिनेमा बनविला. मंजुळे, कऱ्हाडे हे सगळेच प्रतिकूलतेवर मात करून दिग्दर्शक बनले व सिनेमांचे निर्माते झाले. कऱ्हाडे यांनी तर जमीन विकून चित्रपटात पैसे लावले. या चित्रपटांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार व संधी मिळाली.‘मेक इन इंडिया’ म्हणतात तो हाच तर आहे. त्यामुळे कलाक्षेत्रात मोठ्या शहरांमध्ये गुंतवणूक करताना नगरसारख्या जिल्ह्यांकडेही राज्यकर्त्यांना यापुढे लक्ष द्यावे लागेल. सिनेमा उद्योगाला आता ग्रामीण भागातही संधी आहेत. जिल्ह्यातील लोकधुरिण व शासनालाही या बाबीचा विचार करावा लागेल. दुर्दैवाने जिल्ह्यातील राजकारण्यांनी याकडे म्हणावे तसे गांभीर्याने पाहिलेले नाही. साखर कारखाने, सोसायट्या या घिसेपिटे राजकारणातून नेते अद्याप बाहेर पडायला तयार नाहीत. ‘सैराट’सारखे चित्रपट आपल्या खुर्द-बुद्रूकमध्ये निर्माण होऊ शकतात, याचे आकलन राजकीय व प्रशासकीय क्षेत्राला करून घ्यावे लागेल.नगर शहराजवळ पिंपळगाव माळवी तलाव आहे. या तलावाच्या परिसरात महापालिकेच्या मालकीची ७०० एकर जमीन आहे. या जमिनीवर चित्रपटनगरी साकारावी, असा प्रस्ताव मध्यंतरी येथील जिप्सी प्रतिष्ठानने जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. या प्रस्तावावर प्रशासन व सरकार या दोघांनीही विचार करावा, असे वातावरण जिल्ह्यात निर्माण होत आहे. - सुधीर लंके