शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

माणसाला देव बनायची घाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 07:03 IST

सस्तन प्राण्यांमध्ये क्लोनिंगचा प्रयोग यशस्वी झाला, डाॅली हे मेंढीचे कोकरू जन्माला आले, त्या घटनेला शनिवारी, ५ जुलै रोजी एकोणतीस वर्षे पूर्ण होताहेत.

सस्तन प्राण्यांमध्ये क्लोनिंगचा प्रयोग यशस्वी झाला, डाॅली हे मेंढीचे कोकरू जन्माला आले, त्या घटनेला शनिवारी, ५ जुलै रोजी एकोणतीस वर्षे पूर्ण होताहेत. मधल्या काळात जैवविज्ञानाने प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडले. नैतिक अध:पतनाच्या भीतीने माणसाच्या क्लोनिंगला विरोध झाला म्हणून अन्यथा वेगळे चित्र आज असते. याचवेळी आणखी एका गंभीर, भविष्यवेधी, झालेच तर धोकादायक वळणावर जग उभे आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा, गुणदोषाचा आरसा मानला जाणारा डीएनए कृत्रिमरीत्या तयार करण्याची घोषणा झाली आहे. सोबतच विरोधही सुरू झाला आहे. नैसर्गिक रचनेत हस्तक्षेप ते तंत्रज्ञानाच्या गैरवापरावर अंकुश लावणारे कायदेकानू नसणे असे अनेक मुद्दे या विरोधामागे आहेत. माणसाचा कृत्रिम डीएनए तयार करणे शक्य आहे. पंधरा वर्षांपूर्वी क्रेग वेंटर यांनी बॅक्टेरियाचा कृत्रिम जीनोम तयार केल्यापासून ही शक्यता वर्तविली जात होतीच. डीएनए हा सजीवसृष्टीमधील चमत्कार आहे. संपूर्ण अनुवांशिक माहिती साठविणारा व ती पुढच्या पिढीकडे सुपुर्द करणारा हा रेणू प्रत्येक पेशीत असतो. माणसाच्या शरीरात ३० ते ४० ट्रिलियन पेशी असतात, यातून डीएनए व पेशींची गुंतागुंत लक्षात यावी. कृत्रिम डीएनए हा क्रांतिकारी वैज्ञानिक प्रयत्न आहे. त्यामुळे अनेक अनुवांशिक रोगांवर उपचार होतील. आरोग्य सुधारण्याचा नवा मार्ग सापडेल.

 चार दशकांपूर्वी इजिप्तमधील ममीजमधून पहिल्यांदा माणसांचा डीएनए मिळाला आणि या तंत्रज्ञानाचा पाया रचला गेला. अगदी काल-परवा पहिले पिरॅमिड्स बांधले गेले त्या काळातील म्हणजे जवळपास पाच हजार वर्षांपूर्वीच्या ममीचा दात वापरून जीनोम सिक्वेन्स म्हणजे जनुकीय संरचना तयार करण्यात आली. पाठोपाठ ही संशोधकांच्या चमूकडून प्रयोगशाळेत डीएनए तयार करण्याच्या ‘सिंथेटिक ह्यूमन जीनोम प्रोजेक्ट’ची बातमी आली. या प्रकल्पात ऑक्सफर्ड, केंब्रिज अशी जगप्रसिद्ध विद्यापीठे तसेच इम्पिरियल काॅलेजचे संशोधक सहभागी आहेत. वेलकम ट्रस्टने या प्रकल्पासाठी एक कोटी पाैंड म्हणजे ११७ कोटी रुपये निधीही दिला आहे. माणसाच्या जिवाला धोका असलेल्या आजारांवर उपचार, यकृत किंवा हृदय, मेंदू अशा अवयवांचे पुनर्जनन, रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे असे अनेक फायदे या कृत्रिम डीएनए व जीनोम सिक्वेन्सच्या रूपाने मिळू शकतील. निरोगी आयुष्य वाढेल. सध्याच्या तुलनेत माणसे कितीतरी अधिक जगू शकतील. अर्थात, ही केवळ सुरुवात आहे. संशोधकांना शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. प्रथम एक छोटे गुणसूत्र तयार केले जाईल. ते तयार करणे हा एकंदर डीएनएचा २ टक्के भाग असेल. नंतर अशा गुणसूत्रांच्या जोड्यांच्या प्रतिकृती तयार कराव्या लागतील. हे प्रचंड मेहनतीचे व खर्चिक काम आहे. बायोटेक कंपन्या सध्या फारतर तीनशे प्रतिकृती तयार करतात. क्लोनिंगद्वारे ही संख्या फारतर १०-२० हजारांच्या घरात जाऊ शकेल. तेव्हा मानवी शरीरातील अब्जावधी जोड्या कृत्रिमरीत्या तयार करण्यासाठी किती वेळ व पैसा लागेल, याचा विचार करा. खर्चिकता बाजूला ठेवली तरी नैतिक, सामाजिक, सुरक्षिततेशी संबंधित जोखीम या कारणाने होणारा विरोध स्वाभाविक आहे. मानवी जनुकीय संरचनेत हस्तक्षेप ही निसर्गाशी छेडछाड असल्याचा विधिनिषेध बाळगला जाईलच असे नाही. किंबहुना ही किल्ली हाती लागली की, पैसा असणारे लोक हवी तशी, देखणी, गोरीपान, बुद्धिमान, कर्तबगार ‘डिझायनर बेबी’ जन्माला घालतील.

पैसा नसलेल्यांना हे शक्य होणार नाही. परिणामी, सामाजिक विषमता, अनुवांशिक भेदभाव वाढेल. जैविक शस्त्रे तयारी केली जातील. मानवजातीला धोका निर्माण होईल. तरीदेखील असे प्रयत्न थांबणार नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या धोक्यांचाच पुरेसा निपटारा झालेला नसताना ‘एआय’विषयी जग वेडे झाले आहे. त्याचे खरे कारण, माणसाला देव बनण्याची घाई झाली आहे. या घाईचे दोन प्रकार आहेत. मृत्यूवर विजय मिळविणे, ते जमत नसेल तर किमान आयुष्याची दोरी शक्य तितकी लांबविणे आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाने किंवा भोळ्या, श्रद्धाळूंच्या भाषेत देवाने जे निर्माण केले ते सगळे नव्याने बनविणे असा मानवी आयुष्याबद्दल दुहेरी ध्यास आहे. कृत्रिम मानवी डीएनएमुळे हे दोन्ही हेतू साध्य होतील. अनुवांशिक आजारांवर खात्रीशीर उपचार होतील आणि स्वत:पुरती प्रतिसृष्टी निर्माण केल्याचे समाधानही मिळेल.