शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
2
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
3
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
4
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
6
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
7
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
8
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
9
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
10
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
12
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
13
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
14
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
15
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
16
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
17
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
18
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
19
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
20
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार

भांडणे, कुरघोड्या, धुसफूस; मंत्रिमंडळातील भांडणे कमी झालेली नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 06:29 IST

गृहमंत्री असताना दिवंगत आर. आर. पाटील यांनी तंटामुक्त गाव योजना आणली होती. ज्या गावात भांडणं होणार नाहीत त्या गावाला पुरस्कार देण्याची ती योजना होती.

गृहमंत्री असताना दिवंगत आर. आर. पाटील यांनी तंटामुक्त गाव योजना आणली होती. ज्या गावात भांडणं होणार नाहीत त्या गावाला पुरस्कार देण्याची ती योजना होती. काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकत्रित सरकार होते. मंत्रिमंडळात सतत खटके उडायचे. वादावादी व्हायची. निर्णय मात्र तंटामुक्त गाव योजनेचे व्हायचे. त्यावेळी मंत्रिमंडळ बैठका तंटामुक्त कधी होणार, असा प्रश्न आर. आर. पाटील यांना विचारला होता. 'आम्ही नेते प्रगल्भ झालो की आमच्यातली भांडणं कमी होतील. आम्ही मंत्री आहोत. महाराष्ट्र आमच्याकडे पाहतो आहे, हे ज्या दिवशी आम्हाला कळेल, त्यादिवशी आमच्यातली भांडणं बंद होतील, असे खास त्यांच्या स्टाइलचे उत्तर त्यांनी दिले होते.

१४ वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या विधानात आज काहीही फरक पडलेला नाही. मंत्रिमंडळातील भांडणे कमी झालेली नाहीत. एकमेकांवर कुरघोड्या करण्याची वृत्ती थांबलेली नाही. त्यावेळी दोन पक्षांचे सरकार होते. आता दोन पक्ष फोडून तिसऱ्या पक्षासोबत मिळून तीन पक्षांचे सरकार बनले आहे. मात्र, त्यांच्यात एकवाक्यता नाही. एका पक्षातल्या दोन नेत्यांमध्येदेखील मतभिन्नता आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींची आकडेवारी मांडली तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही आकडेवारी खरी कशावरून याचे पुरावे मागितले. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीचे दुसरे मंत्री पुरावे मागू लागले तर विश्वास कोणावर ठेवायचा? एकमेकांवर विश्वास नाही. प्रत्येकाला, 'आपले ठेवायचे झाकून, दुसऱ्याचे बघायचे वाकून, हा रोग जडला आहे. दुसऱ्याच्या विभागात काय चालू आहे, याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. ज्याचा आपला संबंध नाही अशा विभागाच्या बैठका घेण्याची स्पर्धा मंत्र्यांमध्ये लागली आहे. मंत्र्यांसोबत मंत्र्यांचे भाऊ, मुलगा, मित्र यांचे हस्तक्षेप टोकाला गेले आहेत. विद्यमान सरकारच्या मंत्रिमंडळाचे हे वास्तवदर्शी चित्र आहे. जे विषय मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधित आहेत, अशा पायाभूत सुविधा प्रकल्प, तसेच सामाजिक न्याय विभाग, धनगर प्रश्नावरील विषयांच्या बैठका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्या. ऊर्जा खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना, महावितरणची प्रलंबित व नवीन उपकेंद्रांची कामे लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार तातडीने पूर्ण करा, असे आदेश दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. काही निर्णय परस्पर होऊ लागले. हे पाहून कोणत्याही फाइलचा प्रवास कसा होईल, याचे आदेश सरकारला काढावे लागले. मंत्र्यांकडील फाइल वित्तमंत्री व उपमुख्यमंत्री या नात्याने आधी अजित पवार यांच्याकडे येईल. त्यांच्याकडून ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल. त्यांच्या शेऱ्यानंतरच ती फाइल मुख्यमंत्र्यांकडे जाईल, असा निर्णय सरकारला घ्यावा लागला. अजित पवार सरकारमध्ये सामील होण्याच्या आधी, मुख्यमंत्री व मंत्र्यांनी मारलेले शेरे अंतिम समजू नयेत, असा शासन आदेश सरकारला काढावा लागला. गेल्या पन्नास वर्षात असा आदेश कधीही निघाला नव्हता. विसंवादाचे हे उत्तम उदाहरण आहे.

मंत्र्यांकडे येणाऱ्या प्रत्येक अर्जावर तातडीने काम करावे असे शेरे मंत्री मारू लागले. ते पत्र घेऊन आमदार अधिकाऱ्यांच्या दालनात ठाण मांडून बसू लागले. परिणामी, अधिकारी आणि आमदारांमध्ये वितंडवाद सुरू झाले. त्यातून मंत्र्यांचे शेरे अंतिम समजू नयेत, असा आदेश निघाला. सरकार तीन पक्षाचे असले तरी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. तिघांची वागण्या-बोलण्याची पद्धत तीन पक्षांचे सरकार एकत्रितपणे काम करत आहे हे सांगणारी नाही. या विसंवादामुळेच एमआयडीसीमधील भूखंडाचे वाटप, सरकारी शाळांमधील समान गणवेश, एमपीएससीच्या नव्या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी, साखर कारखान्यांना कर्जासाठी संचालकांची हमी आणि उसाच्या परराज्यातील विक्रीवर निर्बंध हे पाच निर्णय सव्वा वर्षात या सरकारला वापस घ्यावे लागले. भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते सरकार ज्या पद्धतीने चालू आहे, त्या पद्धतीवर खासगीत प्रचंड रोष व्यक्त करतात. एखादा निर्णय पटला नाही की लगेच दुसऱ्या फळीतले नेते सत्तेतल्या अन्य दोन पक्षांवर शाब्दिक बाण चालवतात. वरिष्ठ नेते एकमेकांशी जुळवून घेण्याची भूमिका घेत असतानाच, दुसऱ्या फळीतले नेते त्या भूमिकेलाच सुरुंग लावतात. हे असे वादावादी करणारे सरकार लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत चालू राहील. त्यानंतर काय होईल, हे आम्हालाही माहीत नाही, असे याच सरकारमधील नेते बोलून दाखवतात, तेव्हा मंत्र्यांमधल्या कुरघोड्या आणि शाब्दिक चकमकी हा विषय फार छोटा ठरू लागतो.