शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
2
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
3
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
4
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
6
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
7
अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
8
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
9
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
10
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
11
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
12
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
13
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
14
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
16
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
17
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
18
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
19
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
20
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
Daily Top 2Weekly Top 5

रक्तरंजित बांगला क्रांती; रविवारी ‘चलो ढाका’ या असहकार चळवळीत हजारो तरुण सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 07:34 IST

शेख हसीना यांचाही संयम सुटला होता. आंदोलन करणारे विद्यार्थी नाहीत, दहशतवादी आहेत असे वक्तव्य सरकारने असहकार चळवळ सुरू होत असताना केले. परिणामी, गेल्या रविवारी ‘चलो ढाका’ या असहकार चळवळीत हजारो तरुण सहभागी झाले.

बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना किमान पन्नास वर्षे सरकारी नोकऱ्यांमध्ये तीस टक्के जागा राखीव ठेवणाऱ्या कायद्याची मुदत दाेन वर्षांपूर्वी संपल्यापासून सलग पंधरा वर्षे सत्तेवर असलेल्या अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांच्याविरोधात असंतोष धुमसत होता. गेल्या जानेवारीत झालेल्या निवडणुकांवर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) बहिष्कार घातल्याने अवामी लीग पक्षाला अहंकारच आला. अवामी लीगच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुका झाल्या. बांगलादेशाच्या स्वातंत्र्याचे नेते शेख मुजिबूर रहेमान यांचा वारसा सांगणारे स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या नातेवाइकांनाच राखीव जागांचा लाभ होत होता. पन्नास वर्षांचा कालखंड मोठा होता आणि तो संपला आहे. राखीव जागांच्या धोरणांचा अवामी लीगने गैरफायदा घेऊ नये, म्हणून देशभर पसरलेल्या असंतोषामुळे विद्यार्थ्यांची ‘स्टुडंट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन’ चळवळ सुरू झाली. पंतप्रधान शेख हसीना यांनी चर्चेद्वारे मार्ग काढणे टाळले तसा विद्यार्थ्यांच्या असंतोषाचा आगडोंब झाला. गेल्या १ जुलैपासून विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी याला व्यापक चळवळीचे रूप दिले. निदर्शकांवर लाठीमार आणि गोळीबार करण्यात आला. त्यात सहा जण ठार झाले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राखीव जागाप्रकरणी एक निकाल देऊन एकूण ५६ टक्के आरक्षणापैकी स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदारांना पाच टक्के आणि दिव्यांग, आदिवासी तसेच तृतीयपंथीयांना प्रत्येकी एक टक्का आरक्षण ठेवण्याचा निर्णय दिला. हा निर्णय होईपर्यंत वेळ निघून गेली होती. शेख हसीना यांचाही संयम सुटला होता. आंदोलन करणारे विद्यार्थी नाहीत, दहशतवादी आहेत असे वक्तव्य सरकारने असहकार चळवळ सुरू होत असताना केले. परिणामी, गेल्या रविवारी ‘चलो ढाका’ या असहकार चळवळीत हजारो तरुण सहभागी झाले.

अवामी लीग सरकार या आंदोलनास ज्याप्रकारे हाताळत होते, यावर बांगलादेशाचे लष्कर समाधानी नव्हते. या असहकार चळवळीला मोडून काढण्यासाठी अवामी लीग पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. त्यात सुमारे ९१ जणांचा बळी गेला. चौदा पाेलिसदेखील या हाणामारीत मरण पावले. तेव्हा मात्र लष्करप्रमुखांनी परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली. माजी लष्करप्रमुख इक्बाल भुयान यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याच नागरिकांवर कारवाई करण्यासाठी लष्कर नाही, आंदोलकांवर गोळीबार करणे पटण्यायोग्य नाही, असे सांगितले. रविवारच्या हिंसक घटनांनंतर सरकार पुन्हा आक्रमक झाले. संपूर्ण देशभर तीन दिवसांची सार्वजनिक सुटी जाहीर करीत संचारबंदी लागू केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून बांगलादेशी लष्कराने हस्तक्षेप सुरू केला. रविवारच्या हिंसाचारानंतर संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानावरच हल्लाबोल केला. दरम्यान, लष्करानेच पुढाकार घेऊन शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे, असे वृत्त पसरविले. शेख हसीना आपल्या बहिणीसोबत सुरक्षितस्थळी रवाना झाल्या आहेत, असे सांगून त्या हेलिकॉप्टरने रवाना झाल्याची चित्रफीत स्थानिक दूरचित्रवाणीवर दाखविण्यात येऊ लागली, तेव्हा हिंसक आंदोलक जल्लोष करू लागले. शेख हसीना यांनी राजीनामा कोणाकडे दिला हे सांगण्यात आले नाही. याउलट त्यांनी सत्ता सोडून देश सोडला, असे वातावरण तयार करून लष्कराच्या सूत्रांनुसार तातडीने हंगामी सरकार स्थापन करण्यात येत आहे, असे जाहीर करावे लागले. कारण  आंदोलकांच्या या आगडोंबात देश जळाला असता. लष्करालादेखील हा हिंसाचार रोखता आला नसता.

शेख हसीना यांची कामाची पद्धत अलीकडच्या काळात खूप एकारलेली होती, असे त्यांच्या सरकारचे समर्थन करणारे विचारवंतही म्हणत होते. त्यांनी देशात जी काही दडपशाही केली त्यातून झालेला उद्रेक म्हणजे क्रांतीच आहे. लष्करालादेखील त्यांच्या कामाच्या पद्धतीविषयी नापसंती होती. त्यामुळेच ही गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी लष्कराने ताबा घेऊन शेख हसीना यांना सुरक्षितपणे देशातून बाहेर काढले, असे मानले जाते. भारत सरकारने या शेजारच्या देशातील घटनांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. बांगलादेशी निर्वासितांमुळे पूर्वोत्तर भारताचे हात पोळले आहेत. आसाम राज्य अनेक वर्षे जळत होते. बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा तातडीचा परिणाम आपल्या सीमेलगतच्या राज्यांवर होतो. शेख हसीना यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सलोख्याचे संबंध असले तरी देशांतर्गत नागरी जीवनातील असंतोषाला त्या-त्या  राष्ट्रप्रमुखांनी उत्तर शोधायचे असते. शेख हसीना या आगडोंबातून बाहेर पडण्यासाठी सत्तेचा त्याग करून निघाल्या असल्या तरी बांगलादेशाला पूर्वपदावर येण्यासाठी अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश