शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा विदर्भवादी पक्ष

By admin | Updated: September 27, 2016 05:13 IST

विदर्भ वेगळा काढल्यास, उर्वरित महाराष्ट्रात अडगळीत पडण्याची भीती भाजपा व कॉंग्रेसला वाटते. त्याचा त्यांना फार फरक पडणारही नाही; पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या

- रवी टालेविदर्भ वेगळा काढल्यास, उर्वरित महाराष्ट्रात अडगळीत पडण्याची भीती भाजपा व कॉंग्रेसला वाटते. त्याचा त्यांना फार फरक पडणारही नाही; पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर पाणी सोडावे लागेल, ही त्यांची खरी चिंता आहे.आजोबा बापूसाहेब अणे यांनी बघितलेले वेगळ्या विदर्भ राज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचा विडा उचललेले महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली आहे. विदर्भ राज्यासाठी स्वातंत्र्यापासूनच सुरू असलेल्या चळवळीचा झेंडा, गत काही काळापासून, अणे प्रणित विदर्भ राज्य आघाडी या संघटनेने खांद्यावर घेतला आहे. आता त्या संघटनेला राजकीय पक्षात परिवर्तित करण्यात आले आहे. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मुद्यावर निवडणुका जिंकून दाखवून, वैदर्भीय जनतेला वेगळे निघायचे असल्याचे विदर्भवाद्यांना सिद्ध करून दाखवायचे आहे. भारतीय जनता पक्ष व कॉंग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांनी वेळोवेळी वेगळ्या विदर्भ राज्याला तात्विक पाठिंबा घोषित केला असला तरी, राज्य प्रत्यक्षात केव्हा आणणार, या मुद्यावर उभय पक्षांचे नेते चुप्पी साधतात. संसद व महाराष्ट्र विधिमंडळातील उभय पक्षांचे एकत्रित संख्याबळ लक्षात घेता, त्यांनी ठरविल्यास विदर्भ राज्य चुटकीसरशी अस्तित्वात येऊ शकते; परंतु ते आजवर झाले नाही आणि निकट भविष्यातही तशी अपेक्षा करता येत नाही. त्यामागचे कारण हे आहे, की विदर्भ वेगळा काढल्यास, उर्वरित महाराष्ट्रात अडगळीत पडण्याची त्यांना भीती वाटते. काही मोठ्या राज्यांमध्ये या पक्षांचे नाममात्रच अस्तित्व आहे. त्यामध्ये आणखी एकाची भर पडल्याने त्यांना फार फरक पडणारही नाही; पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर पाणी सोडावे लागेल, ही त्यांची खरी चिंता आहे. श्रीहरी अणे यांना ही वस्तुस्थिती पुरेपूर ठाऊक आहे आणि त्यांनी ती वेळोवेळी बोलूनही दाखविली आहे. त्यामुळेच त्यांनी प्र्रस्थापित पक्षांच्या नादी न लागायचे ठरवून, स्वतंत्र पक्षाची स्थापना करण्याचा मार्ग अवलंबला, असे दिसते. वैदर्भीय जनतेला हवे असल्यास राज्य देऊ, असे तुम्ही म्हणता ना, मग आम्ही ते निवडणुका जिंकून सिद्ध करून दाखवू, असा त्यांचा एकंदर अभिनिवेश आहे. त्यांच्या आत्मविश्वासास वैदर्भीय जनतेच्या पाठिंब्याची जोड मिळाल्यास, वेगळ्या विदर्भ राज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेलही; पण तसे न झाल्यास काय? वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर यापूर्वी निवडणुका लढल्या गेल्या नाहीत, वा राजकीय पक्षांची स्थापना झालेली नाही, असे नाही. बापूसाहेब अणेंनी १९६२ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून नागपूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक जिंकली होती. त्याचप्रमाणे जांबुवंतराव धोटे यांनी १९७१ मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात, तर राजे विश्वेश्वरराव यांनी १९७७ मध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात वेगळ्या विदर्भाच्याच मुद्यावर विजय मिळविला होता. वेगळे विदर्भ राज्य हाच एकमेव ‘अजेंडा’ असलेले काही राजकीय पक्षही भूतकाळात गठित झाले होते. जांबुवंतराव धोटेंनी २००२ मध्ये विदर्भ जनता कॉंग्रेसची, वसंत साठे व एन. के. पी. साळवे या कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी २००३ मध्ये विदर्भ राज्य निर्माण कॉंग्रेसची, तर बनवारीलाल पुरोहित यांनी २००४ मध्ये विदर्भ राज्य पार्टी या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली होती. या सर्व पक्षांचे संस्थापक दिग्गज राजकीय पुढारी होते; पण आज भिंग घेऊन शोधले तरी ते पक्ष सापडायचे नाहीत. निवडणुकांच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भ राज्याच्या चळवळीला हवा देण्याचा आणखी एक प्रयत्न २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळीही झाला होता. तेव्हा मतदान यंत्रावरील ‘नोटा’चा पर्याय वापरून सर्व प्रस्थापित पक्षांना नाकारण्याचे आवाहन, विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले होते. त्याचेही फलित सर्वज्ञात आहे. आता पुन्हा एकदा वेगळे विदर्भ राज्य हा एकमेव ‘अजेंडा’ असलेला पक्ष राजकीय क्षितिजावर उगवला आहे. या पक्षाचे भवितव्य वैदर्भीय जनताच निश्चित करेल. विदर्भवासीयांची इच्छा असल्यास नव्या पक्षाला तेलंगणा राष्ट्र समितीसारखे भव्य यशही लाभू शकेल; पण ते न झाल्यास, नावात विदर्भ असलेल्या सपशेल अपयशी पक्षांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडून, वेगळ्या विदर्भाची चळवळही मागे रेटली जाऊ शकेल.