शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

पुन्हा ‘कोमागाटा’!

By admin | Updated: May 23, 2016 03:50 IST

शाळेत इतिहास विषयाचा अभ्यास करताना कोमागाटा मारू हे नाव कानावरून गेल्याचे अनेकांना अंधुक का होईना, आठवत असेल. कोमागाटा मारू हे वाफेवर चालणारे जपानी

शाळेत इतिहास विषयाचा अभ्यास करताना कोमागाटा मारू हे नाव कानावरून गेल्याचे अनेकांना अंधुक का होईना, आठवत असेल. कोमागाटा मारू हे वाफेवर चालणारे जपानी जहाज तब्बल एक शतकानंतर पुन्हा चर्चेत आले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी कोमागाटा मारू प्रकरणासाठी, संसदेच्या कनिष्ठ सभागृहात माफी मागितली. कॅनडामध्ये स्थायिक झालेले शीख बांधव गत एक शतकापासून त्यासाठी लढा देत होते. यापूर्वी कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनीही या प्रकरणी एका भाषणादरम्यान क्षमायाचना केली होती; मात्र क्षमायाचना संसदेत व्हावी आणि ती ‘रेकॉर्ड’वर यावी, यासाठी शीख समुदायाने लढा सुरूच ठेवला होता. त्यांच्या त्या अविरत लढ्याला अखेर यश मिळाले. कोमागाटा मारू हे जपानी जहाज २३ मे १९१४ रोजी कॅनडातील व्हॅँकुव्हर शहराच्या किनाऱ्याला लागले होते. जहाजात पंजाबमधील ३७६ उतारू होते. त्यापैकी केवळ २४ जणांना कॅनडा सरकारने देशात दाखल होण्याची परवानगी दिली आणि उर्वरित ३५२ जणांना तब्बल दोन महिने जहाजातच अडकवून ठेवल्यानंतर भारतात परत धाडले. स्वातंत्र्य, समृद्धीची स्वप्ने मनाशी रंगवत मोठ्या हुरुपाने कॅनडाला पोहोचलेल्या त्या दुर्दैवी जिवांच्या नशिबाचे दशावतार तिथेच संपले नाहीत, तर भारतात परतल्यानंतर कोलकाता बंदरात जहाजातून खाली उतरत असताना, ब्रिटिश सैनिकांनी त्यांच्यावर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १९ जण ठार झाले होते. काही जण पलायन करण्यात यशस्वी ठरले; पण इतरांना पकडून एक तर तुरुंगात डांबण्यात आले, किंवा प्रथम महायुद्ध संपेपर्यंत नजरकैदेत ठेवण्यात आले. कॅनडा सरकारची ती कृती स्वत:च्या कायद्याला खुंटीवर टांगणारी तर होतीच; पण अत्यंत अमानवीयही होती. कोमागाटा मारूवरील प्रवाशांना देशात दाखल झालेल्या निर्वासितांचा दर्जा प्राप्त होऊ नये, यासाठी तत्कालीन कॅनडा सरकारने जहाजाला जाणीवपूर्वक किनाऱ्यापासून दूर तर लोटलेच; पण प्रवाशांना अन्न, पाणी व इतर जीवनावश्यक वस्तूही नाकारल्या होत्या. युरोपातून लाखो लोक कॅनडात स्थायिक होण्यासाठी येत असताना, तत्कालीन ब्रिटिश अधिपत्याखालील भारतातील निर्वासितांना देशात प्रवेशच द्यायचा नाही, असेच धोरण कॅनडा सरकारने त्यावेळी स्वीकारले होते. कोमागाटा मारू अध्याय हा त्या वंशविद्वेशी धोरणाचाच परिपाक होता. कॅनडाच्या इतिहासातील तो एक काळाकुट्ट डाग आहे. तब्बल एक शतक उलटून गेल्यानंतर, माफी मागून तो डाग धुण्याचा प्रयत्न पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी केला आहे. ट्रुडो यांच्या माफीनाम्यामुळे कोमागाटा मारूवरील प्रवाशांना कोणताही फरक पडू शकत नाही. ते सगळे त्या पलीकडे निघून गेले आहेत; पण काळ सूड उगवत असतो म्हणतात! ज्या शीख समुदायातील लोकांना एक शतकापूर्वी कॅनडाने प्रवेश नाकारला होता, तोच समुदाय आज कॅनडाच्या अर्थकारणाला दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका अदा करीत आहे. ट्रुडो यांच्या माफीनाम्याला तो कंगोरा आहेच; पण तरीही त्यांनी ज्या दिलदारपणाचा परिचय दिला आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक केलेच पाहिजे!