शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

४० वर्षे न सुटलेला अयोध्येच्या राममंदिराचा वाद निकालात काढायला निघालेल्या बाबानंतर आता सरसावलेले श्री श्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 03:23 IST

राजकारणाने धर्माचे प्रश्न कधी हाती घेऊ नयेत, तसे धर्माचे म्हणविणा-यांनीही राजकारणाच्या प्रश्नात स्वत:ला गुंतवू नये.

राजकारणाने धर्माचे प्रश्न कधी हाती घेऊ नयेत, तसे धर्माचे म्हणविणा-यांनीही राजकारणाच्या प्रश्नात स्वत:ला गुंतवू नये. प्रत्येक क्षेत्रात त्यातील प्रश्नांची सोडवणूक करणारी कार्यक्षम माणसे असतात. त्यांना त्यांचे काम करू देणे यात शहाणपण आहे. मात्र ज्यांच्याजवळ जास्तीचे व आगाऊ म्हणावे असे शहाणपण असते ती माणसे आपल्या क्षेत्रातील प्रश्नांपाशी थांबत नाहीत. स्वत:ला श्री श्री म्हणवून घेणारे रविशंकर नावाचे महंत गेली ४० वर्षे न सुटलेला अयोध्येच्या राममंदिराचा वाद निकालात काढायला आता पुढे सरसावलेले पाहताना त्यांच्या या जास्तीच्या शहाणपणाचा प्रत्यय त्यांच्या भक्तांएवढाच देशालाही आला आहे. ज्या वादात सरकारे गेली, पक्ष पडले आणि देशात दंगली उसळल्या तो वाद यमुनेची नासधूस करून झाल्यानंतर हे श्री श्री निकालात काढणार असतील तर केंद्र व राज्य सरकारांनी त्यांच्यासमोरचे सारे अवघड प्रश्न त्यांच्या आर्ट लिव्हिंगकडे सोपवून विश्रांती घेणे हेच योग्य ठरावे असे आहे. राम मंदिराचा वाद हा केवळ धार्मिक वा राजकीय नाही. त्यात या दोन्ही बाजू गुंतल्या आहेत आणि त्यांच्या मागे एक इतिहास उभा आहे. हा प्रश्न हिंदू आणि मुसलमान या दोन्ही समाजातील श्रद्धाळू लोकांच्या मानसिकतेचा आहे आणि मानसिकता बदलणे हे दीर्घकालीन कार्य आहे. ते सुदर्शन क्रियेसारखे झटपट उरकायचे काम नव्हे. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील जाटांच्या प्रश्नात मी मध्यस्थी करतो अशी शेखी मिरवायला पतंजलीचे विक्रेते रामदेवबाबा तेथे गेले होते. त्यावेळी हे करण्यापेक्षा तुमची दुकाने चांगली चालवा, असे ऐकवून त्यांना तेथील जनतेनेच हाकलून लावले होते. श्री श्रींच्या वाट्याला असा अपमान अजून आला नाही. मात्र त्यांची दखल कोणी घेत नाही ही गोष्ट त्यांना बरेच काही सांगणारी आहे. या प्रश्नाशी संबंध असलेल्यांच्या भूमिका टोकाच्या आहेत. हे संबंधित राजकारणात आहेत, धर्मकारणात आहेत आणि समाजकारणातही आहेत. या साºयांत समन्वय साधून एक ऐतिहासिक एकवाक्यता घडविणे हे कोणत्याही महंताच्या आवाक्याबाहेरचे काम आहे. त्याला सामोरे जाण्याऐवजी आपल्या प्रवचनांनी आपली अब्जावधींची इस्टेट वाढवीत नेणे हे श्री श्रींसाठी अधिक श्रेयस्कर आहे. उत्तर प्रदेशच्या एका माजी खासदाराने तसा सल्ला त्यांना दिलाही आहे. या श्रीश्रींच्या बºयाच एनजीओज आहेत आणि त्यांना बºयापैकी स्वदेशी आणि विदेशी पैसा मिळतो. त्या बळावर त्यांनी देशात अनेक जागी आपल्या मोठ्या इस्टेटीही उभ्या केल्या आहेत. ही माणसे अध्यात्मात आहेत की व्यापारात असाच प्रश्न त्यांच्या या प्रचंड मालमत्तेकडे पाहून आपल्याला पडावा. त्यांच्या उत्पन्नाचे एक आणखी महत्त्वाचे व मनोरंजक रहस्य हे की त्यात त्या बिचाºयांना कवडीचीही गुंतवणूक करावी लागत नाही. लोकांची अंधश्रद्धा आणि त्यांना भुरळ घालण्याची साधलेली किमया एवढी गुंतवणूक त्यांना पुरेशी असते. या माणसांनी त्यांना जमते तसे समाजाचे नैतिक व अधिभौतिक उन्नयन तेवढे करावे. राजकारणात उतरण्याची परीक्षा देऊ नये. ते त्यांचे क्षेत्र नव्हे. त्यातून श्री श्री रविशंकर यांचा राजकीय कल भाजपकडे असल्याचे या आधी अनेकवार उघड झाले आहे. त्यांनी दिल्लीत भरविलेल्या जांबोरीच्या वेळी ज्या पक्षाची माणसे गर्दी करून जमली होती ती त्यांच्या या कौलाचे स्वरूप सांगणारीही होती. श्री श्रींसारखी माणसे समाजाच्या मनात व आयुष्यात जळणाºया प्रश्नांविषयी फारसे बोलत नाहीत. कारण ते बोलण्याने त्यांच्या महात्म्यात कोणती भर पडत नाही. राम मंदिर, बाबरी मस्जिद किंवा धर्म व त्यातील भांडणे हे प्रश्न त्यांच्या महात्म्याची उंची वाढवितात. सबब, त्यांचा हा खटाटोप.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर