शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्य माणसाला दत्तक घ्या !

By admin | Updated: January 1, 2015 02:47 IST

नवे वर्ष सुरू झाले की सगळ््यांचे संकल्प बाहेर पडायला लागतात, जसे थंडीत लोकरीचे कपडे बाहेर निघतात. जो तो आपल्या परीने नवीन वर्ष सुखात कसे जाईल, यासाठी नियोजन करतो.

नवे वर्ष सुरू झाले की सगळ््यांचे संकल्प बाहेर पडायला लागतात, जसे थंडीत लोकरीचे कपडे बाहेर निघतात. जो तो आपल्या परीने नवीन वर्ष सुखात कसे जाईल, यासाठी नियोजन करतो. जसा आपण स्वत:चा आणि आपल्या कुटुंबाचा विचार करतो तसाच विचार आपण देशासाठी सुद्धा करायला हवा. आपण ज्या क्षेत्रात हयात घालविली त्या क्षेत्राला आपण काय नवीन चेतना देऊ शकतो, याचा विचार व्हायला हवा. रकार दरबारी अशी काय जादूची कांडी फिरावी, ज्यायोगे शासनाची आणि प्रशासनाची प्रतिमा उजळून निघावी याचा मी विचार करीत होते. मोठमोठ्या योजना करून झाल्या. गोरगरिबांसाठी अनेक नवीन योजना कार्यान्वित झाल्या. परंतु परिणामकारक असे काम झालेच नाही. याचे कारण काय असू शकेल ? विचार करता करता एक गोष्ट मनात आली. समजा, शासनातल्या प्रत्येक अधिकाऱ्याने म्हणजे अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाने असे ठरविले, की मी स्वत:च या वर्षासाठी दहा उद्दिष्टे माझ्यासमोर ठेवीऩ ती पूर्ण करण्याचा मी कसोशीने प्रयत्न करीन. आता ही उद्दिष्टे आपणच ठरविली असल्यामुळे ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपलीच असणार आहे. हे करीत असताना एक पथ्य पाळायचे आहे. माझ्याकडे येणाऱ्या लहानमोठ्या प्रत्येक माणसाला मी समान वागवीन, अशी शपथ घ्यायची आहे. असे करायचे असले तर प्रथम आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताला आपण वेळ दिली पाहिजे. त्याचे म्हणणे आपल्या दृष्टीने कितीही क्षूद्र असले तरी आपण ते ऐकून घेतले पाहिजे. दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेणेही महत्त्वाचे असते. आपल्या कुटुंबीयांपैकी कोणी आपल्याकडे मदत मागण्यास आले तर आपण प्रथम त्याची अडचण ऐकून घेतो आणि आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी करतो. मदत करता आली नाही तर त्याचे काम कोण करेल, याचे मार्गदर्शन तर आपण नक्कीच करतो. संबंधित माणसाचा फोन नंबर मिळवून देणे, त्याच्याबरोबर मुलाखत ठरविणे इत्यादी आपण करतो. हीच सुविधा आपल्या कुटुंबात नसलेल्या पण अडचणीत असलेल्या आपल्या अभ्यागताला द्यायला हरकत काय आहे? अनेकदा शासकीय अधिकारी लोकांना भेटीची वेळ देतात. त्या तारखेला योग्यवेळी अभ्यागत आपल्याकडे येतो. अनेकदा तो बिचारा फार दुरून किंवा फार कष्टातून आपल्यापर्यंत पोहोचतो. आपल्याकडे आल्यावर त्याला कळते, की साहेब दुसरीकडे गेले आहेत अथवा व्यस्त आहेत. मी असे म्हणत नाही की असे घडू शकणार नाही. आयत्यावेळी काही काम निघू शकते. परंतु अशावेळी त्या अभ्यागताला पूर्वसूचना देता आली तर किती चांगले होईल. पूर्वसूचना देणे शक्य नसल्यास आपल्यानंतर जो अधिकारी त्याला मार्गदर्शन करू शकेल अशा व्यक्तीकडे ती जबाबदारी देणे खरोखरच कठीण नाही. त्या माणसाचे काम होणे महत्त्वाचे आहे. अनेक लोकांकडे आपल्याकडे येण्यापुरतेही पैसे नसतात. कोणाकडून तरी पैसे उसणे घेऊन लोक आपल्याकडे येतात. दिवसभर त्यांना साधे पाणीही कोणी विचारत नाही, जेवणाचे तर सोडूनच द्या. तो माणूस आपल्या लोभापायी आपल्याकडे आलेला नसतो, तो आपल्यामध्ये सरकारचा चेहरा पाहतो. आपण जसे व्याधींनी ग्रस्त असताना डॉक्टरवर पूर्ण श्रद्धा ठेवतो तसेच या सामान्य माणसाचे असते. त्याला विश्वास वाटतो की समोर बसलेला माणूस आपल्यासाठी सरकार आहे. तो आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करेल. प्रत्यक्षात मात्र आपण अशा सामान्य माणसाशी माणुसकीनेसुद्धा वागत नाही. आपण त्याला हुडूत हुडूत करतो. आपल्या भाषणातून आपण सतत तळागाळातल्या लोकांशी बांधिलकी आहे, असे म्हणतो. प्रत्यक्षात ते समोर आले की आपल्या कपाळावर आठ्या उमटतात. नव्या वर्षाचा संकल्प म्हणून या सामान्य माणसाला दत्तक घ्यायला काही हरकत आहे का? शासनातल्या प्रत्येक अधिकाऱ्याने नव्या वर्षात एकच संकल्प करायचा... माझ्याकडे येणाऱ्या लहानमोठ्या प्रत्येक माणसाला मी समान वागवीन, अशी शपथ घ्यायची आहे. एखादा मोठा उद्योजक किंवा बिल्डर आला तर मी त्यांची वेगळी खातीरदारी करणार नाही. सामान्य माणसालाही माझ्या आॅफीसमध्ये तसाच मोकळा प्रवेश मिळेल, जसा या बड्या लोकांना मिळतो. माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस माझ्या कुटुंबातला आहे, असे समजून मी त्याच्याशी वागेन. - नीला सत्यनारायण, माजी सनदी अधिकारी