शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

मनाचिये गुंथी - एकारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:55 IST

झाडे लावा झाडे जगवा ही हाक कुणापर्यंत पोचते कळत नाही. पण झाडे तोडणारेही ही पाटी वाचतात. माणूसजात प्रगत झाली आणि जास्त मूलगामी झाली. त्यांच्या मूलभूत हिंस्त्र भावनेला एक वैश्विक विचारांचे कोंदण आले.

- किशोर पाठकझाडे लावा झाडे जगवा ही हाक कुणापर्यंत पोचते कळत नाही. पण झाडे तोडणारेही ही पाटी वाचतात. माणूसजात प्रगत झाली आणि जास्त मूलगामी झाली. त्यांच्या मूलभूत हिंस्त्र भावनेला एक वैश्विक विचारांचे कोंदण आले. म्हणजे माणसाचे सहज मरणे आणि त्याला मारणे यात केवळ ‘कानाचा’ फरक, पण तो किती कठीण आणि न समजणारा. म्हणजे माणसाला माणूस जगायला हवा, त्याचा विचार जगायला हवा असे वाटते, पण माणूस जगत नाही जगवत नाही. आपल्याला एक इझम चिकटलाय. गंमत म्हणजे तो प्रत्येक माणूस जगायलाच हवा, त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित हा घोष करीत राहतो आणि नेमके उलटे वागतो. माणूस जेवढा विविध तेवढे त्याचे विचारही भिन्न. मला जो माणूस माझा वाटतो तो इतरांना जवळचा वाटत नाही. म्हणजे दया, क्षमा, शांती हे शब्द प्रत्येकाला माहीत आहेत, मान्य आहेत परंतु ते तत्त्वज्ञान झाले याचा प्रत्यक्ष व्यवहारात काय संबंध? म्हणजे न आवडणारा ठोकायलाच हवा ही आपली प्रवृत्ती. म्हणूनच माणूस जगतो आणि मरतोही. मग आपण एक वाक्य ऐकतो, वाचतो. माणूस मेला तरी विचार मरत नाहीत.गांधी गेले, शास्त्री गेले, जयप्रकाश नारायणही गेले, विनोबा गेले, श्यामच्या आईचे साने गुरुजी गेले काय बदल झाला आपल्यात? कुठल्या वैचारिक प्रचाराने आपण सुधारलो, बदललो. उलट दिवसेंदिवस आपण खूप एकांतिक होत चाललोत. आपण एकारलोत. हे एकारणे कुणाला हवे, कुणाला नको, मग भले त्यात माणूस चिरडला तरी जपायला हवा म्हणणारेही आहेत. याला शिक्षा व्हायलाच हवी. या व्यक्ती समाजात उंच मानेने चालतात, वावरतात आणि स्वयंघोषित संत-महंत तुरुंगात बसतात. कायदा कठीण आहे. तो हवा तेव्हा बदलता येतो किंवा त्याचा हवा तसा अर्थ लावता येतो. हे सोयीस्कर अर्थ लावणे यालाच वैचारिक परिभ्रमण म्हणतात, कुणी क्रांती म्हणतात कुणी आणीबाणी म्हणतात. कुणाला हा मुक्त संचार वाटतो, तर कुणाला मुस्कटदाबी वाटते. असा विचार करणारी माणसं एकमेकांसमोर आली तर काय होईल? मारामारी, दंगल आणि खून! पण हे वैचारिक, सर्वमान्य नाही. माणसांना सरळ खाणारा बिबट्या सापडला तर त्याला घनदाट जंगलात सोडतात. का तर तोही जगायला हवा. पण माणसाला ती मुभा का नाही? तू बोल वा बोलू नको. तू मला हवं ते बोल किंवा बोलूही नको! तुझे जगणे हे वैचारिक धारेत निरुपयोगी असेल तर जग, तू जगायला लायक नाहीतर मरायला तयार हो। खूप मोठ्याने म्हणतो आपण, माणूस मेला तरी चालेल विचार जगायला हवेत. पण मग एकच प्रश्न! जगण्याचा हक्क प्रत्येक माणसाचा, मग माणूस का जगायला नको? हा प्रश्न उत्तरहीन!