शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

मनाचिये गुंथी - एकारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:55 IST

झाडे लावा झाडे जगवा ही हाक कुणापर्यंत पोचते कळत नाही. पण झाडे तोडणारेही ही पाटी वाचतात. माणूसजात प्रगत झाली आणि जास्त मूलगामी झाली. त्यांच्या मूलभूत हिंस्त्र भावनेला एक वैश्विक विचारांचे कोंदण आले.

- किशोर पाठकझाडे लावा झाडे जगवा ही हाक कुणापर्यंत पोचते कळत नाही. पण झाडे तोडणारेही ही पाटी वाचतात. माणूसजात प्रगत झाली आणि जास्त मूलगामी झाली. त्यांच्या मूलभूत हिंस्त्र भावनेला एक वैश्विक विचारांचे कोंदण आले. म्हणजे माणसाचे सहज मरणे आणि त्याला मारणे यात केवळ ‘कानाचा’ फरक, पण तो किती कठीण आणि न समजणारा. म्हणजे माणसाला माणूस जगायला हवा, त्याचा विचार जगायला हवा असे वाटते, पण माणूस जगत नाही जगवत नाही. आपल्याला एक इझम चिकटलाय. गंमत म्हणजे तो प्रत्येक माणूस जगायलाच हवा, त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित हा घोष करीत राहतो आणि नेमके उलटे वागतो. माणूस जेवढा विविध तेवढे त्याचे विचारही भिन्न. मला जो माणूस माझा वाटतो तो इतरांना जवळचा वाटत नाही. म्हणजे दया, क्षमा, शांती हे शब्द प्रत्येकाला माहीत आहेत, मान्य आहेत परंतु ते तत्त्वज्ञान झाले याचा प्रत्यक्ष व्यवहारात काय संबंध? म्हणजे न आवडणारा ठोकायलाच हवा ही आपली प्रवृत्ती. म्हणूनच माणूस जगतो आणि मरतोही. मग आपण एक वाक्य ऐकतो, वाचतो. माणूस मेला तरी विचार मरत नाहीत.गांधी गेले, शास्त्री गेले, जयप्रकाश नारायणही गेले, विनोबा गेले, श्यामच्या आईचे साने गुरुजी गेले काय बदल झाला आपल्यात? कुठल्या वैचारिक प्रचाराने आपण सुधारलो, बदललो. उलट दिवसेंदिवस आपण खूप एकांतिक होत चाललोत. आपण एकारलोत. हे एकारणे कुणाला हवे, कुणाला नको, मग भले त्यात माणूस चिरडला तरी जपायला हवा म्हणणारेही आहेत. याला शिक्षा व्हायलाच हवी. या व्यक्ती समाजात उंच मानेने चालतात, वावरतात आणि स्वयंघोषित संत-महंत तुरुंगात बसतात. कायदा कठीण आहे. तो हवा तेव्हा बदलता येतो किंवा त्याचा हवा तसा अर्थ लावता येतो. हे सोयीस्कर अर्थ लावणे यालाच वैचारिक परिभ्रमण म्हणतात, कुणी क्रांती म्हणतात कुणी आणीबाणी म्हणतात. कुणाला हा मुक्त संचार वाटतो, तर कुणाला मुस्कटदाबी वाटते. असा विचार करणारी माणसं एकमेकांसमोर आली तर काय होईल? मारामारी, दंगल आणि खून! पण हे वैचारिक, सर्वमान्य नाही. माणसांना सरळ खाणारा बिबट्या सापडला तर त्याला घनदाट जंगलात सोडतात. का तर तोही जगायला हवा. पण माणसाला ती मुभा का नाही? तू बोल वा बोलू नको. तू मला हवं ते बोल किंवा बोलूही नको! तुझे जगणे हे वैचारिक धारेत निरुपयोगी असेल तर जग, तू जगायला लायक नाहीतर मरायला तयार हो। खूप मोठ्याने म्हणतो आपण, माणूस मेला तरी चालेल विचार जगायला हवेत. पण मग एकच प्रश्न! जगण्याचा हक्क प्रत्येक माणसाचा, मग माणूस का जगायला नको? हा प्रश्न उत्तरहीन!