शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

हा तर नित्याचा ताप

By admin | Updated: February 25, 2016 04:31 IST

शिवजयंतीच्या दिवशी मराठवाड्यातील एक मुस्लीम फौजदार आणि अन्य कर्मचारी यांची काही कथित शिवभक्तांकरवी सार्वजनिक अप्रतिष्ठा होण्यापूर्वी या पोलिसांनी मागितलेली

शिवजयंतीच्या दिवशी मराठवाड्यातील एक मुस्लीम फौजदार आणि अन्य कर्मचारी यांची काही कथित शिवभक्तांकरवी सार्वजनिक अप्रतिष्ठा होण्यापूर्वी या पोलिसांनी मागितलेली वाढीव कुमक वेळीच पाठविली नाही म्हणून एका पोलीस निरीक्षकाची बदली करणे आणि औरंगाबाद परिक्षेत्राच्या महानिरीक्षकास झाल्या प्रकाराची समग्र चौकशी करण्याचे आदेश देणे यातून फारसे काही साध्य होण्यासारखे नाही. लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील पानगाव या लहानशा गावातील संबंधित शिवभक्त युवक गावभर भगवे झेंडे लावत होते. पण जातीय तणावामुळे कुख्यात झालेल्या एका चौकात त्यांना तसे करण्यास संबंधित मुस्लीम फौजदाराने अटकाव केला. त्यावर मोठा जमाव पोलीस ठाण्यावर चाल करुन गेला असता रेणापूरच्या निरीक्षकाकडे वाढीव कुमक पाठविण्याची विनंती केली गेली. पण ही कुमक वेळेवर दाखल झाली नाही. दरम्यान युनूस शेख आणि आवसकर या पोलीस कर्मचाऱ्यांची एकप्रकारे गावातून धिंड काढली गेली व जिथे भगवा फडकविण्यास त्यांनी अटकाव केला होता तिथे त्यांच्याच हस्ते तो फडकविण्यास भाग पाडून त्यांना घोषणा देण्यासही बाध्य केले गेले. या प्रकरणाचा गवगवा झाल्यानंतर पोलिसांनी डझनभर युवकाना अटक केली असली तरी त्यांच्या म्होरक्यांना पोलिसांनी हातही लावला नसल्याचा आणि पोलीस कर्मचारी असूनही पोलीस दल आपल्या पित्याच्या पाठीशी उभे राहिले नसल्याचा आरोप युनूस शेख यांच्या मुलाने केला आहे. वास्तविक पाहाता गावातील जो चौक याआधी दलित आणि सवर्ण यांच्यातील संघर्षाला कारणीभूत ठरला होता तिथे भगवा झेंडा लावून अकारण जातीय तणावास निमंत्रण दिले जाऊ नये यासाठीच संबंधित पोलीस फौजदाराने अटकाव करण्याची भूमिका घेतली होती व ते त्याचे कर्तव्यच होते. ते करण्यापासून त्याला परावृत्त करणे आणि एकप्रकारे दहशत निर्माण करणे व तेदेखील छत्रपतींचे नाव घेऊन हा धिंगाणा झाला व तो निश्चितच दुर्लक्ष करण्यासारखा नाही. तथापि पानगावात अंमळ अधिकच अतिरेक झाला वा एका मुस्लीम पोलीस अधिकाऱ्याचा छळवाद झाला म्हणूनच कदाचित या घटनेची राष्ट्रीय बातमी झाली. पण असा धुडगूस आता संपूर्ण राज्यात सर्रास झाला आहे. एरवी काही संघटना सरकारने मान्य केलेली शिवजयंती मान्य करीत नाहीत. पण धुडगूस घालणाऱ्यांना त्याच्याशी काही कर्तव्य नसते. तथापि केवळ शिवजयंतीच्याच दिवशी असे प्रकार होतात असेही नाही. कोणत्या ना कोणत्या राष्ट्रपुरुषाच्या वा सणाच्या नावे गावातील हमरस्त्यावरुन निरनिराळ्या रंगांचे आणि आकारांचे झेंडे घेऊन मोटारसायकल फेऱ्या काढणे व लोकाना वेठीला धरणे अलीकडच्या काळात सर्रास झाले आहे. पोलिसांची परवानगी घेऊन कधीही असले प्रकार होत नसले तरी पोलीस कधीही त्यांना अटकाव करताना दिसत नाहीत. परिणामी हा राज्यातील बहुतेक सर्व गावांमधील नित्याचा ताप झाला असून त्यांना पोलिसांपेक्षा विविध राजकीय पक्ष आणि राजकीय संघटनाचाच चाप लावू शकतात, कारण त्यांच्या आशीर्वादाने आणि अर्थसाह्यानेच हे घडत असते.