शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
3
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उडी मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
4
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
5
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
6
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
7
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
8
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
9
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
10
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
11
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
12
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
13
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
14
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
15
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
16
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
17
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
18
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
19
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
20
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन

हा तर नित्याचा ताप

By admin | Updated: February 25, 2016 04:31 IST

शिवजयंतीच्या दिवशी मराठवाड्यातील एक मुस्लीम फौजदार आणि अन्य कर्मचारी यांची काही कथित शिवभक्तांकरवी सार्वजनिक अप्रतिष्ठा होण्यापूर्वी या पोलिसांनी मागितलेली

शिवजयंतीच्या दिवशी मराठवाड्यातील एक मुस्लीम फौजदार आणि अन्य कर्मचारी यांची काही कथित शिवभक्तांकरवी सार्वजनिक अप्रतिष्ठा होण्यापूर्वी या पोलिसांनी मागितलेली वाढीव कुमक वेळीच पाठविली नाही म्हणून एका पोलीस निरीक्षकाची बदली करणे आणि औरंगाबाद परिक्षेत्राच्या महानिरीक्षकास झाल्या प्रकाराची समग्र चौकशी करण्याचे आदेश देणे यातून फारसे काही साध्य होण्यासारखे नाही. लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील पानगाव या लहानशा गावातील संबंधित शिवभक्त युवक गावभर भगवे झेंडे लावत होते. पण जातीय तणावामुळे कुख्यात झालेल्या एका चौकात त्यांना तसे करण्यास संबंधित मुस्लीम फौजदाराने अटकाव केला. त्यावर मोठा जमाव पोलीस ठाण्यावर चाल करुन गेला असता रेणापूरच्या निरीक्षकाकडे वाढीव कुमक पाठविण्याची विनंती केली गेली. पण ही कुमक वेळेवर दाखल झाली नाही. दरम्यान युनूस शेख आणि आवसकर या पोलीस कर्मचाऱ्यांची एकप्रकारे गावातून धिंड काढली गेली व जिथे भगवा फडकविण्यास त्यांनी अटकाव केला होता तिथे त्यांच्याच हस्ते तो फडकविण्यास भाग पाडून त्यांना घोषणा देण्यासही बाध्य केले गेले. या प्रकरणाचा गवगवा झाल्यानंतर पोलिसांनी डझनभर युवकाना अटक केली असली तरी त्यांच्या म्होरक्यांना पोलिसांनी हातही लावला नसल्याचा आणि पोलीस कर्मचारी असूनही पोलीस दल आपल्या पित्याच्या पाठीशी उभे राहिले नसल्याचा आरोप युनूस शेख यांच्या मुलाने केला आहे. वास्तविक पाहाता गावातील जो चौक याआधी दलित आणि सवर्ण यांच्यातील संघर्षाला कारणीभूत ठरला होता तिथे भगवा झेंडा लावून अकारण जातीय तणावास निमंत्रण दिले जाऊ नये यासाठीच संबंधित पोलीस फौजदाराने अटकाव करण्याची भूमिका घेतली होती व ते त्याचे कर्तव्यच होते. ते करण्यापासून त्याला परावृत्त करणे आणि एकप्रकारे दहशत निर्माण करणे व तेदेखील छत्रपतींचे नाव घेऊन हा धिंगाणा झाला व तो निश्चितच दुर्लक्ष करण्यासारखा नाही. तथापि पानगावात अंमळ अधिकच अतिरेक झाला वा एका मुस्लीम पोलीस अधिकाऱ्याचा छळवाद झाला म्हणूनच कदाचित या घटनेची राष्ट्रीय बातमी झाली. पण असा धुडगूस आता संपूर्ण राज्यात सर्रास झाला आहे. एरवी काही संघटना सरकारने मान्य केलेली शिवजयंती मान्य करीत नाहीत. पण धुडगूस घालणाऱ्यांना त्याच्याशी काही कर्तव्य नसते. तथापि केवळ शिवजयंतीच्याच दिवशी असे प्रकार होतात असेही नाही. कोणत्या ना कोणत्या राष्ट्रपुरुषाच्या वा सणाच्या नावे गावातील हमरस्त्यावरुन निरनिराळ्या रंगांचे आणि आकारांचे झेंडे घेऊन मोटारसायकल फेऱ्या काढणे व लोकाना वेठीला धरणे अलीकडच्या काळात सर्रास झाले आहे. पोलिसांची परवानगी घेऊन कधीही असले प्रकार होत नसले तरी पोलीस कधीही त्यांना अटकाव करताना दिसत नाहीत. परिणामी हा राज्यातील बहुतेक सर्व गावांमधील नित्याचा ताप झाला असून त्यांना पोलिसांपेक्षा विविध राजकीय पक्ष आणि राजकीय संघटनाचाच चाप लावू शकतात, कारण त्यांच्या आशीर्वादाने आणि अर्थसाह्यानेच हे घडत असते.