शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

अपघाती मुख्यमंत्री

By admin | Updated: September 14, 2016 05:04 IST

हा जर खरोखरीच एक योगायोग असेल तर तो मोठा विलक्षणच म्हणावा लागेल. बिहारातील लालूप्रसाद यांचे पट्टशिष्य, त्या राज्यातील सिवान मतदारसंघाचे चार वेळा लोकसभेत

हा जर खरोखरीच एक योगायोग असेल तर तो मोठा विलक्षणच म्हणावा लागेल. बिहारातील लालूप्रसाद यांचे पट्टशिष्य, त्या राज्यातील सिवान मतदारसंघाचे चार वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे ‘लोकनेते’, गुन्हेगारी साम्राज्याचे पोशिंदे आणि खून प्रकरणी जन्मठेप भोगणारे मुहम्मद शहाबुद्दीन यांची जामिनावर सुटका होताक्षणी राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरोधात खुद्द शहाबुद्दीन यांनी आणि माजी केन्द्रीय मंत्री डॉ.रघुवंश प्रसाद सिंह यांनी तोफ डागावी याला वेगळे महत्व आहे. भाजपाला बिहारात पाय रोवू द्यायचा नाही या निर्धाराने तिथे विधानसभा निवडणुकीत ‘जनता’ परिवार या नावाखाली कथित धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आले आणि त्यांनी एकमताने नितीशकुमार यांना भावी मुख्यमंत्री म्हणून मुक्रर केले. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे खुद्द लालूप्रसाद न्यायालयात लाच प्रकरणी गुन्हेगार सिद्ध झाल्याने व जामिनावर मुक्त असल्याने निवडणूक लढविण्यास अपात्र होते आणि आजही आहेत. निवडणुकीत जनता परिवारासमोर भाजपाचा टिकाव लागला नाही आणि नितीशकुमार मुख्यमंत्री झाले. त्यांनी लालूंच्या दोन मुलाना आपल्या मंत्रिमंडळात सहभागीही करुन घेतले. पण आता शहाबुद्दीन यांनी कारागृहातून बाहेर येताक्षणी नितीशकुमार यांना अपघाती मुख्यमंत्री असे बिरुद बहाल केले आहे आणि ते आपले नेते कधीच होऊ शकत नाहीत, आपले नेते लालूप्रसादच आहेत असे स्पष्टपणे जाहीर केले. शहाबुद्दीन यांची भागलपूर कारागृहातून जामिनावर मुक्तता झाली तेव्हां तिथे अलोट गर्दी होती व त्या ठिकाणाहून तब्बल दोनशे मोटारींच्या ताफ्यात ते सिवानला जाऊन पोहोचले. ताफ्यात काही लाल दिव्याच्या मोटारीही होत्या, पण वाटेतील एका रस्त्यावरील टोल त्यांनी तर नाहीच, पण इतर वाहनांनीही भरला नाही कारण टोल न घेण्याचे म्हणे आदेशच जारी झाले होते. याचा अर्थ तेथील राजकारण पुन्हा एकदा आपली कूस बदलू लागले आहे. त्याचा प्रत्यय डॉ.रघुवंश प्रताप सिंह यांनीही आणून दिला आहे. आपल्याला आपले नेते लालूप्रसाद हेच मुख्यमंत्री व्हायला हवे होते पण त्यांचा नाईलाज झाल्याने आम्हीही नाईलाजाने नितीशकुमार यांना स्वीकारले असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी नितीशकुमार यांनी लागू केलेल्या दारुबंदीच्या धोरणावर टीका केली असून या धोरणाचा वापर लोकाना बदनाम करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप केला आहे. शहाबुद्दीन असोत की रघुवंश प्रसाद, दोघे स्वत:स लालूंचे अनुयायी मानीत असल्याने त्यांनी जी भाषा सुरु केली आहे ती त्यांची स्वत:चीच असेल आणि त्यांचे बोलविते धनी खुद्द लालूप्रसाद नसतील असे ठामपणे कोणीही सांगू शकणार नाही. यातून एक मात्र झाले आहे. भाजपाला ‘जंगलराज की वापसी’ असा प्रचार करण्याची संधी मिळाली आहे. नितीशकुमार यांनी न्यायालयात बोटचेपी भूमिका घेतल्यानेच शहाबुद्दीन यांना जामीन मिळाला, असा आरोपही आता केला जाऊ लागला आहे. पण नितीश हेदेखील राजकारणातील पट्टीचे पोहणारे असल्याने ते सारे काही निमूट सहन करतील असे नव्हे.