शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

अपघाती मुख्यमंत्री

By admin | Updated: September 14, 2016 05:04 IST

हा जर खरोखरीच एक योगायोग असेल तर तो मोठा विलक्षणच म्हणावा लागेल. बिहारातील लालूप्रसाद यांचे पट्टशिष्य, त्या राज्यातील सिवान मतदारसंघाचे चार वेळा लोकसभेत

हा जर खरोखरीच एक योगायोग असेल तर तो मोठा विलक्षणच म्हणावा लागेल. बिहारातील लालूप्रसाद यांचे पट्टशिष्य, त्या राज्यातील सिवान मतदारसंघाचे चार वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे ‘लोकनेते’, गुन्हेगारी साम्राज्याचे पोशिंदे आणि खून प्रकरणी जन्मठेप भोगणारे मुहम्मद शहाबुद्दीन यांची जामिनावर सुटका होताक्षणी राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरोधात खुद्द शहाबुद्दीन यांनी आणि माजी केन्द्रीय मंत्री डॉ.रघुवंश प्रसाद सिंह यांनी तोफ डागावी याला वेगळे महत्व आहे. भाजपाला बिहारात पाय रोवू द्यायचा नाही या निर्धाराने तिथे विधानसभा निवडणुकीत ‘जनता’ परिवार या नावाखाली कथित धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आले आणि त्यांनी एकमताने नितीशकुमार यांना भावी मुख्यमंत्री म्हणून मुक्रर केले. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे खुद्द लालूप्रसाद न्यायालयात लाच प्रकरणी गुन्हेगार सिद्ध झाल्याने व जामिनावर मुक्त असल्याने निवडणूक लढविण्यास अपात्र होते आणि आजही आहेत. निवडणुकीत जनता परिवारासमोर भाजपाचा टिकाव लागला नाही आणि नितीशकुमार मुख्यमंत्री झाले. त्यांनी लालूंच्या दोन मुलाना आपल्या मंत्रिमंडळात सहभागीही करुन घेतले. पण आता शहाबुद्दीन यांनी कारागृहातून बाहेर येताक्षणी नितीशकुमार यांना अपघाती मुख्यमंत्री असे बिरुद बहाल केले आहे आणि ते आपले नेते कधीच होऊ शकत नाहीत, आपले नेते लालूप्रसादच आहेत असे स्पष्टपणे जाहीर केले. शहाबुद्दीन यांची भागलपूर कारागृहातून जामिनावर मुक्तता झाली तेव्हां तिथे अलोट गर्दी होती व त्या ठिकाणाहून तब्बल दोनशे मोटारींच्या ताफ्यात ते सिवानला जाऊन पोहोचले. ताफ्यात काही लाल दिव्याच्या मोटारीही होत्या, पण वाटेतील एका रस्त्यावरील टोल त्यांनी तर नाहीच, पण इतर वाहनांनीही भरला नाही कारण टोल न घेण्याचे म्हणे आदेशच जारी झाले होते. याचा अर्थ तेथील राजकारण पुन्हा एकदा आपली कूस बदलू लागले आहे. त्याचा प्रत्यय डॉ.रघुवंश प्रताप सिंह यांनीही आणून दिला आहे. आपल्याला आपले नेते लालूप्रसाद हेच मुख्यमंत्री व्हायला हवे होते पण त्यांचा नाईलाज झाल्याने आम्हीही नाईलाजाने नितीशकुमार यांना स्वीकारले असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी नितीशकुमार यांनी लागू केलेल्या दारुबंदीच्या धोरणावर टीका केली असून या धोरणाचा वापर लोकाना बदनाम करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप केला आहे. शहाबुद्दीन असोत की रघुवंश प्रसाद, दोघे स्वत:स लालूंचे अनुयायी मानीत असल्याने त्यांनी जी भाषा सुरु केली आहे ती त्यांची स्वत:चीच असेल आणि त्यांचे बोलविते धनी खुद्द लालूप्रसाद नसतील असे ठामपणे कोणीही सांगू शकणार नाही. यातून एक मात्र झाले आहे. भाजपाला ‘जंगलराज की वापसी’ असा प्रचार करण्याची संधी मिळाली आहे. नितीशकुमार यांनी न्यायालयात बोटचेपी भूमिका घेतल्यानेच शहाबुद्दीन यांना जामीन मिळाला, असा आरोपही आता केला जाऊ लागला आहे. पण नितीश हेदेखील राजकारणातील पट्टीचे पोहणारे असल्याने ते सारे काही निमूट सहन करतील असे नव्हे.