शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

अपघाती मुख्यमंत्री

By admin | Updated: September 14, 2016 05:04 IST

हा जर खरोखरीच एक योगायोग असेल तर तो मोठा विलक्षणच म्हणावा लागेल. बिहारातील लालूप्रसाद यांचे पट्टशिष्य, त्या राज्यातील सिवान मतदारसंघाचे चार वेळा लोकसभेत

हा जर खरोखरीच एक योगायोग असेल तर तो मोठा विलक्षणच म्हणावा लागेल. बिहारातील लालूप्रसाद यांचे पट्टशिष्य, त्या राज्यातील सिवान मतदारसंघाचे चार वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे ‘लोकनेते’, गुन्हेगारी साम्राज्याचे पोशिंदे आणि खून प्रकरणी जन्मठेप भोगणारे मुहम्मद शहाबुद्दीन यांची जामिनावर सुटका होताक्षणी राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरोधात खुद्द शहाबुद्दीन यांनी आणि माजी केन्द्रीय मंत्री डॉ.रघुवंश प्रसाद सिंह यांनी तोफ डागावी याला वेगळे महत्व आहे. भाजपाला बिहारात पाय रोवू द्यायचा नाही या निर्धाराने तिथे विधानसभा निवडणुकीत ‘जनता’ परिवार या नावाखाली कथित धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आले आणि त्यांनी एकमताने नितीशकुमार यांना भावी मुख्यमंत्री म्हणून मुक्रर केले. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे खुद्द लालूप्रसाद न्यायालयात लाच प्रकरणी गुन्हेगार सिद्ध झाल्याने व जामिनावर मुक्त असल्याने निवडणूक लढविण्यास अपात्र होते आणि आजही आहेत. निवडणुकीत जनता परिवारासमोर भाजपाचा टिकाव लागला नाही आणि नितीशकुमार मुख्यमंत्री झाले. त्यांनी लालूंच्या दोन मुलाना आपल्या मंत्रिमंडळात सहभागीही करुन घेतले. पण आता शहाबुद्दीन यांनी कारागृहातून बाहेर येताक्षणी नितीशकुमार यांना अपघाती मुख्यमंत्री असे बिरुद बहाल केले आहे आणि ते आपले नेते कधीच होऊ शकत नाहीत, आपले नेते लालूप्रसादच आहेत असे स्पष्टपणे जाहीर केले. शहाबुद्दीन यांची भागलपूर कारागृहातून जामिनावर मुक्तता झाली तेव्हां तिथे अलोट गर्दी होती व त्या ठिकाणाहून तब्बल दोनशे मोटारींच्या ताफ्यात ते सिवानला जाऊन पोहोचले. ताफ्यात काही लाल दिव्याच्या मोटारीही होत्या, पण वाटेतील एका रस्त्यावरील टोल त्यांनी तर नाहीच, पण इतर वाहनांनीही भरला नाही कारण टोल न घेण्याचे म्हणे आदेशच जारी झाले होते. याचा अर्थ तेथील राजकारण पुन्हा एकदा आपली कूस बदलू लागले आहे. त्याचा प्रत्यय डॉ.रघुवंश प्रताप सिंह यांनीही आणून दिला आहे. आपल्याला आपले नेते लालूप्रसाद हेच मुख्यमंत्री व्हायला हवे होते पण त्यांचा नाईलाज झाल्याने आम्हीही नाईलाजाने नितीशकुमार यांना स्वीकारले असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी नितीशकुमार यांनी लागू केलेल्या दारुबंदीच्या धोरणावर टीका केली असून या धोरणाचा वापर लोकाना बदनाम करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप केला आहे. शहाबुद्दीन असोत की रघुवंश प्रसाद, दोघे स्वत:स लालूंचे अनुयायी मानीत असल्याने त्यांनी जी भाषा सुरु केली आहे ती त्यांची स्वत:चीच असेल आणि त्यांचे बोलविते धनी खुद्द लालूप्रसाद नसतील असे ठामपणे कोणीही सांगू शकणार नाही. यातून एक मात्र झाले आहे. भाजपाला ‘जंगलराज की वापसी’ असा प्रचार करण्याची संधी मिळाली आहे. नितीशकुमार यांनी न्यायालयात बोटचेपी भूमिका घेतल्यानेच शहाबुद्दीन यांना जामीन मिळाला, असा आरोपही आता केला जाऊ लागला आहे. पण नितीश हेदेखील राजकारणातील पट्टीचे पोहणारे असल्याने ते सारे काही निमूट सहन करतील असे नव्हे.