शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

सुलभ ‘पासपोर्ट’

By admin | Updated: January 4, 2017 04:28 IST

पासपोर्ट काढायचा म्हटले की, लोकाना तशीही धडकी भरते. यासाठीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडणे म्हणजे दिव्यच असते. विशेष म्हणजे ई-गव्हर्नन्सच्या या जमान्यातदेखील

पासपोर्ट काढायचा म्हटले की, लोकाना तशीही धडकी भरते. यासाठीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडणे म्हणजे दिव्यच असते. विशेष म्हणजे ई-गव्हर्नन्सच्या या जमान्यातदेखील पासपोर्ट मिळविण्यासाठी करावा लागणारा द्राविडी प्राणायाम म्हणजे निव्वळ वेळ आणि ऊर्जेचा अपव्ययच. परंतु आता पासपोर्ट मिळणे सहजसोपे होणार आहे. या संदर्भातील नियम शिथील करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने लोकांचा मानसिक त्रास संपणार आहे. सर्वाधिक दिलासा देणारी बाब म्हणजे जन्म तारखेसाठी जन्माचे प्रमाणपत्र अनिवार्य असणार नाही. आधारकार्ड, पॅनकार्ड आणि वाहनचालक परवानासुद्धा पुरावा म्हणून स्वीकारला जाईल. यापूर्वी एकल पालकत्व असलेल्या मुलाना पासपोर्ट काढताना आईवडील दोघांचीही नावे बंधनकारक असल्याने फार मोठी अडचण जात असे. समाजात स्त्री-पुरुष संबंधांमधील बदलती समीकरणे लक्षात घेता त्यात बदल आवश्यक होता. नव्या नियमानुसार ही अनिवार्यता राहणार नसल्याने फार मोठा दिलासा मिळाला आहे. आईवडिलांपैकी कुणा एकाचे नावही पुरेसे असेल. याशिवाय अनौरस मुलांच्याही भावनिक स्थितीचा विचार करताना अशा मुलांना जन्माचे प्रमाणपत्र अथवा दहावीचे प्रमाणपत्र सादर करण्याची गरज राहणार नाही. केवळ अनाथालयातील प्रमुखाने संस्थेच्या लेटरहेडवर दिलेली जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल. नियमांमधील या महत्त्वपूर्ण बदलाशिवाय पासपोर्ट सुविधांची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने टपाल कार्यालयांची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे नवीन पासपोर्ट काढणे अथवा नूतनीकरणासाठी पासपोर्ट केंद्रातच जाण्याची गरज राहणार नाही. आपल्या घराजवळील टपाल कार्यालयातही अर्ज भरता येतील. अर्थात ही व्यवस्था देशभर लागू करण्यास आणखी थोडा कालावधी लागेल. प्राथमिक टप्प्यात दिल्ली आणि इतर काही राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू होणार आहे. वाढती लोकसंख्या आणि पासपोर्ट इच्छुकांची गर्दी लक्षात घेता हे आवश्यक होते. उशिरा का होईना सरकारला जाग आली, हे महत्त्वाचे आहे. आजच्या या अत्यंत गतिमान जगात टिकाव धरण्याकरिता समाजालाही आपला वेग वाढवावा लागणार आहे. अशात नियम, कायद्यांचे अनावश्यक अडथळे कुणाच्याही फायद्याचे नाहीत आणि शेवटी कुठलेही नियम अथवा कायदे हे समाजासाठीच असतात. समाज त्यांच्यासाठी नसतो.