शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सुलभ ‘पासपोर्ट’

By admin | Updated: January 4, 2017 04:28 IST

पासपोर्ट काढायचा म्हटले की, लोकाना तशीही धडकी भरते. यासाठीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडणे म्हणजे दिव्यच असते. विशेष म्हणजे ई-गव्हर्नन्सच्या या जमान्यातदेखील

पासपोर्ट काढायचा म्हटले की, लोकाना तशीही धडकी भरते. यासाठीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडणे म्हणजे दिव्यच असते. विशेष म्हणजे ई-गव्हर्नन्सच्या या जमान्यातदेखील पासपोर्ट मिळविण्यासाठी करावा लागणारा द्राविडी प्राणायाम म्हणजे निव्वळ वेळ आणि ऊर्जेचा अपव्ययच. परंतु आता पासपोर्ट मिळणे सहजसोपे होणार आहे. या संदर्भातील नियम शिथील करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने लोकांचा मानसिक त्रास संपणार आहे. सर्वाधिक दिलासा देणारी बाब म्हणजे जन्म तारखेसाठी जन्माचे प्रमाणपत्र अनिवार्य असणार नाही. आधारकार्ड, पॅनकार्ड आणि वाहनचालक परवानासुद्धा पुरावा म्हणून स्वीकारला जाईल. यापूर्वी एकल पालकत्व असलेल्या मुलाना पासपोर्ट काढताना आईवडील दोघांचीही नावे बंधनकारक असल्याने फार मोठी अडचण जात असे. समाजात स्त्री-पुरुष संबंधांमधील बदलती समीकरणे लक्षात घेता त्यात बदल आवश्यक होता. नव्या नियमानुसार ही अनिवार्यता राहणार नसल्याने फार मोठा दिलासा मिळाला आहे. आईवडिलांपैकी कुणा एकाचे नावही पुरेसे असेल. याशिवाय अनौरस मुलांच्याही भावनिक स्थितीचा विचार करताना अशा मुलांना जन्माचे प्रमाणपत्र अथवा दहावीचे प्रमाणपत्र सादर करण्याची गरज राहणार नाही. केवळ अनाथालयातील प्रमुखाने संस्थेच्या लेटरहेडवर दिलेली जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल. नियमांमधील या महत्त्वपूर्ण बदलाशिवाय पासपोर्ट सुविधांची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने टपाल कार्यालयांची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे नवीन पासपोर्ट काढणे अथवा नूतनीकरणासाठी पासपोर्ट केंद्रातच जाण्याची गरज राहणार नाही. आपल्या घराजवळील टपाल कार्यालयातही अर्ज भरता येतील. अर्थात ही व्यवस्था देशभर लागू करण्यास आणखी थोडा कालावधी लागेल. प्राथमिक टप्प्यात दिल्ली आणि इतर काही राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू होणार आहे. वाढती लोकसंख्या आणि पासपोर्ट इच्छुकांची गर्दी लक्षात घेता हे आवश्यक होते. उशिरा का होईना सरकारला जाग आली, हे महत्त्वाचे आहे. आजच्या या अत्यंत गतिमान जगात टिकाव धरण्याकरिता समाजालाही आपला वेग वाढवावा लागणार आहे. अशात नियम, कायद्यांचे अनावश्यक अडथळे कुणाच्याही फायद्याचे नाहीत आणि शेवटी कुठलेही नियम अथवा कायदे हे समाजासाठीच असतात. समाज त्यांच्यासाठी नसतो.