शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
4
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
5
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
6
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
7
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
8
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
9
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
10
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
11
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
12
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
13
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
14
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
15
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
16
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
17
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
18
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
19
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
20
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'

आवरा या एनजीओंना

By admin | Updated: June 14, 2014 09:03 IST

नर्मदा धरणाची उंची १७ मीटरने वाढवून ती १२0.९ मीटर वरून १३८.७ मीटरवर नेण्याच्या गुजरात व केंद्र सरकारच्या निर्णयाचे सार्‍यांनी स्वागत करायला हवे.

नर्मदा धरणाची उंची १७ मीटरने वाढवून ती १२0.९ मीटर वरून १३८.७ मीटरवर नेण्याच्या गुजरात व केंद्र सरकारच्या निर्णयाचे सार्‍यांनी स्वागत करायला हवे. या धरणाची उंची वाढू नये किंबहुना ते धरणच होऊ नये, यासाठी आंदोलन करणार्‍या मेधा पाटकर आणि बाबा आमटे आदींची ताकद आता ओसरली आहे. बाबा राहिले नाहीत आणि मेधा पराभूत आहे. या आंदोलनात एकेकाळी झुंडीने आलेली माणसेही आता दुरावली आहेत. आदिवासी दूर गेले आहेत आणि त्यातले अनिवासीच तेवढे त्यांच्या स्वार्थाबरहुकूम त्यासोबत राहिले आहेत. तशीही रिकाम्या व वेगवेगळ्य़ा आंदोलनाची वाट पाहणार्‍या माणसांची देशात उणीव नाही. अशी माणसे पुन्हा एकवार पर्यावरण, विस्थापित आणि पुनर्वसन अशा जुन्याच घोषणा देत पुन्हा एकत्र आली तर त्याचेही आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. मुळात या आंदोलनाच्या शिडातली सारी हवा काढली ती 'माते नर्मदे' या डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर या संशोधकाच्या अभ्यासपूर्ण ग्रंथाने. पाटकर आणि त्यांच्या पाठीशी असलेले तथाकथित संशोधक केवढय़ा चुकीच्या भूमिकांवर उभे आहेत आणि त्यांनी गोळा केलेले पुरावे केवढे ठिसूळ आहेत, याची साद्यंत जंत्रीच दाभोळकरांनी त्या ग्रंथात मांडली आहे. पुढे जाऊन हे आंदोलन हा सारा 'देखावा' आहे (इट्स नॉट ए पब्लिक लिटिगेशन बट ए पब्लिक सेरेमनी) असा अभिप्राय त्यावर सर्वोच्च न्यायालयानेच दिला आहे. देशाचे अन्नधान्य वाढवायचे आणि त्यात कमी खर्चाने मिळणार्‍या जलविद्युतचे उत्पादन वाढवायचे, तर ही धरणे हवीतच. त्यातून नर्मदा धरण हे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान व महाराष्ट्र या चार राज्यांची गरज भागविणारे आणि सौराष्ट्राला प्रथमच चांगले पाणी पुरविणारे आहे. मात्र, विदेशी पैशावर स्वदेशाची सेवा करायला सोकावलेल्या 'एनजीओ' नावाच्या अनेक संस्था सध्या देशात आहेत. त्यातल्या अनेक देशाचा आर्थिक विकास थांबविण्याचा प्रयत्न करणार्‍या असल्याची माहिती गुप्तचर विभागाने नुकतीच सरकारला सादर केली आहे; पण नावे मोठी आहेत आणि 'सेवा' हा पुण्यशील शब्द आहे, त्यामुळे सेवाखोरीच्या या व्यवहारात गुंतलेल्या अनेकांना हात लावायचा म्हटला तरी सरकार बिचकायचे. २0१२ मध्ये प्रकाशित झालेल्या एका सरकारी अहवालात भारतातील एनजीओंना २00५ ते २0१0 या काळात विदेशातून ५५ हजार कोटी रुपये मिळाल्याची माहिती आहे. त्याच काळात एका इंग्रजी नियतकालिकाने जगभरच्या एनजीओंना वर्षाकाठी मिळणारी पैशाची रसद ४५५ अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड असल्याचे प्रकाशित केले. प्रत्यक्षात जगभरच्या पहिल्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थांना खीळ घालणारी ही दुसर्‍या नंबरची व जमिनीखालची काळी अर्थव्यवस्थाच आहे आणि जगभरच्या उद्योगपतींचे उद्योग नफ्यात चालावेत म्हणून नव्या विकसनशील देशांना स्वयंपूर्ण वा श्रीमंत न होऊ देण्यासाठी त्या धनवंतांनी चालविलेला हा पैशाचा खेळ आहे. पर्यावरणाच्या व इतर नावाच्या आंदोलनांना मिळणारा पैसा कुठून येतो व तो कोण देतो एवढे त्यांना विचारले तरी या माणसांची बोबडी वळते, असे त्यांचे वैचारिक दुबळेपण आहे. या सार्‍यांच्या धरणविरोधाचे एक महत्त्वाचे पुढे केले जाणारे कारण धरणामुळे विस्थापित होणार्‍यांचे पुनर्वसन हे आहे. ते गरजेचेही आहे; पण त्यासाठी विकास नको, धरण नको, उद्योग नको ही विचारसरणीच आत्मघातकी आहे. पुनर्वसनाच्या प्रयत्नांसाठी आंदोलन करणे वेगळे आणि धरणच नको म्हणून ते करणे वेगळे, दुर्दैवाने यातील फसवेगिरीचा मोह भल्याभल्यांना पडतो. त्या मागे विदेशी व स्वदेशी पैसेवाले त्यांचे पाठबळ घेऊन उभे असतात. आताच्या गुजरात सरकारने नर्मदा आंदोलनाला दीड दशक तोंड दिले आहे. त्या आंदोलनामुळे त्या प्रकल्पाचा खर्च चारपटींनी वाढला आहे. नव्या आनंदीबेन पटेल सरकारने पुनर्वसनाच्या योजनांचा एक तपशीलही केंद्राला सादर केला आहे. अशा जुन्या आश्‍वासनांपैकी अनेक आश्‍वासने सरकारने पूर्णही केली आहेत. अखेर देश मोठा, समाज मोठा व त्याची गरज महत्त्वाची आहे. मेधा पाटकर आणि त्यांच्या सर्मथकांचा गदारोळ त्या गरजपूर्तीच्या आड येत असेल तर त्याचा कठोरपणे बंदोबस्त करणे व विकासाच्या मार्गाने पुढे जाणे हेच सरकारचे कर्तव्य आहे. भाक्रा नानगल, हिराकुंड, निजामसागर किंवा जायकवाडी यांसारख्या देशातील मोठय़ा धरणांनी देशाची व या धरणांलगतच्या प्रदेशाची श्रीमंती अनेक पटींनी वाढविली आहे. आजची देशाची स्वयंपूर्णताही त्याचमुळे आहे. हा देश आणखी मजबूत व्हावा, त्याला अन्नधान्यापासून कशाचीही आयात करावी लागू नये, यासाठी नर्मदा धरणाची नवी योजना अमलात येणे गरजेचे आहे.