शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

आमिरचे मनसंधारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:02 IST

सामाजिक बांधिलकी वैगेरे शब्द कधी ओठी आलेच तर ते केवळ अभिनयापोटी येतात.

चित्रपटाची रूपेरी दुनिया म्हणजे एक झगमगता आभास असतो. जिथे पैसा आणि प्रसिद्धीच्या पलीकडे फारसे कुणाला कशाचे सोयरसूतक राहत नाही. सामाजिक बांधिलकी वैगेरे शब्द कधी ओठी आलेच तर ते केवळ अभिनयापोटी येतात. पण, या कमालीच्या व्यवहारी विश्वातही काही सन्मानजनक अपवाद असे आहेत ज्यांनी प्रसिद्धीच्या अगदी शिखरावर असूनही मातीशी जुळलेली आपली नाळ कधी तुटू दिली नाही. आमिर खान हा याच क्रमातला एक संवेदनशील मनाचा कलावंत. विलासी आयुष्याची सर्व साधने सभोवताली असतानाही हा माणूस विदर्भातील होरपळून टाकणाऱ्या उन्हात हातात घमेले-फावडे घेऊन लोकांना जलसंवर्धनाचे महत्त्व सांगत सुटलाय. हे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘वॉटर कप’ नावाचे वेड त्याने अवघ्या महाराष्ट्राला लावले आहे. क्रिकेट वर्ल्डकपच्याही वेडाला मागे टाकेल इतक्या उत्साहाने लोक या ‘वॉटर कप’च्या प्राप्तीसाठी झपाटल्यागत कामाला लागले आहेत.ोपरिणामी तुफान गाजावाजा केलेल्या राज्य शासनाच्या जलयुक्त शिवारालाही जे साधले नाही ते काम या ‘वॉटर कप’च्या निमित्ताने महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमध्ये होत आहे. यात विदर्भातील मोताळा, जळगाव जामोद, संग्रामपूर, अकोट, पातूर, बार्शी टाकळी, तेल्हारा, कारंजा, मंगरुळ पीर, धारणी, वरुड, मोर्शी, चिखलदरा, नांदगाव, राळेगाव, कळंब, उमरखेड, यवतमाळ, घाटंजी, धारवा, आर्वी, देवळी, कारंजा घाडगे, सेलू व नागपूर जिल्ह्यातील नरखेडचा समावेश आहे. पाण्याच्या बचतीचा हा संदेश आणखी प्रभावीपणे देण्यासाठी १ मे रोजी महाश्रमदान आयोजित करण्यात आले आहे. यात सहभागासाठी आतापर्यंत सव्वालाख जलमित्रांनी आपले नाव नोंदवले आहे. या सर्व बाबी नजरेखालून घातल्या तर आमिर हे जे काही करतोय ते किती भव्य आहे, याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. परंतु काही लोक या विधायक कामाला आमिरच्या व्यावसायिक आयुष्याशी जोडू पाहत आहेत. ‘ठग’ या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनासाठी आमिर असले उद्योग करतोय, असा काहींचा आरोप आहे. परंतु आमिरने जलसंवर्धनातून मनसंवर्धनाचे जे स्वप्न पाहिले आहे ते पैशांच्या अवकाशालाही पुरून उरणारे आहे. त्यातही आमिर तीन वर्षांपासून या ‘वॉटर कप’चे सलग आयोजन करतोय आणि भविष्यात उभा महाराष्ट्र ‘पाणीदार’ होईपर्यंत तो हा घेतला वसा सोडणार नाहीये. चित्रपट हिट होवो वा फ्लॉप. आमिरने कधीच आपल्या व्यावसायिक व सामाजिक आयुष्याची सरमिसळ होऊ दिली नाही. पाण्यासाठी तो आज जे काही करतोय ते त्याने केले नाही तर कुणी त्याला जाब विचारणार नाही वा त्याच्या चित्रपटांवर कुणी बहिष्कारही टाकणार नाही. तरीही आमिर हे करतोय कारण त्याला पाण्यासोबत माणसांची मनेही जोडायची आहेत.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारAamir Khanआमिर खान