शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

आमिरचे मनसंधारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:02 IST

सामाजिक बांधिलकी वैगेरे शब्द कधी ओठी आलेच तर ते केवळ अभिनयापोटी येतात.

चित्रपटाची रूपेरी दुनिया म्हणजे एक झगमगता आभास असतो. जिथे पैसा आणि प्रसिद्धीच्या पलीकडे फारसे कुणाला कशाचे सोयरसूतक राहत नाही. सामाजिक बांधिलकी वैगेरे शब्द कधी ओठी आलेच तर ते केवळ अभिनयापोटी येतात. पण, या कमालीच्या व्यवहारी विश्वातही काही सन्मानजनक अपवाद असे आहेत ज्यांनी प्रसिद्धीच्या अगदी शिखरावर असूनही मातीशी जुळलेली आपली नाळ कधी तुटू दिली नाही. आमिर खान हा याच क्रमातला एक संवेदनशील मनाचा कलावंत. विलासी आयुष्याची सर्व साधने सभोवताली असतानाही हा माणूस विदर्भातील होरपळून टाकणाऱ्या उन्हात हातात घमेले-फावडे घेऊन लोकांना जलसंवर्धनाचे महत्त्व सांगत सुटलाय. हे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘वॉटर कप’ नावाचे वेड त्याने अवघ्या महाराष्ट्राला लावले आहे. क्रिकेट वर्ल्डकपच्याही वेडाला मागे टाकेल इतक्या उत्साहाने लोक या ‘वॉटर कप’च्या प्राप्तीसाठी झपाटल्यागत कामाला लागले आहेत.ोपरिणामी तुफान गाजावाजा केलेल्या राज्य शासनाच्या जलयुक्त शिवारालाही जे साधले नाही ते काम या ‘वॉटर कप’च्या निमित्ताने महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमध्ये होत आहे. यात विदर्भातील मोताळा, जळगाव जामोद, संग्रामपूर, अकोट, पातूर, बार्शी टाकळी, तेल्हारा, कारंजा, मंगरुळ पीर, धारणी, वरुड, मोर्शी, चिखलदरा, नांदगाव, राळेगाव, कळंब, उमरखेड, यवतमाळ, घाटंजी, धारवा, आर्वी, देवळी, कारंजा घाडगे, सेलू व नागपूर जिल्ह्यातील नरखेडचा समावेश आहे. पाण्याच्या बचतीचा हा संदेश आणखी प्रभावीपणे देण्यासाठी १ मे रोजी महाश्रमदान आयोजित करण्यात आले आहे. यात सहभागासाठी आतापर्यंत सव्वालाख जलमित्रांनी आपले नाव नोंदवले आहे. या सर्व बाबी नजरेखालून घातल्या तर आमिर हे जे काही करतोय ते किती भव्य आहे, याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. परंतु काही लोक या विधायक कामाला आमिरच्या व्यावसायिक आयुष्याशी जोडू पाहत आहेत. ‘ठग’ या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनासाठी आमिर असले उद्योग करतोय, असा काहींचा आरोप आहे. परंतु आमिरने जलसंवर्धनातून मनसंवर्धनाचे जे स्वप्न पाहिले आहे ते पैशांच्या अवकाशालाही पुरून उरणारे आहे. त्यातही आमिर तीन वर्षांपासून या ‘वॉटर कप’चे सलग आयोजन करतोय आणि भविष्यात उभा महाराष्ट्र ‘पाणीदार’ होईपर्यंत तो हा घेतला वसा सोडणार नाहीये. चित्रपट हिट होवो वा फ्लॉप. आमिरने कधीच आपल्या व्यावसायिक व सामाजिक आयुष्याची सरमिसळ होऊ दिली नाही. पाण्यासाठी तो आज जे काही करतोय ते त्याने केले नाही तर कुणी त्याला जाब विचारणार नाही वा त्याच्या चित्रपटांवर कुणी बहिष्कारही टाकणार नाही. तरीही आमिर हे करतोय कारण त्याला पाण्यासोबत माणसांची मनेही जोडायची आहेत.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारAamir Khanआमिर खान