शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

आमिरचे मनसंधारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:02 IST

सामाजिक बांधिलकी वैगेरे शब्द कधी ओठी आलेच तर ते केवळ अभिनयापोटी येतात.

चित्रपटाची रूपेरी दुनिया म्हणजे एक झगमगता आभास असतो. जिथे पैसा आणि प्रसिद्धीच्या पलीकडे फारसे कुणाला कशाचे सोयरसूतक राहत नाही. सामाजिक बांधिलकी वैगेरे शब्द कधी ओठी आलेच तर ते केवळ अभिनयापोटी येतात. पण, या कमालीच्या व्यवहारी विश्वातही काही सन्मानजनक अपवाद असे आहेत ज्यांनी प्रसिद्धीच्या अगदी शिखरावर असूनही मातीशी जुळलेली आपली नाळ कधी तुटू दिली नाही. आमिर खान हा याच क्रमातला एक संवेदनशील मनाचा कलावंत. विलासी आयुष्याची सर्व साधने सभोवताली असतानाही हा माणूस विदर्भातील होरपळून टाकणाऱ्या उन्हात हातात घमेले-फावडे घेऊन लोकांना जलसंवर्धनाचे महत्त्व सांगत सुटलाय. हे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘वॉटर कप’ नावाचे वेड त्याने अवघ्या महाराष्ट्राला लावले आहे. क्रिकेट वर्ल्डकपच्याही वेडाला मागे टाकेल इतक्या उत्साहाने लोक या ‘वॉटर कप’च्या प्राप्तीसाठी झपाटल्यागत कामाला लागले आहेत.ोपरिणामी तुफान गाजावाजा केलेल्या राज्य शासनाच्या जलयुक्त शिवारालाही जे साधले नाही ते काम या ‘वॉटर कप’च्या निमित्ताने महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमध्ये होत आहे. यात विदर्भातील मोताळा, जळगाव जामोद, संग्रामपूर, अकोट, पातूर, बार्शी टाकळी, तेल्हारा, कारंजा, मंगरुळ पीर, धारणी, वरुड, मोर्शी, चिखलदरा, नांदगाव, राळेगाव, कळंब, उमरखेड, यवतमाळ, घाटंजी, धारवा, आर्वी, देवळी, कारंजा घाडगे, सेलू व नागपूर जिल्ह्यातील नरखेडचा समावेश आहे. पाण्याच्या बचतीचा हा संदेश आणखी प्रभावीपणे देण्यासाठी १ मे रोजी महाश्रमदान आयोजित करण्यात आले आहे. यात सहभागासाठी आतापर्यंत सव्वालाख जलमित्रांनी आपले नाव नोंदवले आहे. या सर्व बाबी नजरेखालून घातल्या तर आमिर हे जे काही करतोय ते किती भव्य आहे, याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. परंतु काही लोक या विधायक कामाला आमिरच्या व्यावसायिक आयुष्याशी जोडू पाहत आहेत. ‘ठग’ या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनासाठी आमिर असले उद्योग करतोय, असा काहींचा आरोप आहे. परंतु आमिरने जलसंवर्धनातून मनसंवर्धनाचे जे स्वप्न पाहिले आहे ते पैशांच्या अवकाशालाही पुरून उरणारे आहे. त्यातही आमिर तीन वर्षांपासून या ‘वॉटर कप’चे सलग आयोजन करतोय आणि भविष्यात उभा महाराष्ट्र ‘पाणीदार’ होईपर्यंत तो हा घेतला वसा सोडणार नाहीये. चित्रपट हिट होवो वा फ्लॉप. आमिरने कधीच आपल्या व्यावसायिक व सामाजिक आयुष्याची सरमिसळ होऊ दिली नाही. पाण्यासाठी तो आज जे काही करतोय ते त्याने केले नाही तर कुणी त्याला जाब विचारणार नाही वा त्याच्या चित्रपटांवर कुणी बहिष्कारही टाकणार नाही. तरीही आमिर हे करतोय कारण त्याला पाण्यासोबत माणसांची मनेही जोडायची आहेत.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारAamir Khanआमिर खान