शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
3
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
4
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
5
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
6
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
7
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
8
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
9
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
10
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
11
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
12
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
13
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
14
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
15
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
16
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
17
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
18
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
19
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
20
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आमिरचे मनसंधारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:02 IST

सामाजिक बांधिलकी वैगेरे शब्द कधी ओठी आलेच तर ते केवळ अभिनयापोटी येतात.

चित्रपटाची रूपेरी दुनिया म्हणजे एक झगमगता आभास असतो. जिथे पैसा आणि प्रसिद्धीच्या पलीकडे फारसे कुणाला कशाचे सोयरसूतक राहत नाही. सामाजिक बांधिलकी वैगेरे शब्द कधी ओठी आलेच तर ते केवळ अभिनयापोटी येतात. पण, या कमालीच्या व्यवहारी विश्वातही काही सन्मानजनक अपवाद असे आहेत ज्यांनी प्रसिद्धीच्या अगदी शिखरावर असूनही मातीशी जुळलेली आपली नाळ कधी तुटू दिली नाही. आमिर खान हा याच क्रमातला एक संवेदनशील मनाचा कलावंत. विलासी आयुष्याची सर्व साधने सभोवताली असतानाही हा माणूस विदर्भातील होरपळून टाकणाऱ्या उन्हात हातात घमेले-फावडे घेऊन लोकांना जलसंवर्धनाचे महत्त्व सांगत सुटलाय. हे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘वॉटर कप’ नावाचे वेड त्याने अवघ्या महाराष्ट्राला लावले आहे. क्रिकेट वर्ल्डकपच्याही वेडाला मागे टाकेल इतक्या उत्साहाने लोक या ‘वॉटर कप’च्या प्राप्तीसाठी झपाटल्यागत कामाला लागले आहेत.ोपरिणामी तुफान गाजावाजा केलेल्या राज्य शासनाच्या जलयुक्त शिवारालाही जे साधले नाही ते काम या ‘वॉटर कप’च्या निमित्ताने महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमध्ये होत आहे. यात विदर्भातील मोताळा, जळगाव जामोद, संग्रामपूर, अकोट, पातूर, बार्शी टाकळी, तेल्हारा, कारंजा, मंगरुळ पीर, धारणी, वरुड, मोर्शी, चिखलदरा, नांदगाव, राळेगाव, कळंब, उमरखेड, यवतमाळ, घाटंजी, धारवा, आर्वी, देवळी, कारंजा घाडगे, सेलू व नागपूर जिल्ह्यातील नरखेडचा समावेश आहे. पाण्याच्या बचतीचा हा संदेश आणखी प्रभावीपणे देण्यासाठी १ मे रोजी महाश्रमदान आयोजित करण्यात आले आहे. यात सहभागासाठी आतापर्यंत सव्वालाख जलमित्रांनी आपले नाव नोंदवले आहे. या सर्व बाबी नजरेखालून घातल्या तर आमिर हे जे काही करतोय ते किती भव्य आहे, याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. परंतु काही लोक या विधायक कामाला आमिरच्या व्यावसायिक आयुष्याशी जोडू पाहत आहेत. ‘ठग’ या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनासाठी आमिर असले उद्योग करतोय, असा काहींचा आरोप आहे. परंतु आमिरने जलसंवर्धनातून मनसंवर्धनाचे जे स्वप्न पाहिले आहे ते पैशांच्या अवकाशालाही पुरून उरणारे आहे. त्यातही आमिर तीन वर्षांपासून या ‘वॉटर कप’चे सलग आयोजन करतोय आणि भविष्यात उभा महाराष्ट्र ‘पाणीदार’ होईपर्यंत तो हा घेतला वसा सोडणार नाहीये. चित्रपट हिट होवो वा फ्लॉप. आमिरने कधीच आपल्या व्यावसायिक व सामाजिक आयुष्याची सरमिसळ होऊ दिली नाही. पाण्यासाठी तो आज जे काही करतोय ते त्याने केले नाही तर कुणी त्याला जाब विचारणार नाही वा त्याच्या चित्रपटांवर कुणी बहिष्कारही टाकणार नाही. तरीही आमिर हे करतोय कारण त्याला पाण्यासोबत माणसांची मनेही जोडायची आहेत.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारAamir Khanआमिर खान