शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

अन्वयार्थ: ३० वर्षांपूर्वीचा; किल्लारीचा आठवणीतला विनाशकारी भूकंप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 06:00 IST

भूकंपरोधक इमारती बांधता येतात; पण भूकंप प्रतिबंधक इमारती बांधणे शक्य होत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाने मात्र लोकांचे जीव वाचू शकतात.

३० सप्टेंबर, १९९३चा दिवस आठवतो. गणपती विसर्जनाचा तो दिवस होता. सकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानक हादरे जाणवत होते, काय अघटीत घडले ते कळत नव्हते, लोक भयभीत झाले होते. मी त्या वेळेस भगवती कॉलनी, औरंगाबाद (आजचे छ. संभाजीनगर) येथे राहत होतो. नंतर कळले की हा भूकंप आहे. महाराष्ट्राने असा मोठा भूकंप पहिल्यांदाच अनुभवला असावा. हा भूकंप ६.३ रिक्टरचा होता. भूकंपाचा केंद्रबिंदू ७० कि.मी. सोलापूरच्या ईशान्येला होता. सुमारे ९७०० लोक या भूकंपात मृत्युमुखी पडले व तीस हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते. 

भूकंपाबद्दल सांगायचे झाले तर भारताचा प्रभाग हा चार भूकंपप्रवण विभागात विभागला गेला आहे. झोन २, झोन ३, झोन ४ आणि झोन ५ अशा भूकंपप्रवण क्षेत्रात आपला देश विभागला आहे . झोन २ हा कमी तीव्रतेचा, तर झोन ५ हा सर्वांत जास्त तीव्रतेचा प्रभाग असतो. भूकंपप्रवण क्षेत्र ५ मध्ये भूकंप आल्यास तिथे जास्त हानी पोहोचते. साधारणतः भूकंपाचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे डीप फोकस अर्थक्वेक आणि दुसरा शॅलो फोकस अर्थक्वेक. डीप फोकस अर्थक्वेक म्हणजे जमिनीतून बाहेर पडणारी ऊर्जा ही ३० किलोमीटरपेक्षा जास्त खोलवरून येते व जमिनीला जबरदस्त हादरे बसतात, तर शॅलो फोकस अर्थक्वेक यामध्ये जमिनीतून येणारी ऊर्जा ३० किलोमीटर पेक्षा कमी खोलवरून येते. जमिनीतून बाहेर पडणाऱ्या अतिप्रचंड ऊर्जेमुळे अतिवेगवान लहरी निर्माण होतात व जमिनीची जोरदार हालचाल होते. भूकंपाचे भाकीत करता येत नाही. जर्मन शास्त्रज्ञ वेगेनर यांनी भूकंपाबद्दल निश्चित सांगता यावे म्हणून सुमारे ३० वर्षे सतत भूकंपाचा अभ्यास केला व त्यानीही सांगितले की भूकंप अनिश्चित असतो. म्हणूनच भूकंपप्रवण क्षेत्रात इमारतीची संरचना संकल्प चित्र तयार करताना भूकंपशास्त्राचा अभ्यास अत्यावश्यक आहे. भूकंपरोधक इमारती बांधता येतात, पण भूकंप प्रतिबंधक इमारती बांधणे शक्य होत नाही, कारण भूकंपाबद्दल किती मॅग्निट्यूडचा भूकंप येईल हे भाकीत करता येत नाही. परंतु, ‘अर्ली वॉर्निंग सिस्टम’मुळे वेळीच लोकांना सूचित केले जाते. त्यामुळे लोकांचा जीव वाचू शकतो. ३ ते ५ रिश्टरचा भूकंप असेल तर फारशी हानी होत नाही व घरेही पडत नाहीत. ५ ते ६ रिश्टरचा भूकंप असेल तर लोड बेअरिंग घरे पडायला लागतात. ६ ते ८ रिश्टरचा भूकंप असेल तर आरसीसी/काँक्रीटची घरे पडायला लागतात. ८ ते ९ रिश्टर भूकंप जास्त विनाशकारी असतो.भूकंपप्रवण क्षेत्रात भूकंपाची मानके गृहीत धरूनच इमारतीची संरचना, संकल्पचित्रे केली पाहिजेत. यामध्ये सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इमारतीचे सर्व ओझे हे कॉलमवर येत असल्यामुळे ते त्या-त्या प्रमाणात व आवश्यकतेनुसार जाड असावेत. कॉलम हे इमारतीचे पाय असतात, ते मजबूत हवेत हाच भूकंप रोधक संरचना संकल्प चित्राचा मुख्य गाभा असतो. 

किल्लारीच्या भूकंपात मुख्यत्वे दगडांनी, विटांनी बांधलेली घरेच पडली, तुटली पण आरसीसीचे एकही घर या भूकंपात पडले नाही. विशेष म्हणजे खुद्द किल्लारीत असलेले नीळकंठेश्वराचे व दगडांनी बांधलेल्या इतर दोन-तीन मंदिरांना काहीही झाले नाही. कारण त्यामध्ये त्यावेळचे मिस्त्री यांनी भूकंप रोधक मंदिर बांधल्याचे दिसते. कारण त्यामध्ये बॉंड स्टोन, थ्रू स्टोन, कॉर्नर स्टोन, ओव्हर लॅप हे व्यवस्थित असल्याचे आताही दिसून येते. किल्लारीच्या भूकंपाच्या घटनेला आज ३० सप्टेंबर, २०२३ला बरोबर ३० वर्षे पूर्ण होत आहेत. ज्यांनी हा भूकंप अनुभवला तो कोणताही माणूस या भूकंपाची आठवण कदापि विसरू शकणार नाही.

- प्रा. डॉ. राजाराम दमगीर, भूकंपशास्त्राचे अभ्यासक, छत्रपती संभाजीनगर 

टॅग्स :laturलातूरKillari Earthquakeकिल्लारी भूकंप