शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

अन्वयार्थ: ३० वर्षांपूर्वीचा; किल्लारीचा आठवणीतला विनाशकारी भूकंप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 06:00 IST

भूकंपरोधक इमारती बांधता येतात; पण भूकंप प्रतिबंधक इमारती बांधणे शक्य होत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाने मात्र लोकांचे जीव वाचू शकतात.

३० सप्टेंबर, १९९३चा दिवस आठवतो. गणपती विसर्जनाचा तो दिवस होता. सकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानक हादरे जाणवत होते, काय अघटीत घडले ते कळत नव्हते, लोक भयभीत झाले होते. मी त्या वेळेस भगवती कॉलनी, औरंगाबाद (आजचे छ. संभाजीनगर) येथे राहत होतो. नंतर कळले की हा भूकंप आहे. महाराष्ट्राने असा मोठा भूकंप पहिल्यांदाच अनुभवला असावा. हा भूकंप ६.३ रिक्टरचा होता. भूकंपाचा केंद्रबिंदू ७० कि.मी. सोलापूरच्या ईशान्येला होता. सुमारे ९७०० लोक या भूकंपात मृत्युमुखी पडले व तीस हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते. 

भूकंपाबद्दल सांगायचे झाले तर भारताचा प्रभाग हा चार भूकंपप्रवण विभागात विभागला गेला आहे. झोन २, झोन ३, झोन ४ आणि झोन ५ अशा भूकंपप्रवण क्षेत्रात आपला देश विभागला आहे . झोन २ हा कमी तीव्रतेचा, तर झोन ५ हा सर्वांत जास्त तीव्रतेचा प्रभाग असतो. भूकंपप्रवण क्षेत्र ५ मध्ये भूकंप आल्यास तिथे जास्त हानी पोहोचते. साधारणतः भूकंपाचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे डीप फोकस अर्थक्वेक आणि दुसरा शॅलो फोकस अर्थक्वेक. डीप फोकस अर्थक्वेक म्हणजे जमिनीतून बाहेर पडणारी ऊर्जा ही ३० किलोमीटरपेक्षा जास्त खोलवरून येते व जमिनीला जबरदस्त हादरे बसतात, तर शॅलो फोकस अर्थक्वेक यामध्ये जमिनीतून येणारी ऊर्जा ३० किलोमीटर पेक्षा कमी खोलवरून येते. जमिनीतून बाहेर पडणाऱ्या अतिप्रचंड ऊर्जेमुळे अतिवेगवान लहरी निर्माण होतात व जमिनीची जोरदार हालचाल होते. भूकंपाचे भाकीत करता येत नाही. जर्मन शास्त्रज्ञ वेगेनर यांनी भूकंपाबद्दल निश्चित सांगता यावे म्हणून सुमारे ३० वर्षे सतत भूकंपाचा अभ्यास केला व त्यानीही सांगितले की भूकंप अनिश्चित असतो. म्हणूनच भूकंपप्रवण क्षेत्रात इमारतीची संरचना संकल्प चित्र तयार करताना भूकंपशास्त्राचा अभ्यास अत्यावश्यक आहे. भूकंपरोधक इमारती बांधता येतात, पण भूकंप प्रतिबंधक इमारती बांधणे शक्य होत नाही, कारण भूकंपाबद्दल किती मॅग्निट्यूडचा भूकंप येईल हे भाकीत करता येत नाही. परंतु, ‘अर्ली वॉर्निंग सिस्टम’मुळे वेळीच लोकांना सूचित केले जाते. त्यामुळे लोकांचा जीव वाचू शकतो. ३ ते ५ रिश्टरचा भूकंप असेल तर फारशी हानी होत नाही व घरेही पडत नाहीत. ५ ते ६ रिश्टरचा भूकंप असेल तर लोड बेअरिंग घरे पडायला लागतात. ६ ते ८ रिश्टरचा भूकंप असेल तर आरसीसी/काँक्रीटची घरे पडायला लागतात. ८ ते ९ रिश्टर भूकंप जास्त विनाशकारी असतो.भूकंपप्रवण क्षेत्रात भूकंपाची मानके गृहीत धरूनच इमारतीची संरचना, संकल्पचित्रे केली पाहिजेत. यामध्ये सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इमारतीचे सर्व ओझे हे कॉलमवर येत असल्यामुळे ते त्या-त्या प्रमाणात व आवश्यकतेनुसार जाड असावेत. कॉलम हे इमारतीचे पाय असतात, ते मजबूत हवेत हाच भूकंप रोधक संरचना संकल्प चित्राचा मुख्य गाभा असतो. 

किल्लारीच्या भूकंपात मुख्यत्वे दगडांनी, विटांनी बांधलेली घरेच पडली, तुटली पण आरसीसीचे एकही घर या भूकंपात पडले नाही. विशेष म्हणजे खुद्द किल्लारीत असलेले नीळकंठेश्वराचे व दगडांनी बांधलेल्या इतर दोन-तीन मंदिरांना काहीही झाले नाही. कारण त्यामध्ये त्यावेळचे मिस्त्री यांनी भूकंप रोधक मंदिर बांधल्याचे दिसते. कारण त्यामध्ये बॉंड स्टोन, थ्रू स्टोन, कॉर्नर स्टोन, ओव्हर लॅप हे व्यवस्थित असल्याचे आताही दिसून येते. किल्लारीच्या भूकंपाच्या घटनेला आज ३० सप्टेंबर, २०२३ला बरोबर ३० वर्षे पूर्ण होत आहेत. ज्यांनी हा भूकंप अनुभवला तो कोणताही माणूस या भूकंपाची आठवण कदापि विसरू शकणार नाही.

- प्रा. डॉ. राजाराम दमगीर, भूकंपशास्त्राचे अभ्यासक, छत्रपती संभाजीनगर 

टॅग्स :laturलातूरKillari Earthquakeकिल्लारी भूकंप