शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

नादुरुस्त ५ बंधाऱ्यांची जि.प.ने केली पहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 20:44 IST

निजामपूर : अनेक वर्षांपासून दुरवस्था, शासनाचे दुर्लक्ष, पावसाळ्यापूर्वी काम होण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : साक्री तालुक्यात माळमाथ्यावर निजामपूर- जैताणे परिसरात शासनाचे जलसिंचनाकडे दोन-तीन दशकांपासून दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान, दुरवस्थेत असलेल्या पाच बंधाऱ्यांची साक्री पं.स. लघु पाटबंधारे विभागाने पाहणी केली. त्यामुळे आता तरी पावसाळ्यापूर्वी ते दुरुस्त होऊन उपयोगात आणले जातील का, असा सवाल केला जात आहे.‘पाणी अडवा पाणी जिरवा’वर भर दिला जात असला तरी बांधलेले बंधारे अनेक वर्षांपासून थेंबभर पाणीही अडवू शकत नसल्याची विदारक स्थिती आहे. पावसाळ्यात रोहिणी नदीस पूर येतो. मात्र, जागोजागी बंधारे निकामी असल्याने पाणी वाहून जाते. एकंदरीत या भागात जलसिंचनाची ऐसी तैसी झाली आहे.साक्री तालुक्यातील आखाडेजवळ रोहिणी नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा गेल्या दोन दशकांपासून अपूर्णावस्थेत पडून आहे. फळ्या बसल्याच नाही. शेवटचा टप्पा पुर्ण झाला नाही व बंधारा उपयोगात पण आला नाही. शासनाचे पैसे वाया गेले. त्याबद्दल कुणी साधी चौकशी देखील केली नाही. बंधाºयांचे दगड, लोखंड चोरीला गेले.दरम्यान, निजामपूरचे नवनिर्वाचित जि.प. सदस्य हर्षवर्धन दहिते आणि पं.स. सदस्य सतीश राणे यांनी येथील जलसिंचनाची स्थिती विचारात घेऊन पं.स. लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता महाजन यांना पाहणीसाठी पाठविले. यावेळी माजी पं.स. सदस्य वासुदेव बदामे, भाजपा अध्यक्ष महेंद्र वाणी, माजी सरपंच अजितचंद्र शाह, विजय रामचंद्र वाणी उपस्थित होते.नंदुरबार रस्त्यावर साईबाबा मंदिराजवळील नादुरुस्त बंधारा, अजितचंद्र शाह यांच्या शेताजवळील नादुरुस्त बंधाºयाची पाहणी करण्यात आली. तसेच रोहिणी नदीत गावाच्या पश्चिमेस असलेल्या केटीवेअरची पाहणी केली. ग्रामपालिकेने गत पावसाळ्याआधी गाळाने पूर्णपणे भरलेल्या या बंधाºयातून गाळ काढला होता. परंतू बंधारा गळत असल्याने त्याची दुरुस्ती आवश्यक आहे. त्याचे पुढे अजून एक बंधारा असून त्याचीही पाहणी केली.१५ वर्षांपासून रोहिणी नदीवरील पुलाच्या खाली एका मोठ्या केटीवेअरचे सर्वेक्षण झाले होते. पण ते होऊच शकले नाही. ते व्हावे यासाठी जनतेकडून सातत्याने मागणी होत होती. मात्र त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. एकंदरीत या भागात जलसिंचनाकडे शासनाचे दुर्लक्षच राहिले, असे म्हणावे लागेल. आता या पाहणीनंतर तरी जिल्हा परिषदेकडून बंधाºयांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती होईल व त्यात पाणीसाठा होईल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Dhuleधुळे