शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त ५ बंधाऱ्यांची जि.प.ने केली पहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 20:44 IST

निजामपूर : अनेक वर्षांपासून दुरवस्था, शासनाचे दुर्लक्ष, पावसाळ्यापूर्वी काम होण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : साक्री तालुक्यात माळमाथ्यावर निजामपूर- जैताणे परिसरात शासनाचे जलसिंचनाकडे दोन-तीन दशकांपासून दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान, दुरवस्थेत असलेल्या पाच बंधाऱ्यांची साक्री पं.स. लघु पाटबंधारे विभागाने पाहणी केली. त्यामुळे आता तरी पावसाळ्यापूर्वी ते दुरुस्त होऊन उपयोगात आणले जातील का, असा सवाल केला जात आहे.‘पाणी अडवा पाणी जिरवा’वर भर दिला जात असला तरी बांधलेले बंधारे अनेक वर्षांपासून थेंबभर पाणीही अडवू शकत नसल्याची विदारक स्थिती आहे. पावसाळ्यात रोहिणी नदीस पूर येतो. मात्र, जागोजागी बंधारे निकामी असल्याने पाणी वाहून जाते. एकंदरीत या भागात जलसिंचनाची ऐसी तैसी झाली आहे.साक्री तालुक्यातील आखाडेजवळ रोहिणी नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा गेल्या दोन दशकांपासून अपूर्णावस्थेत पडून आहे. फळ्या बसल्याच नाही. शेवटचा टप्पा पुर्ण झाला नाही व बंधारा उपयोगात पण आला नाही. शासनाचे पैसे वाया गेले. त्याबद्दल कुणी साधी चौकशी देखील केली नाही. बंधाºयांचे दगड, लोखंड चोरीला गेले.दरम्यान, निजामपूरचे नवनिर्वाचित जि.प. सदस्य हर्षवर्धन दहिते आणि पं.स. सदस्य सतीश राणे यांनी येथील जलसिंचनाची स्थिती विचारात घेऊन पं.स. लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता महाजन यांना पाहणीसाठी पाठविले. यावेळी माजी पं.स. सदस्य वासुदेव बदामे, भाजपा अध्यक्ष महेंद्र वाणी, माजी सरपंच अजितचंद्र शाह, विजय रामचंद्र वाणी उपस्थित होते.नंदुरबार रस्त्यावर साईबाबा मंदिराजवळील नादुरुस्त बंधारा, अजितचंद्र शाह यांच्या शेताजवळील नादुरुस्त बंधाºयाची पाहणी करण्यात आली. तसेच रोहिणी नदीत गावाच्या पश्चिमेस असलेल्या केटीवेअरची पाहणी केली. ग्रामपालिकेने गत पावसाळ्याआधी गाळाने पूर्णपणे भरलेल्या या बंधाºयातून गाळ काढला होता. परंतू बंधारा गळत असल्याने त्याची दुरुस्ती आवश्यक आहे. त्याचे पुढे अजून एक बंधारा असून त्याचीही पाहणी केली.१५ वर्षांपासून रोहिणी नदीवरील पुलाच्या खाली एका मोठ्या केटीवेअरचे सर्वेक्षण झाले होते. पण ते होऊच शकले नाही. ते व्हावे यासाठी जनतेकडून सातत्याने मागणी होत होती. मात्र त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. एकंदरीत या भागात जलसिंचनाकडे शासनाचे दुर्लक्षच राहिले, असे म्हणावे लागेल. आता या पाहणीनंतर तरी जिल्हा परिषदेकडून बंधाºयांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती होईल व त्यात पाणीसाठा होईल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Dhuleधुळे