शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळांची गुणवत्ता वाढविण्याची गरजेची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 13:44 IST

प्राची साठे : वाजदरे येथील शाळेतील सौर पॅनल उदघाटन प्रसंगी प्रतिपादन

ठळक मुद्देअतिथींची सजविलेल्या बग्गीतून मिरवणूक, दात्यांचा गौरवजिल्ह्यातील लोकसहभागातून डिजिटल व सौर शाळांच्या उपक्रमाची वाहवा पटसंख्या वाढविणाºया शिक्षक, केंद्रप्रमुखांचा मुंबईत होणार गौरव 

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर, जि.धुळे : जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल होणे हे अत्यंत गरजेचे असून  धुळे जिल्ह्यातील सर्व जि.प. शाळा डिजिटल झाल्यात. आता तर या शाळा सौर शाळा होत असून, यासाठी प्रेरणा सभा हा अभिनव उपक्रम राबवून सर्वांच्या सहकार्याने शाळांचे रूप पालटत आहे. त्यासाठी प्रयत्नशील असणारे हर्षल विभांडिक हे या अभियानाचे ‘आयकॉन’ ठरत आहेत. सर्वत्र ग्रामस्थांनीही भरीव सहभाग देत सहकार्य केले. त्यामुळे मरगळलेल्या जि.प. शाळांचे रूपच बदलले आहे. आता शिक्षकांनी देखील याचा उपयोग करून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी प्राची साठे यांनी व्यक्त केली.साक्री तालुक्यातील वाजदरे येथील डिजिटल जि.प.शाळेत सौर पॅनल बसवण्यात येत असून त्याच्या उदघाटन प्रसंगी शिक्षणमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी त्या  बोलत होत्या. या प्रसंगी पुणे येथील विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ.सुनील मगर, शिक्षण विभागाचे कार्यक्रम अधिकारी सिद्धेश वाडकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नूतन बगाडे, डिजिटल व सौर शाळा अभियानाचे प्रेरक हर्षल विभांडिक, पं.स. गटनेते उत्पल नांद्रे, शिक्षणाधिकारी मोहन देसले, नाशिक जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ.विद्या पाटील, नाशिक जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवींद्र जावळे, गटशिक्षणाधिकारी बी.बी. भिल, जि.प.सदस्या उषाबाई ठाकरे, पं.स. सदस्य विश्वास बागुल, वासुदेव बदामे, सुनिता बच्छाव, प्रा.डॉ.रवींद्र ठाकरे, अ‍ॅड.शरदचंद्र शहा, वाजदरेच्या सरपंच सुमन सोनकर आदीसह ग्रामस्थ तसेच निजामपूर, दुसाने व खुडाणे केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यावेळी उपस्थित होते. अतिथींची मिरवणूक, दात्यांचा गौरव प्रमुख अतिथींना सजवलेल्या बग्गीत बसवून कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. या अनोख्या स्वागताने ते सर्व भारावले. आरंभी शाळेला डिजिटल व सौर शाळेसाठी वर्गणी देणाºया दात्यांचा तसेच  विविध साहित्य उपलब्ध करणाºया दात्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.पुणे येथील विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ.सुनील मगर हे यावेळी बोलताना म्हणाले की जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा या लोकसहभागातून डिजिटल झाल्या तर राज्यात देखील जवळपास ३५० कोटी रुपये लोकसहभागातून जमले व यातून जवळपास ६२ हजार शाळा आतापर्यंत डिजिटल झाल्या आहेत. डिजिटल अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असून, गुणवत्ता वाढीसाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच या डिजिटल शाळांना आता सौर शाळांची देखील जोड मिळत असून, लोकसहभागातून शाळा डिजिटल व सौर शाळा करण्याचा हा अभिनव उपक्रम देशातील इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे, असेही गौरवोदगारही त्यांनी काढले. शिक्षक, केंद्रप्रमुखांचा मुंबईत होणार गौरव : हर्षल विभांडिकडिजिटल व सौर शाळा अभियानाचे प्रेरक हर्षल विभांडिक म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षात ज्या शाळा सर्वाधिक पटसंख्या वाढवतील अशा जिल्ह्यातील १८ शाळांचे सर्व शिक्षक, ८ केंद्रप्रमुख व एक गटशिक्षणाधिकारी या सर्वांचा जुलै महिन्याच्या अखेरीस उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते मुंबई येथे गौरव करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.कार्यक्रमाचे संयोजन शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र देसले, बंडू मोरे, आर.जी. पवार, मनीष वसावे, पावबा बच्छाव, बाई पवार, अफ्रीन पठाण, प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश बच्छाव यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थांनी केले.