शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

निवडणुकीच्या माध्यमातून तरूणांचा राजकारणात दमदार प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 12:52 IST

धुळे जिल्ह्यातील गट-गणातून विजयी झालेले तरूण अवघे २२ ते ३० वयोगटातील

अतुल जोशी ।आॅनलाइन लोकमतधुळे : जगात भारत हा देश तरूणांचा देश म्हणून ओळखला जातो. आज २१ व्या शतकात कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्र युवक-युवतींनी व्यापलेली आहे. त्याला आता राजकारणही अपवाद राहिलेले नाही. जिल्ह्यातील राजकारणातही युवा पिढी सक्रीय झालेली आहे. केवळ सक्रीयच नव्हे तर अनेक युवक-युवतींनी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विजय मिळवित दमदार ‘एन्ट्री’ केलेली आहे.धुळे जिल्हा हा समृद्ध राजकारणासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपल्या वक्तृत्व, व कार्यशैलीच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात अढळ स्थान पटकावलेले आहे. धुळे जिल्ह्याचे नाव काढताच रंगराव माधवराव पाटील, तत्कालीन आमदार द.वा. पाटील, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव रणधीर, माजी मंत्री रोहीदास पाटील, माजी मंत्री अमरिशभाई पटेल, माजी मंत्री शालीनी बोरसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. मात्र कालौघात अनेकजण राजकारणातून निवृत्त झालेले आहे. असे असले तरी राजकीय वारसा लाभलेल्या तरूण नेतृत्वाने जिल्ह्याला दिशा देण्याचे प्रयत्न केले आहे. भारत २०२० मध्ये महासत्ता बनेल असे तत्कालीन राष्टÑपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी भाकित वर्तविले होते. आपण नुकताच २०२० मध्ये प्रवेश केलेला आहे. भारत महासत्ता तरूणांच्या जोरावरच बनू शकणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याचा विकास हा तरूण नेतृत्वाकडूनच होवू शकतो असा जिल्हावासियांना विश्वास आहे. तरूणांमध्ये अफाट कल्पनाशक्ती असल्याने, त्याचा उपयोग जिल्ह्याचा विकासासाठी होईल अशी अपेक्षा आता सर्वांनाच आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारांनी आपल्या भागाचे प्रतिनिधीत्व करण्याची तरूणांना संधी दिली आहे.नुकत्याच जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी जिल्ह्यात निवडणुका झाल्या. या निवडणुकीत राजकीय पार्श्वभूमि लाभलले व सर्वसामान्य घरातील तरूण-तरूणींनीही आपले भाग्य अजमावून बघितले. यात त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळविले. अनेक तरूण उमेदवारांनी मातब्बरांचा पराभव करीत जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये धडाक्यात प्रवेश केलेला आहे. यात शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर फॉरेस्ट येथील रहिवाशी व कोडीद गटातून विजयी झालेल्या अनिता रतनबाई पावरा,जळोद (ता.शिरपूर) गणातून निवडून आलेले राहूल राजेश पावरा, नगाव (ता.धुळे) गटातून निवडून आलेले राघवेंद्र उर्फ राम मनोहर पाटील, शिरूड गणातून निवडून आलेले आशुतोष विजय पाटील, निजामपूर गटातून निवडून आलेले हर्षवर्धन शिवाजी दहिते,मैदाणे गणातून विजयी झालेल्या संगीता गणेश गावीत, चिकसे गणातून विजयी झालेले अजय भगवान सूर्यवंशी या तरूण राजकारण्यांचा समावेश आहे.जिल्हा परिषदेचे गट व त्या-त्या तालुक्यातील पंचायत समितींच्या गणातून निवडणून आलेले हे युवा राजकीय नेते अवघ्या २२ ते ३० वयोगटातील आहे. यापैकी काही युवा नेत्यांनी मातब्बरांचे वर्चस्व झुगारून केवळ आपल्या कृर्तत्वाच्या जोरावर पंचायत समितींमध्ये प्रवेश केलेला आहे.आजच्या युवा पिढीला आपल्या भागातील समस्या काय व त्यावर काय उपाययोजना करता येतील याची चांगलीच जाण आहे. आजची युवा पिढी सोशल मीडीयावरही मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे. त्यामुळे या युवा नेत्यांकडून गट व गणातील नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. निवडून आलेली तरूण मंडळी निश्चितच आपल्या भागाचा विकास साधतील असा विश्वास असल्याने, मतदारांनीही त्यांना आपल्या गट-गणाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिलेली आहे. या संधीचे कितीजण सोने करतात याची उत्सुकता आहे.

टॅग्स :Dhuleधुळे