शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या माध्यमातून तरूणांचा राजकारणात दमदार प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 12:52 IST

धुळे जिल्ह्यातील गट-गणातून विजयी झालेले तरूण अवघे २२ ते ३० वयोगटातील

अतुल जोशी ।आॅनलाइन लोकमतधुळे : जगात भारत हा देश तरूणांचा देश म्हणून ओळखला जातो. आज २१ व्या शतकात कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्र युवक-युवतींनी व्यापलेली आहे. त्याला आता राजकारणही अपवाद राहिलेले नाही. जिल्ह्यातील राजकारणातही युवा पिढी सक्रीय झालेली आहे. केवळ सक्रीयच नव्हे तर अनेक युवक-युवतींनी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विजय मिळवित दमदार ‘एन्ट्री’ केलेली आहे.धुळे जिल्हा हा समृद्ध राजकारणासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपल्या वक्तृत्व, व कार्यशैलीच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात अढळ स्थान पटकावलेले आहे. धुळे जिल्ह्याचे नाव काढताच रंगराव माधवराव पाटील, तत्कालीन आमदार द.वा. पाटील, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव रणधीर, माजी मंत्री रोहीदास पाटील, माजी मंत्री अमरिशभाई पटेल, माजी मंत्री शालीनी बोरसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. मात्र कालौघात अनेकजण राजकारणातून निवृत्त झालेले आहे. असे असले तरी राजकीय वारसा लाभलेल्या तरूण नेतृत्वाने जिल्ह्याला दिशा देण्याचे प्रयत्न केले आहे. भारत २०२० मध्ये महासत्ता बनेल असे तत्कालीन राष्टÑपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी भाकित वर्तविले होते. आपण नुकताच २०२० मध्ये प्रवेश केलेला आहे. भारत महासत्ता तरूणांच्या जोरावरच बनू शकणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याचा विकास हा तरूण नेतृत्वाकडूनच होवू शकतो असा जिल्हावासियांना विश्वास आहे. तरूणांमध्ये अफाट कल्पनाशक्ती असल्याने, त्याचा उपयोग जिल्ह्याचा विकासासाठी होईल अशी अपेक्षा आता सर्वांनाच आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारांनी आपल्या भागाचे प्रतिनिधीत्व करण्याची तरूणांना संधी दिली आहे.नुकत्याच जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी जिल्ह्यात निवडणुका झाल्या. या निवडणुकीत राजकीय पार्श्वभूमि लाभलले व सर्वसामान्य घरातील तरूण-तरूणींनीही आपले भाग्य अजमावून बघितले. यात त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळविले. अनेक तरूण उमेदवारांनी मातब्बरांचा पराभव करीत जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये धडाक्यात प्रवेश केलेला आहे. यात शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर फॉरेस्ट येथील रहिवाशी व कोडीद गटातून विजयी झालेल्या अनिता रतनबाई पावरा,जळोद (ता.शिरपूर) गणातून निवडून आलेले राहूल राजेश पावरा, नगाव (ता.धुळे) गटातून निवडून आलेले राघवेंद्र उर्फ राम मनोहर पाटील, शिरूड गणातून निवडून आलेले आशुतोष विजय पाटील, निजामपूर गटातून निवडून आलेले हर्षवर्धन शिवाजी दहिते,मैदाणे गणातून विजयी झालेल्या संगीता गणेश गावीत, चिकसे गणातून विजयी झालेले अजय भगवान सूर्यवंशी या तरूण राजकारण्यांचा समावेश आहे.जिल्हा परिषदेचे गट व त्या-त्या तालुक्यातील पंचायत समितींच्या गणातून निवडणून आलेले हे युवा राजकीय नेते अवघ्या २२ ते ३० वयोगटातील आहे. यापैकी काही युवा नेत्यांनी मातब्बरांचे वर्चस्व झुगारून केवळ आपल्या कृर्तत्वाच्या जोरावर पंचायत समितींमध्ये प्रवेश केलेला आहे.आजच्या युवा पिढीला आपल्या भागातील समस्या काय व त्यावर काय उपाययोजना करता येतील याची चांगलीच जाण आहे. आजची युवा पिढी सोशल मीडीयावरही मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे. त्यामुळे या युवा नेत्यांकडून गट व गणातील नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. निवडून आलेली तरूण मंडळी निश्चितच आपल्या भागाचा विकास साधतील असा विश्वास असल्याने, मतदारांनीही त्यांना आपल्या गट-गणाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिलेली आहे. या संधीचे कितीजण सोने करतात याची उत्सुकता आहे.

टॅग्स :Dhuleधुळे