शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पावसाच्या दडीने वाढवली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:14 IST

१२ दिवसांपासून पावसाची पाठ : मका, कपाशी, उडीद, मुगाचे उत्पादन घटण्याची शक्यता

ठळक मुद्दे नंदुरबार जिल्ह्यात सरासरी ५१५़६६ मिलीमीटर पाऊसजळगाव व धुळ्यात पीक परिस्थिती बिकटशेतकरी झाला पुन्हा हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : खान्देशात वरुणराजाने गेल्या १२ दिवसांपासून दडी मारल्याने नंदुरबारच्या काही भागात, धुळे व जळगाव जिल्ह्यात चिंतेची स्थिती आहे. नंदुरबार जिल्ह्यात ६२़२९ टक्के असा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतशिवारात शेतीकामे वेगात सुरू आहेत़ गेल्या दोन दिवसांपासून ठिकठिकाणी श्रावणसरी बरसणे सुरू असल्याने त्याचा लाभ कोरड क्षेत्रातील शेतीला होणार आहे़ धुळे जिल्ह्यात सद्य:स्थितीत पिकांची परिस्थिती बरी असली तरी येत्या दोन-चार दिवसात पाऊस न झाल्यास हंगामच वाया जाण्याची भीती आहे. जिल्ह्यात पावसाने दुसºयांदा प्रदीर्घ दडी मारली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या १२ दिवसात पावसाने हजेरी न लावल्याने उडीद, मूग, मका, कपाशी व सोयाबीन या पिकांवर मोठा परिणाम होऊन उत्पादनदेखील घटण्याचा अंदाज आहे.जळगाव जिल्ह्यात अद्याप नदी, नाले वाहून निघतील असा दमदार पाऊस झालेला नाही. उडीद, सोयाबीन या पिकांना फुलोरा आला आहे. तसेच शेंगा भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. या काळात पिकांना पावसाची अंत्यत गरज आहे. पावसाने पाठ फिरविल्यास उत्पादनावर २० ते २५ टक्के घट होण्याचा अंदाज जिल्हा कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच हलक्या व मध्यम जमिनीवरील कोरडवाहू कापसाला व मक्यालादेखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.भुसावळ विभागातही पिकांची परिस्थिती फारसी काही चांगली नाही़ गिरणा परिसरातील पिकाची स्थिती चिंताजनक झाली आहे. ज्वारी, बाजरी, ऐन वाढीत असताना तसेच कपाशी फुलोरा ते कैºया लागण्याच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारल्याने शेतकरी हादरला आहे. चाळीसगाव तालुक्यात यंदा गेल्या वर्षीपेक्षा ३ हजार हेक्टर जादा पेरण्या झाल्या.पाचोरा तालुक्यात खरिपाच्या पेरण्या १०० टक्के झाल्या आहेत. भडगाव तालुक्यात गतवर्षीइतकाच पीकपेरा झाला. चाळीसगाव तालुक्यात यंदा (३४ टक्के) गतवर्षीच्या निम्मेच (७० टक्के) पाऊस झाला आहे. पाचोरा तालुक्यातही २६५.१ मि.मी. पाऊस झाला असून गेल्या वर्षी या तारखेपर्यंत ३६३.८५ मि.मी. पाऊस झाला होता. भडगाव तालुक्यात ३५०.७५ मि.मी.च्या तुलनेत यंदा २०५.७५ मि.मी. इतकाच पाऊस झाला आहे.अमळनेर तालुक्यात ९८ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. पाऊस लांबल्याने, उडीद, मूग या कडधान्याचे जवळपास ५० टक्के नुकसान झालेले आहे. पारोळा तालुक्यात पावसाअभावी कडधान्य पिकांचे जवळपास ६० टक्के नुकसान झालेले आहे. चोपडा तालुक्यात पावसाअभावी सर्व पिकांची वाढ खुंटलेली आहे. त्यात मूग आणि उडीद ही पिके जवळपास येणारच नाही, अशी शक्यता गृहीत धरली जात आहे.पावसाने ओढ दिल्याने, रस शोषक किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढलेला आहे़धुळ्यात वाढ खुंटलीधुळे जिल्ह्यात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. धुळे व शिंदखेड्यात गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे दिसत असले तरी त्यात मोठा खंड पडल्याने पिके धोक्यात आली आहेत तर शिरपूर तालुक्यात पावसाचे प्रमाण गेल्या वर्षी एवढेच आहे. साक्री तालुक्यात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाची स्थिती बरीच चांगली आहे. जून महिन्यात लागवडीनंतर पावसाने पिकांच्या वाढीच्या टप्प्यात तब्बल तीन आठवडे दडी मारली. त्यामुळे उडीद, मूग या कडधान्यासह सोयाबीन व मका या पिकांना फटका बसला होता. दुबार पेरणीची भीती व्यक्त होत असतानाच १३ जुलैनंतर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. सात-आठ दिवस रिमझिम व तुरळक पाऊस झाला. यामुळे पिकांना तात्पुरते जीवदान मिळून दुबार पेरणीचे संकटही टळले होते. परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने डोळे वटारले.जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, मुक्ताईनगर, जामनेर या तालुक्यांमध्ये कमी पर्जन्यमान असतानाही पिकांची स्थिती चांगली आहे. पावसाने अजून काही दिवस पाठ फिरविल्यास मात्र चिंता वाढणार आहे. पाऊस न झाल्यास कडधान्याच्या उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. -अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, कृषी विभाग, जळगाव़