शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

पावसाच्या दडीने वाढवली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:14 IST

१२ दिवसांपासून पावसाची पाठ : मका, कपाशी, उडीद, मुगाचे उत्पादन घटण्याची शक्यता

ठळक मुद्दे नंदुरबार जिल्ह्यात सरासरी ५१५़६६ मिलीमीटर पाऊसजळगाव व धुळ्यात पीक परिस्थिती बिकटशेतकरी झाला पुन्हा हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : खान्देशात वरुणराजाने गेल्या १२ दिवसांपासून दडी मारल्याने नंदुरबारच्या काही भागात, धुळे व जळगाव जिल्ह्यात चिंतेची स्थिती आहे. नंदुरबार जिल्ह्यात ६२़२९ टक्के असा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतशिवारात शेतीकामे वेगात सुरू आहेत़ गेल्या दोन दिवसांपासून ठिकठिकाणी श्रावणसरी बरसणे सुरू असल्याने त्याचा लाभ कोरड क्षेत्रातील शेतीला होणार आहे़ धुळे जिल्ह्यात सद्य:स्थितीत पिकांची परिस्थिती बरी असली तरी येत्या दोन-चार दिवसात पाऊस न झाल्यास हंगामच वाया जाण्याची भीती आहे. जिल्ह्यात पावसाने दुसºयांदा प्रदीर्घ दडी मारली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या १२ दिवसात पावसाने हजेरी न लावल्याने उडीद, मूग, मका, कपाशी व सोयाबीन या पिकांवर मोठा परिणाम होऊन उत्पादनदेखील घटण्याचा अंदाज आहे.जळगाव जिल्ह्यात अद्याप नदी, नाले वाहून निघतील असा दमदार पाऊस झालेला नाही. उडीद, सोयाबीन या पिकांना फुलोरा आला आहे. तसेच शेंगा भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. या काळात पिकांना पावसाची अंत्यत गरज आहे. पावसाने पाठ फिरविल्यास उत्पादनावर २० ते २५ टक्के घट होण्याचा अंदाज जिल्हा कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच हलक्या व मध्यम जमिनीवरील कोरडवाहू कापसाला व मक्यालादेखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.भुसावळ विभागातही पिकांची परिस्थिती फारसी काही चांगली नाही़ गिरणा परिसरातील पिकाची स्थिती चिंताजनक झाली आहे. ज्वारी, बाजरी, ऐन वाढीत असताना तसेच कपाशी फुलोरा ते कैºया लागण्याच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारल्याने शेतकरी हादरला आहे. चाळीसगाव तालुक्यात यंदा गेल्या वर्षीपेक्षा ३ हजार हेक्टर जादा पेरण्या झाल्या.पाचोरा तालुक्यात खरिपाच्या पेरण्या १०० टक्के झाल्या आहेत. भडगाव तालुक्यात गतवर्षीइतकाच पीकपेरा झाला. चाळीसगाव तालुक्यात यंदा (३४ टक्के) गतवर्षीच्या निम्मेच (७० टक्के) पाऊस झाला आहे. पाचोरा तालुक्यातही २६५.१ मि.मी. पाऊस झाला असून गेल्या वर्षी या तारखेपर्यंत ३६३.८५ मि.मी. पाऊस झाला होता. भडगाव तालुक्यात ३५०.७५ मि.मी.च्या तुलनेत यंदा २०५.७५ मि.मी. इतकाच पाऊस झाला आहे.अमळनेर तालुक्यात ९८ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. पाऊस लांबल्याने, उडीद, मूग या कडधान्याचे जवळपास ५० टक्के नुकसान झालेले आहे. पारोळा तालुक्यात पावसाअभावी कडधान्य पिकांचे जवळपास ६० टक्के नुकसान झालेले आहे. चोपडा तालुक्यात पावसाअभावी सर्व पिकांची वाढ खुंटलेली आहे. त्यात मूग आणि उडीद ही पिके जवळपास येणारच नाही, अशी शक्यता गृहीत धरली जात आहे.पावसाने ओढ दिल्याने, रस शोषक किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढलेला आहे़धुळ्यात वाढ खुंटलीधुळे जिल्ह्यात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. धुळे व शिंदखेड्यात गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे दिसत असले तरी त्यात मोठा खंड पडल्याने पिके धोक्यात आली आहेत तर शिरपूर तालुक्यात पावसाचे प्रमाण गेल्या वर्षी एवढेच आहे. साक्री तालुक्यात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाची स्थिती बरीच चांगली आहे. जून महिन्यात लागवडीनंतर पावसाने पिकांच्या वाढीच्या टप्प्यात तब्बल तीन आठवडे दडी मारली. त्यामुळे उडीद, मूग या कडधान्यासह सोयाबीन व मका या पिकांना फटका बसला होता. दुबार पेरणीची भीती व्यक्त होत असतानाच १३ जुलैनंतर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. सात-आठ दिवस रिमझिम व तुरळक पाऊस झाला. यामुळे पिकांना तात्पुरते जीवदान मिळून दुबार पेरणीचे संकटही टळले होते. परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने डोळे वटारले.जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, मुक्ताईनगर, जामनेर या तालुक्यांमध्ये कमी पर्जन्यमान असतानाही पिकांची स्थिती चांगली आहे. पावसाने अजून काही दिवस पाठ फिरविल्यास मात्र चिंता वाढणार आहे. पाऊस न झाल्यास कडधान्याच्या उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. -अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, कृषी विभाग, जळगाव़