शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:39 IST

गेल्या वर्षी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक झाली. मात्र आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्याने, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ...

गेल्या वर्षी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक झाली. मात्र आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्याने, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या १५ व पंचायत समितीच्या ३० सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले. ही रिक्त झालेली पदे भरण्यासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अर्ज छाननीनंतर ९ जुलै २१ रोजी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा छाननीनंतरची निवडणूक जाहीर केली आहे.

गेल्यावेळी अर्ज छाननीनंतर जिल्हा परिषदेच्या १५ गटांसाठी १०७ तर ३० गणांसाठी १८५ अर्ज वैध ठरले होते. २१ सप्टेंबरपासून पुढील निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झालेली असून, सोमवारी २७ रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे.

जिल्हा परिषदेच्या केवळ १५ जागांसाठी पोटनिवडणूक होत असताना तब्बल १०७ अर्ज दाखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता कोण उमेदवार निवडणूक रिंगणातून माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

अनेकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत. या अपक्षांनी अर्ज माघारी घ्यावे, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची मनधरणी सुरू केलेली आहे. मात्र, याला कितपत यश येते, हे अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे. असे असले तरी जिल्ह्यात भाजप विरूद्ध इतर पक्ष असाच सामना रंगणार आहे. पक्षाच्या उमेदवारांची उमेदवारी निश्चित असल्याने, त्यांनी प्रचाराला गती दिल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.