शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:39 IST

गेल्या वर्षी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक झाली. मात्र आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्याने, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ...

गेल्या वर्षी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक झाली. मात्र आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्याने, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या १५ व पंचायत समितीच्या ३० सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले. ही रिक्त झालेली पदे भरण्यासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अर्ज छाननीनंतर ९ जुलै २१ रोजी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा छाननीनंतरची निवडणूक जाहीर केली आहे.

गेल्यावेळी अर्ज छाननीनंतर जिल्हा परिषदेच्या १५ गटांसाठी १०७ तर ३० गणांसाठी १८५ अर्ज वैध ठरले होते. २१ सप्टेंबरपासून पुढील निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झालेली असून, सोमवारी २७ रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे.

जिल्हा परिषदेच्या केवळ १५ जागांसाठी पोटनिवडणूक होत असताना तब्बल १०७ अर्ज दाखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता कोण उमेदवार निवडणूक रिंगणातून माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

अनेकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत. या अपक्षांनी अर्ज माघारी घ्यावे, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची मनधरणी सुरू केलेली आहे. मात्र, याला कितपत यश येते, हे अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे. असे असले तरी जिल्ह्यात भाजप विरूद्ध इतर पक्ष असाच सामना रंगणार आहे. पक्षाच्या उमेदवारांची उमेदवारी निश्चित असल्याने, त्यांनी प्रचाराला गती दिल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.