शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

धुळे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ७० टक्यांनी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 11:43 IST

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा अंदाज : असमाधानकारक पावसाचा परिणाम, हरभºयाचे क्षेत्र घटणार

ठळक मुद्देजिल्ह्यात रब्बीचे ९० हजार १९ हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट धुळे, शिंदखेडा तालुक्यात गव्हाची लागवड अशक्यहरभºयाचे क्षेत्रही घटणार

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी ९० हजार १९ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मात्र यावर्षी झालेल्या असमाधानकारक पावसामुळे    जिल्ह्यात रब्बी हंगामातील  गव्हाच्या क्षेत्रात ७० तर हरभºयाचे क्षेत्र ६० टक्यांनी घटणार आहे. त्यातल्या त्यात धुळे व शिंदखेडा तालुक्यात गव्हाची लागवडच होऊ शकणार नाही, अशी माहिती  जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून देण्यात आली. रब्बीचे क्षेत्र घटणार असल्याने, खतांची मागणीही कमी होणार आहे.धुळे जिल्हयात यावर्षी असमाधानकारक पाऊस झालेला आहे. सुरवातीच्या कालावधीत दमदार पाऊस झाल्याने, खरिपाच्या पिकांची स्थिती चांगली होती. मात्र त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडला.श्रावण  महिना कोरडा गेला. तर परतीच्या पावसानेही दडी मारली. त्यामुळे खरिप पिकांचे जवळपास ५० टक्यांपेक्षा अधिकचे नुकसान झालेले आहे.ज्वारीचे पीक केवळ चारा म्हणूनच हातात आलेले आहे. धुळे, शिंदखेडा तालुक्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याने दुष्काळाची स्थिती आहे. त्याचा परिणाम आता रब्बीच्या लागवडीवर होणार आहे. लागवडीचे क्षेत्रात घट होणारकृषी विभागाने उद्दिष्ट निर्धारित केलेले असले तरी पाण्याअभावी रब्बीचे लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गहू व हरभरा या पिकांना पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत असते. मात्र यावर्षी पाण्याचा अभाव असल्याने गव्हाचे क्षेत्र ७० टक्यांनी तर हरभºयाचे क्षेत्र ६० टक्यांनी घटणार आहे. जिल्हा कृषी विभागाने २०१८-१९ या वर्षात रब्बी क्षेत्राचे ९८ हजार १९ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे.  यात ४३ हजार ९८७ हेक्टर क्षेत्रावर गहू लागवडीचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे शिंदखेडा तालुक्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असतांना तेथे १४ हजार ४०१ हेक्टरवर गहू लागवडीचे उद्दिष्ट आहे. तर त्या खालोखाल साक्री तालुक्यात १२ हजार ८४२,  धुळे तालुक्यात ८ हजार ५९७, तर शिरपूर तालुक्यात ८ हजार १३९ हेक्टर क्षेत्रावर लागवड अपेक्षित आहे.  हरभºयाची ३२ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. आता पाण्याअभावी हे उद्दिष्ट कसे गाठणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे.त्यातही धुळे व शिंदखेडा तालुक्यात पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी  गव्हाची लागवड होणे कठीण आहे. फक्त शिरपूर व पिंपळनेर याच भागात पाणी काही प्रमाणात असल्याने त्याठिकाणी थोड्याफार प्रमाणात गहू, हरभºयाची लागवड होऊ शकते असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे