शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पाण्यासाठी आबाल, वृद्धांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:39 IST

न्याहळोद : जलयुक्तची कामे अपूर्ण झाल्याने अत्यल्प फायदा, अक्कलपाड्याच्या आवर्तनाकडे लक्ष

विजय माळी।लोकमत न्यूज नेटवर्कन्याहळोद : यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने भीषण दुष्काळी स्थिती आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आटल्याने नळाजवळ भांडी ठेऊन ग्रामस्थांना ताटकळत उभे रहावे लागत आहेत. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी उपाय योजना केल्या तरी पांझरेच्या आवर्तनावरच पुढील उन्हाळा अवलंबून राहणार आहे.सुमारे आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावात घरोघरी नळ जोडण्या आहेत. पांझरा नदीकाठी असलेल्या गाव विहिरीतून पाण्याची टाकी भरली जाते. मात्र, येथूनच परिसरातील सात गावांच्या पाणी पुरवठा विहिरी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाल्याने मूळ गावातच पाणीटंचाई निर्माण होते.टंचाईवर मात करण्यासाठी युवकांनी श्रमदानातून जुनी पाण्याची टाकी व विहीर दुरुस्ती केली. याचा फायदा झाला; परंतू पाण्याची पातळी खोल गेल्याने पुन्हा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली.जलयुक्तची कामे झाली. परंतू गावाची लोकसंख्या व शेत शिवाराचे क्षेत्रफळ पाहता अत्यंत कमी काम झाल्याचे दिसून येत आहे. कामे सर्वत्र झाली तरच जलयुक्त शिवार कामांचा उपयोग होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरुन पाटबंधारे विभागातर्फे बुधवारी अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी गावाजवळ पोहचल्या नंतर काही दिवसांनी विहिरींची जल पातळी वाढणार आहे. त्यामुळे सर्वांचे या पाण्याच्या आवर्तनाकडे लक्ष लागून आहे. पाणी जूनपर्यंत हवे, अशी भूमिका प्रशासनाने घेतल्याने तब्बल आठ महिने नदी पात्र कोरडे आहे. त्यामुळे गावात प्रथमच पाण्याचे टँकर, बोअरींग करणे, खाजगी शेतकºयाच्या विहिरीचे पाणी घेणे अशा पर्यायी उपाययोजना कराव्या लागल्या. पाणी भरण्यावरून अनेकवेळा वाद देखील झाले. आता आवर्तनाचे पाणी कधी पोहचते, त्यावरच पाणीटंचाई दूर होणे अवलंबून राहणार आहे.पाणी पुरवठा विहिरीतील गळ काढणे, आडवे बोअर करणे यासह जुनी पाणी वितरण व्यवस्थेची गळती बंद केली. शासकीय मदत अजून घेतली नाही.-ज्योती भिल, सरपंच न्याहळोद

टॅग्स :Dhuleधुळे