शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

ब्रिटिशकालीन पाटचारीत ‘पाणी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबेटावद : जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे असलेल्या ब्रिटिशकालीन पाटचारीची तरुणांनी दुरुस्ती केली़ परिणामी या पाटचारीत पांझरेचे पाणी आल्याने त्याचा परिणाम जलसंवर्धनात होणार आहे़ बेटावद गावातील तरुणांच्या श्रमदानामुळे हे शक्य झाले असल्याचे चित्र समोर आलेले आहे़ त्यांचे हे कार्य आदर्श मानले जात आहे़ शिंदखेडा तालुक्यातील बेटावदला असलेली पांझरा नदी ...

ठळक मुद्देबेटावदच्या तरुणांनी ठेवला सर्वांसमोर आदर्शजलसंवर्धनासाठी केले श्रमदान पांझरेच्या पाण्याने तुडुंब भरली पाटचारी

लोकमत न्यूज नेटवर्कबेटावद : जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे असलेल्या ब्रिटिशकालीन पाटचारीची तरुणांनी दुरुस्ती केली़ परिणामी या पाटचारीत पांझरेचे पाणी आल्याने त्याचा परिणाम जलसंवर्धनात होणार आहे़ बेटावद गावातील तरुणांच्या श्रमदानामुळे हे शक्य झाले असल्याचे चित्र समोर आलेले आहे़ त्यांचे हे कार्य आदर्श मानले जात आहे़ शिंदखेडा तालुक्यातील बेटावदला असलेली पांझरा नदी जलसंजीवनी असल्यामुळे काठावरील गावांना पांझरा नदीच्या पाण्याचा लाभ चांगल्यापैकी मिळतो आहे़ परंतु बेटावदला तो एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मिळण्यासाठी ब्रिटिशांनी करून ठेवलेली ‘कल्पकता’ आजही उपयुक्त ठरत आहे़ बेटावद मंडळातील अजंदे बुद्रूक येथील के़ टी़ वेअरच्या बाजूला ब्रिटिशांनी एक पॉर्इंट दिलेला होता़ तेथून त्या पॉर्इंटवरून पांझरा नदीचे पाणी त्या ठिकाणी आल्यावर तेथून एक पाटचारी ब्रिटिशांनी तयार करून दिलेली होती़ त्यात ते पाणी टाकून त्याचा लाभ बेटावदसह पडावद, पाष्टेच्या शिवारापर्यंत शेतीस मिळण्यास मदत होत आहे़ या ब्रिटिशकालीन पाटचारीचा आधार घेऊन तिच्या काठावर असलेल्या विहिरींच्या जलपुनर्भरणाचा प्रयोगही झालेला आहे़ यामुळे बेटावद येथील ब्रिटिशकालीन पाटचारीला ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे़ असे असताना दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर दुरुस्ती होणे आवश्यक असते़ गेल्या वर्षभरापूर्वी या पाटचारीमध्ये निर्माण झालेल्या असंख्य अडथळ्यांमुळे या पाटचारीमध्ये पाणी पूर्ण क्षमतेने वाहत नव्हते़ त्यासाठी येथील दिनेश नारायण माळी, आऱयू़ पाटील, योगेश बाविस्कर, प्रमोद माळी, मेघराज माळी, महेंद्र कैलास माळी, रवींद्र फुले, वसीम बागवान या तरुणांनी स्वखर्चाने आणि श्रमदान करून या ब्रिटिशकालीन पाटचारीमधील संपूर्ण अडथळे दूर केले़ या पाटचारीची साफसफाई केली़ त्यामुळे ही पाटचारी त्यांनी केलेल्या श्रमदानामुळे तुडुंब भरून वाहत आहे़ सध्या हा लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे़