शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

ब्रिटिशकालीन पाटचारीत ‘पाणी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबेटावद : जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे असलेल्या ब्रिटिशकालीन पाटचारीची तरुणांनी दुरुस्ती केली़ परिणामी या पाटचारीत पांझरेचे पाणी आल्याने त्याचा परिणाम जलसंवर्धनात होणार आहे़ बेटावद गावातील तरुणांच्या श्रमदानामुळे हे शक्य झाले असल्याचे चित्र समोर आलेले आहे़ त्यांचे हे कार्य आदर्श मानले जात आहे़ शिंदखेडा तालुक्यातील बेटावदला असलेली पांझरा नदी ...

ठळक मुद्देबेटावदच्या तरुणांनी ठेवला सर्वांसमोर आदर्शजलसंवर्धनासाठी केले श्रमदान पांझरेच्या पाण्याने तुडुंब भरली पाटचारी

लोकमत न्यूज नेटवर्कबेटावद : जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे असलेल्या ब्रिटिशकालीन पाटचारीची तरुणांनी दुरुस्ती केली़ परिणामी या पाटचारीत पांझरेचे पाणी आल्याने त्याचा परिणाम जलसंवर्धनात होणार आहे़ बेटावद गावातील तरुणांच्या श्रमदानामुळे हे शक्य झाले असल्याचे चित्र समोर आलेले आहे़ त्यांचे हे कार्य आदर्श मानले जात आहे़ शिंदखेडा तालुक्यातील बेटावदला असलेली पांझरा नदी जलसंजीवनी असल्यामुळे काठावरील गावांना पांझरा नदीच्या पाण्याचा लाभ चांगल्यापैकी मिळतो आहे़ परंतु बेटावदला तो एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मिळण्यासाठी ब्रिटिशांनी करून ठेवलेली ‘कल्पकता’ आजही उपयुक्त ठरत आहे़ बेटावद मंडळातील अजंदे बुद्रूक येथील के़ टी़ वेअरच्या बाजूला ब्रिटिशांनी एक पॉर्इंट दिलेला होता़ तेथून त्या पॉर्इंटवरून पांझरा नदीचे पाणी त्या ठिकाणी आल्यावर तेथून एक पाटचारी ब्रिटिशांनी तयार करून दिलेली होती़ त्यात ते पाणी टाकून त्याचा लाभ बेटावदसह पडावद, पाष्टेच्या शिवारापर्यंत शेतीस मिळण्यास मदत होत आहे़ या ब्रिटिशकालीन पाटचारीचा आधार घेऊन तिच्या काठावर असलेल्या विहिरींच्या जलपुनर्भरणाचा प्रयोगही झालेला आहे़ यामुळे बेटावद येथील ब्रिटिशकालीन पाटचारीला ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे़ असे असताना दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर दुरुस्ती होणे आवश्यक असते़ गेल्या वर्षभरापूर्वी या पाटचारीमध्ये निर्माण झालेल्या असंख्य अडथळ्यांमुळे या पाटचारीमध्ये पाणी पूर्ण क्षमतेने वाहत नव्हते़ त्यासाठी येथील दिनेश नारायण माळी, आऱयू़ पाटील, योगेश बाविस्कर, प्रमोद माळी, मेघराज माळी, महेंद्र कैलास माळी, रवींद्र फुले, वसीम बागवान या तरुणांनी स्वखर्चाने आणि श्रमदान करून या ब्रिटिशकालीन पाटचारीमधील संपूर्ण अडथळे दूर केले़ या पाटचारीची साफसफाई केली़ त्यामुळे ही पाटचारी त्यांनी केलेल्या श्रमदानामुळे तुडुंब भरून वाहत आहे़ सध्या हा लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे़