शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती मध्यम प्रकल्पातील पाण्याचे पोटचाऱ्या करून नियोजन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:07 IST

शिंदखेडा तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी रखडलेली तापी बुराई महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लागणेदेखील तेवढेच ...

शिंदखेडा तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी रखडलेली तापी बुराई महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लागणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. सध्या थंड बस्त्यात गुंडाळलेल्या या योजनेच्या कामाला गती देऊन तापी, बुराई, अमरावती या नद्यांच्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास येथील शेतीला बारमाही कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होणार आहे. सध्या दरवर्षी हे प्रकल्प भरतीलच याची श्वाश्वती नसल्यामुळे येथील शेतीचे योग्य नियोजन होत नाही. परिणामी उत्पन्नावर परिणाम होऊन विकास खुंटला आहे.

सन १९८०मध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अमरावती मध्यम प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर तब्बल २६ वर्षांनी २००६ वर्षी हा प्रकल्प पूर्ण झाला. प्रकल्प पूर्ण होऊन पहिल्याच वर्षी पूर्ण क्षमतेने भरला, मात्र त्यानंतर एक तप उलटून गेल्यानंतर १३ वर्षांनी येथील नागरिकांना या प्रकल्पात पाणी पाहायला मिळाले. सध्या दोन वर्षांपासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून पोटचाऱ्याअभावी येथील पाणी शेतकऱ्यांसाठी मृगजळच ठरत आहे.

येथील अमरावती मध्यम प्रकल्पाला डावा व उजवा असे दोन कालवे असून, अनुक्रमे डावा कालवा सात किलोमीटर व उजवा कालवा एकूण १४ किलोमीटर लांबीचा आहे, मात्र या कालव्यांना लागून प्रत्यक्ष शेतात पाणी घेऊन जाण्यासाठी ज्या पोटचाऱ्या पाहिजे त्या अद्याप झालेल्या नाहीत तर काही ठिकाणी अस्तित्वात राहिल्या नसल्याचे चित्र असून, या पाण्याचा उपयोग काही शेतकऱ्यांना घेता येत नसल्याचे वास्तव चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

यामुळे पाणी असून, उपाशी राहण्याची वेळ येथील शेतकर्‍यांवर आली आहे, तर या दोन्ही कालव्यांना प्रचंड गळती पहिल्यापासून आहे. यामुळे लाखो लिटर पाणी दररोजचे वाया जात आहे तरी अद्याप याचे कोणाला सोयरसुतक नसून धरण सुरक्षा समितीचे याकडे दुर्लक्ष का होत आहे हा शोधाचा विषय बनला आहे. नुसता प्रोटोकॉल म्हणून पाहणी होत असते. दोन वर्षांपासून अविरतपणे अखंड रात्र-दिवस या पाण्याची नासाडी होत आहे.