शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

अमरावती मध्यम प्रकल्पातील पाण्याचे पोटचाऱ्या करून नियोजन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:07 IST

शिंदखेडा तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी रखडलेली तापी बुराई महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लागणेदेखील तेवढेच ...

शिंदखेडा तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी रखडलेली तापी बुराई महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लागणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. सध्या थंड बस्त्यात गुंडाळलेल्या या योजनेच्या कामाला गती देऊन तापी, बुराई, अमरावती या नद्यांच्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास येथील शेतीला बारमाही कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होणार आहे. सध्या दरवर्षी हे प्रकल्प भरतीलच याची श्वाश्वती नसल्यामुळे येथील शेतीचे योग्य नियोजन होत नाही. परिणामी उत्पन्नावर परिणाम होऊन विकास खुंटला आहे.

सन १९८०मध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अमरावती मध्यम प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर तब्बल २६ वर्षांनी २००६ वर्षी हा प्रकल्प पूर्ण झाला. प्रकल्प पूर्ण होऊन पहिल्याच वर्षी पूर्ण क्षमतेने भरला, मात्र त्यानंतर एक तप उलटून गेल्यानंतर १३ वर्षांनी येथील नागरिकांना या प्रकल्पात पाणी पाहायला मिळाले. सध्या दोन वर्षांपासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून पोटचाऱ्याअभावी येथील पाणी शेतकऱ्यांसाठी मृगजळच ठरत आहे.

येथील अमरावती मध्यम प्रकल्पाला डावा व उजवा असे दोन कालवे असून, अनुक्रमे डावा कालवा सात किलोमीटर व उजवा कालवा एकूण १४ किलोमीटर लांबीचा आहे, मात्र या कालव्यांना लागून प्रत्यक्ष शेतात पाणी घेऊन जाण्यासाठी ज्या पोटचाऱ्या पाहिजे त्या अद्याप झालेल्या नाहीत तर काही ठिकाणी अस्तित्वात राहिल्या नसल्याचे चित्र असून, या पाण्याचा उपयोग काही शेतकऱ्यांना घेता येत नसल्याचे वास्तव चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

यामुळे पाणी असून, उपाशी राहण्याची वेळ येथील शेतकर्‍यांवर आली आहे, तर या दोन्ही कालव्यांना प्रचंड गळती पहिल्यापासून आहे. यामुळे लाखो लिटर पाणी दररोजचे वाया जात आहे तरी अद्याप याचे कोणाला सोयरसुतक नसून धरण सुरक्षा समितीचे याकडे दुर्लक्ष का होत आहे हा शोधाचा विषय बनला आहे. नुसता प्रोटोकॉल म्हणून पाहणी होत असते. दोन वर्षांपासून अविरतपणे अखंड रात्र-दिवस या पाण्याची नासाडी होत आहे.