शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लसीकरणाचा मासिक पाळीवर कोणताही परिणाम नाही; तरुणी व महिलांनो, न घाबरता लस घ्या : डॉ. मिताली गोलेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:34 IST

कोरोना लसीकरणाचा मासिक पाळीवर कोणताही परिणाम होत नाही. कोरोनापासून संरक्षण मिळण्यासाठी लस हे महत्त्वाचे शस्त्र आहे. मासिक पाळीदरम्यान, मासिक ...

कोरोना लसीकरणाचा मासिक पाळीवर कोणताही परिणाम होत नाही. कोरोनापासून संरक्षण मिळण्यासाठी लस हे महत्त्वाचे शस्त्र आहे. मासिक पाळीदरम्यान, मासिक पाळीपूर्वी किंवा पाळीनंतर लस घेतल्याने मासिक पाळीवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे तरुणी व महिलांनी अफवांना बळी न पडता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ मिताली गोलेच्छा यांनी केले आहे.

प्रश्न - गरोदरपणात लसीकरण करता येते का?

उत्तर - केंद्र शासनाच्या निर्देशानुसार गरोदरपणात लसीकरण करता येत नाही; पण इंग्लंड, अमेरिका या देशांमध्ये गरोदर महिलांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणामुळे गर्भाला व्यंग असल्याचे निदर्शनास आलेले नाही. भारतात मात्र गरोदर महिलांना लस घेण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, त्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. संशोधन पूर्ण झाल्यानंतर आपल्या देशातही गरोदर महिलांना लस घेण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी अजून काही महिने वाट बघावी लागेल.

प्रश्न - लस घेतल्यानंतर गरोदरपणाचे निदान झाल्यास काय करावे?

उत्तर - लस घेतल्यानंतर गरोदरपणाचे निदान झाल्यास गरोदरपणाचे उपचार करावेत. गर्भाला काहीही धोका होत नाही. त्यामुळे गर्भपात करण्याची गरज नाही. तसा विचारही मनात आणू नये; पण त्यानंतर दुसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस घेऊ नये.

प्रश्न - प्रसूतीनंतर लस घ्यावी का?

उत्तर - प्रसूतीनंतर बाळाला स्तनपान करण्याच्या काळात लस घेऊ नये, अशा सूचना शासनाने केल्या आहेत. तसेच या विषयावर संशोधन सुरू आहे. त्यामुळे याबाबत शासनाच्या नवीन सूचना येईपर्यंत स्तनदा मातांनी लस घेऊ नये.

प्रश्न - मासिक पाळी व लसीकरणाचा एकमेकांवर काही दुष्परिणाम होतो का?

उत्तर - मासिक पाळीत लस घेतल्यानंतर कोणताही दुष्परिणाम होत नाही; तसेच मासिक पाळीवर कोणताही परिणाम होत नाही. समाजमाध्यमांवर याबाबत चुकीचे संदेश फिरत आहेत. अशा चुकीच्या गोष्टी, अफवांना बळी पडू नये. मासिक पाळीमध्ये, पाळीपूर्वी किंवा पाळीनंतर महिला लस घेऊ शकतात. तसेच पीसीओडी, अंडाशयाच्या गाठी, मधुमेह, गर्भपिशवीच्या गाठी, रक्तदाब आदी आजार असतील तरीही त्या लस घेऊ शकतात.

दोन्ही लसी उपयुक्त -

कोविशिल्ड तसेच कोव्हॅक्सिन या दोन्ही प्रकारच्या लसी सारख्याच प्रमाणात उपयुक्त आहेत; पण पहिला डोस ज्या लसीचा घेतला असेल, त्याच लसीचा दुसरा डोस घेणे गरजेचे आहे.

डॉक्टरांचा सल्ला घ्या-

लस घेतल्यानंतर बहुतेक रुग्णांना कोणताही त्रास होत नाही. काही रुग्णांना सौम्य स्वरूपाचा त्रास होतो. ताप येणे, थंडी वाजणे, डोके दुखणे, अंग दुखणे, जुलाब होणे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. यामुळे घाबरून जाऊ नये. सकारात्मकता ठेवावी. आवश्यकता वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लसीकरणामुळे मृत्यू नाही-

लसीकरणामुळे मृत्यू होत नाही. जागतिक स्तरावर ज्या तुरळक मृत्यूंची नोंद झाली आहे, त्या रुग्णांना पूर्वीपासून इतर व्याधी होत्या. इतर व्याधींमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. लसीकरणामुळे मृत्यू होत नाही. ज्येष्ठ नागरिकांसोबतच, मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनीही लस घेणे गरजेचे आहे.