शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात टँकर चालकाने नाल्यात सोडले केमिकल, नदीचे पाणी दूषित, नेर गावाचा पाणीपुरवठा चार दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST

नेर - सुरत नागपूर महामार्गालगत नवे भदाणे जवळील असलेल्या नाल्यात केमिकल टँकर चालकाने मध्यरात्री केमिकल टाकल्यामुळे ते पांझरा नदीत ...

नेर - सुरत नागपूर महामार्गालगत नवे भदाणे जवळील असलेल्या नाल्यात केमिकल टँकर चालकाने मध्यरात्री केमिकल टाकल्यामुळे ते पांझरा नदीत पोहोचल्याने नेरसह भदाणे गावाचा पाणीपुरवठा दूषित होऊन जीवघेणा ठरला आहे. ही बाब सकाळी माॅर्निंग वाॅकसाठी जात असताना विजय श्रीराम, युवराज खताळ, आर. डी. माळी, सतीश बोढरे, कृष्णा खताळ आदींच्या लक्षात आल्याने तत्काळ ग्रामपंचायतीला कळवले. सरपंचांनी लगेच घटनेचे गांभीर्य ओळखून दोन्ही गावांचा पाणीपुरवठा चार दिवसांसाठी बंद केला आहे. धुळे येथील प्रयोग शाळेतून पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर पाणीपुरवठा केला जाणार आहे.

नेर जवळून जाणाऱ्या नवे भदाणे महामार्गालगत असलेल्या नाल्यात सोमवारी रात्री एक टँकरचालक टँकरमधील केमिकल टाकून पसार झाला. त्यानंतर हे केमिकल नाल्यातून वाहत जाऊन पुढे पांझरा नदीत आले. या नदीच्या काठावरच नेर आणि भदाणे गावाच्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. त्यामुळे या विहिरींचे पाणीही केमिकलयुक्त झाले आहे. तर नदीतील पाणी ही केमिकलयुक्त झाले आहे. मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडलेले दिसून येत आहेत. ही बाब नेर व भदाणे ग्रामपंचायतीच्या लक्षात आली. त्यामुळे गुरांना आणि नागरिकांना कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून तात्काळ गावात दवंडी देऊन नागरिकांना नदीत गुरांना पाणी पाजू नये तसेच महिलांनी कपडे आणि धुणीभांडी करण्यासाठी नदीवर जाऊ नये असे आवाहन केले आहे. दरम्यान, टँकर चालकाने असा प्रकार का केला, याचे कारण गुलदस्त्यात आहे.

मात्र महामार्गावर गॅस आणि केमिकल टँकरचा काळाबाजार चालू असतो. हे या आधीही उघड झाले आहे. त्यामुळे कदाचित अशा प्रकारातून हा प्रकार घडला असावा असा नागरिकांकडून अंदाजही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकाराचा छडा लावावा अशी मागणी करण्यात आली आहे.

पाण्याचे नमुने प्रयोग शाळेत पाठवले

नेर ग्रामपंचायतीने लगेच पाणीपुरवठा कर्मचारी देवीदास जाधव, मांगू मोरे, पंकज चौधरी, ईश्वर चव्हाण, ग्रामपंचायत लिपिक हर्षल मोरे, राकेश जाधव यांना विहिरीच्या पाण्याचे नमुने घेऊन ते धुळे येथील प्रयोग शाळेत तपासण्यासाठी पाठवले आहेत. त्यामुळे याचा अहवाल आल्यानंतरच गावात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. त्यासाठी चार दिवस पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.

-गायत्री संजय जयस्वाल, सरपंच, नेर