शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

अक्कलपाडा भूसंपादनात अक्षम्य चुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 22:48 IST

जमिनी गेल्याने शेतकरी हवालदिल : किमान मोबदला देण्याची एकमुखी मागणी

संडे हटके बातमी

साक्री : सिंचन विभागाचे अधिकारी व भूसंपादन अधिकाºयांच्या अक्षम्य चुकांमुळे अक्कलपाडा धरणाखाली गेलेल्या जमिनीचे मालक असलेल्या शेतकºयांना आपल्या जमिनी तर गमवाव्या लागल्या परंतु त्याचा मोबदला  घेण्यासाठी सुद्धा शासनापुढे भिकाºयासारखे हात पसरावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे़ अक्कलपाडा धरणाचा चुकीचा सर्वे झाल्याने संपादित न झालेल्या जमिनीमध्ये धरणाचे पाणी शिरले आहे, या जमिनीत आता पिक येणार नाहीत म्हणून त्या जमिनीचा मोबदला तरी द्यावा अशी मागणी धरणग्रस्त गावातील शेतकºयांनी केली आहे.सन १९८४ च्या दशकात सुरू केलेले अक्कलपाडा धरणाची सुरुवातीची किम्मत साडेपाचशे कोटी रुपये होती़ वेळोवेळी धरणाची किंमत वाढत जाऊन दोन हजार कोटीपर्यंत या धरणाचा खर्च झाला आहे़ या धरणामुळे तामसवाडी, वसमार, सय्यदनगर या गावांच्या शेतजमिनी बुडाल्या़ ज्या शेतजमिनीवर शेतकºयांचे भवितव्य अवलंबून होते, ती जमीन व गावे सोडताना ग्रामस्थांना दु:ख अनावर झाले़ दुसºयांच्या भल्यासाठी शेतकºयांना त्याग करावा लागला़ हे कमी की काय जेव्हा धरणात प्रत्यक्षात ७० टक्के पाणी अडविण्यात आले, तेव्हा ग्रामस्थांना मोठा धक्का बसला़ ज्या जमिनी धरणासाठी संपादित झालेल्या नव्हत्या किंवा तेथपर्यंत धरणाच्या पाण्याची हद्द होती त्याच्याही पुढे पाणी शिरल्याने व ७० टक्के पाणी साठवल्यावरही परिस्थिती निर्माण झाली आहे़ जर पूर्ण क्षमतेने धरण भरले तर काय परिस्थिती निर्माण होईल? याची कल्पनाही शेतकरी करू शकत नाहीत. याचाच अर्थ धरणाच्या चुकीचा सर्वे झाला आहे किंवा सर्वे करणाºयांनी जाणून-बुजून चुकीचा सर्वे केला असल्याचा आरोप आता शेतकरी करू लागले आहेत़ ज्या जमिनी संपादित झाल्या नाहीत त्या जमिनीचा आजच्या बाजारभावानुसार मोबदला द्यावा अशी मागणी शेतकºयांनी केली आहे़ यावर्षी पांझरा नदीला महापूर आल्याने एका दिवसात धरण शंभर टक्के भरले़ जास्त पाण्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे    उघडावे लागले़ यामुळे धरणाखालील शेतकºयांचे, रस्त्यांची आणि पुलांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे़ शेतकºयांच्या म्हणण्यानुसार, पुरामुळे नुकसान झाले तर शासनाला कोट्यावधी रुपये भरपाई द्यावी लागते किंवा खर्च करावे लागतात़ शेतकºयांना ज्या अनमोल जमिनी धरणाखाली गेल्या आहेत त्याचा योग्य तो मोबदला का दिला जात नाही? यासाठी सिंचन विभागाचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावरही कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न पीडित     शेतकºयांकडून उपस्थित होत आहे़ धरण पूर्ण क्षमतेने भरले तर धरणाखालील आठ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे़ परंतु, धरणाचे काम अद्यापही अपूर्ण आहे़ न संपादित झालेल्या जमिनींचा मोबदला अद्यापही शेतकºयांना दिला गेलेला नाही़ यामुळे अक्कलपाडा धरणाचे घोंगडे भिजत पडले आहे़ याचा सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी आहे़अनागोंदी कारभाराचा फटकासन २०१७ मध्येच धरणाचे पाणी न संपादित झालेल्या जमिनी मध्ये घुसले होते़ तरीही सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी तसा अहवाल शासनाकडे का पाठवला नाही, हे एक मोठे कोडे आहे़ धरणाच्या महत्त्वाच्या बाबींवर तरतूद न करता आता धरणाचे डावे व उजव्या कालव्यांवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे़ हे एक मोठे आश्चर्य असल्याचे शेतकºयांनी म्हटले आहे़ सिंचन विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेणारे, सरकारला ही खरी परिस्थिती समजून येत नसल्याने सरकारलाच अंधारात ठेवणाºया अधिकाºयांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे़ शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्येकडे त्वरित लक्ष घालून शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे