शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

अक्कलपाडा भूसंपादनात अक्षम्य चुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 22:48 IST

जमिनी गेल्याने शेतकरी हवालदिल : किमान मोबदला देण्याची एकमुखी मागणी

संडे हटके बातमी

साक्री : सिंचन विभागाचे अधिकारी व भूसंपादन अधिकाºयांच्या अक्षम्य चुकांमुळे अक्कलपाडा धरणाखाली गेलेल्या जमिनीचे मालक असलेल्या शेतकºयांना आपल्या जमिनी तर गमवाव्या लागल्या परंतु त्याचा मोबदला  घेण्यासाठी सुद्धा शासनापुढे भिकाºयासारखे हात पसरावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे़ अक्कलपाडा धरणाचा चुकीचा सर्वे झाल्याने संपादित न झालेल्या जमिनीमध्ये धरणाचे पाणी शिरले आहे, या जमिनीत आता पिक येणार नाहीत म्हणून त्या जमिनीचा मोबदला तरी द्यावा अशी मागणी धरणग्रस्त गावातील शेतकºयांनी केली आहे.सन १९८४ च्या दशकात सुरू केलेले अक्कलपाडा धरणाची सुरुवातीची किम्मत साडेपाचशे कोटी रुपये होती़ वेळोवेळी धरणाची किंमत वाढत जाऊन दोन हजार कोटीपर्यंत या धरणाचा खर्च झाला आहे़ या धरणामुळे तामसवाडी, वसमार, सय्यदनगर या गावांच्या शेतजमिनी बुडाल्या़ ज्या शेतजमिनीवर शेतकºयांचे भवितव्य अवलंबून होते, ती जमीन व गावे सोडताना ग्रामस्थांना दु:ख अनावर झाले़ दुसºयांच्या भल्यासाठी शेतकºयांना त्याग करावा लागला़ हे कमी की काय जेव्हा धरणात प्रत्यक्षात ७० टक्के पाणी अडविण्यात आले, तेव्हा ग्रामस्थांना मोठा धक्का बसला़ ज्या जमिनी धरणासाठी संपादित झालेल्या नव्हत्या किंवा तेथपर्यंत धरणाच्या पाण्याची हद्द होती त्याच्याही पुढे पाणी शिरल्याने व ७० टक्के पाणी साठवल्यावरही परिस्थिती निर्माण झाली आहे़ जर पूर्ण क्षमतेने धरण भरले तर काय परिस्थिती निर्माण होईल? याची कल्पनाही शेतकरी करू शकत नाहीत. याचाच अर्थ धरणाच्या चुकीचा सर्वे झाला आहे किंवा सर्वे करणाºयांनी जाणून-बुजून चुकीचा सर्वे केला असल्याचा आरोप आता शेतकरी करू लागले आहेत़ ज्या जमिनी संपादित झाल्या नाहीत त्या जमिनीचा आजच्या बाजारभावानुसार मोबदला द्यावा अशी मागणी शेतकºयांनी केली आहे़ यावर्षी पांझरा नदीला महापूर आल्याने एका दिवसात धरण शंभर टक्के भरले़ जास्त पाण्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे    उघडावे लागले़ यामुळे धरणाखालील शेतकºयांचे, रस्त्यांची आणि पुलांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे़ शेतकºयांच्या म्हणण्यानुसार, पुरामुळे नुकसान झाले तर शासनाला कोट्यावधी रुपये भरपाई द्यावी लागते किंवा खर्च करावे लागतात़ शेतकºयांना ज्या अनमोल जमिनी धरणाखाली गेल्या आहेत त्याचा योग्य तो मोबदला का दिला जात नाही? यासाठी सिंचन विभागाचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावरही कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न पीडित     शेतकºयांकडून उपस्थित होत आहे़ धरण पूर्ण क्षमतेने भरले तर धरणाखालील आठ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे़ परंतु, धरणाचे काम अद्यापही अपूर्ण आहे़ न संपादित झालेल्या जमिनींचा मोबदला अद्यापही शेतकºयांना दिला गेलेला नाही़ यामुळे अक्कलपाडा धरणाचे घोंगडे भिजत पडले आहे़ याचा सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी आहे़अनागोंदी कारभाराचा फटकासन २०१७ मध्येच धरणाचे पाणी न संपादित झालेल्या जमिनी मध्ये घुसले होते़ तरीही सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी तसा अहवाल शासनाकडे का पाठवला नाही, हे एक मोठे कोडे आहे़ धरणाच्या महत्त्वाच्या बाबींवर तरतूद न करता आता धरणाचे डावे व उजव्या कालव्यांवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे़ हे एक मोठे आश्चर्य असल्याचे शेतकºयांनी म्हटले आहे़ सिंचन विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेणारे, सरकारला ही खरी परिस्थिती समजून येत नसल्याने सरकारलाच अंधारात ठेवणाºया अधिकाºयांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे़ शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्येकडे त्वरित लक्ष घालून शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे