शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

दोंडाईचात युरीयाच्या दोनशे बॅग उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 21:54 IST

दिलासा। मालपूर परिसरातील शेतकऱ्यांना होती खताची प्रतिक्षा

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपून शिवारातील शेतकऱ्यांना गेल्या महिन्यापासून युरिया खताची टंचाई भासत होती़ दरम्यान, कृषी विभागाने युरीया खताच्या २०० बॅग उपलब्ध करुन दिल्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़मालपूर येथील शेतकरी दोंडाईचा येथे हातात पैसे घेवुन वणवण भटकत होते. परंतु युरीया खत मिळत नव्हते़ त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भिती शेतकºयांना होती़ यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित शेतकºयांची व्यथा मांडली होती़ तसेच तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे यांच्याकडे सतत पाठपुरावा देखील केला होता़ या वृत्ताची कृषी विभागाने दखल घेत दोंडाईचा येथील एका कृषी दुकानात दोनशे बॅग युरीया खतांचा पुरवठा करण्यात आला़़ खताच्या किमतीवर देखील कृषी विभागाने नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे़मालपूरसह परीसरात शेती हाच मुख्य व्यवसाय असून शेतीच्या उत्पन्नावरच येथील अर्थचक्र अवलंबून आहे़ यामुळे पिकांची देखभाल व योग्य वेळी खत व्यवस्थापन खुप महत्वाचे आहे. मात्र हातात पैसे घेवुन येथील शेतकरी वणवण फिरतांना दिसुन येत होते. परंतु खत उपलब्ध होत नव्हते़गरज नसताना खते उपलब्ध होत असतात मात्र गरजेवेळी का नाही. येथे सध्या गेल्या महिनाभरापासून खतांचा साठा संपल्याचे दुकानदार सांगत होते़ तर काही दुकानदार युरिया खताबरोबर अन्य अनावश्यक खतांचा लिंक पध्दतीने विक्री करत असल्याची चर्चा शेतकºयांमध्ये होती़ या विषयी कृषी विभागाशी संपर्क केल्यावर देखील शेतकºयांचे समाधान होईल असा प्रतिसाद मिळत नव्हता़मालपूर येथे युरियासह अन्य खतांची नेहमीच टंचाई जाणवत असते. मागेल ते बियाणे व पाहिजे तेवढे खत हा शेतकºयांचा अधिकार आहे़ परंतु कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा भावाने खतांची विक्री करण्याचा प्रकार दरवर्षी घडतो़ कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याने शेतकरी नाडला जातो़ येथील बागायती कापुस व कोरडवाहू कापुस या दोघांना खत व्यवस्थापन करणे आवश्यक असते़ शेतकºयांना खतासाठी दोंडाईचा, शहादा, नंदुरबार अशी भटकंती करावी लागते़ मात्र सध्या कुठेही खत उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले होते. यामुळे बांधावर खत योजनेचा येथे पुरता फज्जा उडाला असुन दुकानात नाही तर बांधावर कुठुन येईल अशी स्थिती होती़ आडातच नाही तर पोहºयात कुठुन येईल असे म्हणण्याची वेळ शेतकºयांवर आली होती़ मात्र लोकमतच्या वृत्तानंतर शेतकºयांना खत उपलब्ध झाले आहे़ दोंडाईचा येथील दुकानातून शेतकºयांनी खत घ्यावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे़आॅनलाईन नोंदणीचे काय झाले?कृषी विभागाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका लिंकवर बियाणे व खतांची बुकिंग करण्याचे आवाहन केले होते. शेतकºयांनी प्रतिसाद देत नोंदणी केली होती़ मात्र या नोंदणीचे पुढे काय झाले हे त्या शेतकºयांना देखील माहित नसल्यामुळे प्रशासनाने शेतकºयांची फसगत असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे.

टॅग्स :Dhuleधुळे