शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

दोंडाईचात युरीयाच्या दोनशे बॅग उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 21:54 IST

दिलासा। मालपूर परिसरातील शेतकऱ्यांना होती खताची प्रतिक्षा

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपून शिवारातील शेतकऱ्यांना गेल्या महिन्यापासून युरिया खताची टंचाई भासत होती़ दरम्यान, कृषी विभागाने युरीया खताच्या २०० बॅग उपलब्ध करुन दिल्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़मालपूर येथील शेतकरी दोंडाईचा येथे हातात पैसे घेवुन वणवण भटकत होते. परंतु युरीया खत मिळत नव्हते़ त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भिती शेतकºयांना होती़ यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित शेतकºयांची व्यथा मांडली होती़ तसेच तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे यांच्याकडे सतत पाठपुरावा देखील केला होता़ या वृत्ताची कृषी विभागाने दखल घेत दोंडाईचा येथील एका कृषी दुकानात दोनशे बॅग युरीया खतांचा पुरवठा करण्यात आला़़ खताच्या किमतीवर देखील कृषी विभागाने नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे़मालपूरसह परीसरात शेती हाच मुख्य व्यवसाय असून शेतीच्या उत्पन्नावरच येथील अर्थचक्र अवलंबून आहे़ यामुळे पिकांची देखभाल व योग्य वेळी खत व्यवस्थापन खुप महत्वाचे आहे. मात्र हातात पैसे घेवुन येथील शेतकरी वणवण फिरतांना दिसुन येत होते. परंतु खत उपलब्ध होत नव्हते़गरज नसताना खते उपलब्ध होत असतात मात्र गरजेवेळी का नाही. येथे सध्या गेल्या महिनाभरापासून खतांचा साठा संपल्याचे दुकानदार सांगत होते़ तर काही दुकानदार युरिया खताबरोबर अन्य अनावश्यक खतांचा लिंक पध्दतीने विक्री करत असल्याची चर्चा शेतकºयांमध्ये होती़ या विषयी कृषी विभागाशी संपर्क केल्यावर देखील शेतकºयांचे समाधान होईल असा प्रतिसाद मिळत नव्हता़मालपूर येथे युरियासह अन्य खतांची नेहमीच टंचाई जाणवत असते. मागेल ते बियाणे व पाहिजे तेवढे खत हा शेतकºयांचा अधिकार आहे़ परंतु कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा भावाने खतांची विक्री करण्याचा प्रकार दरवर्षी घडतो़ कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याने शेतकरी नाडला जातो़ येथील बागायती कापुस व कोरडवाहू कापुस या दोघांना खत व्यवस्थापन करणे आवश्यक असते़ शेतकºयांना खतासाठी दोंडाईचा, शहादा, नंदुरबार अशी भटकंती करावी लागते़ मात्र सध्या कुठेही खत उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले होते. यामुळे बांधावर खत योजनेचा येथे पुरता फज्जा उडाला असुन दुकानात नाही तर बांधावर कुठुन येईल अशी स्थिती होती़ आडातच नाही तर पोहºयात कुठुन येईल असे म्हणण्याची वेळ शेतकºयांवर आली होती़ मात्र लोकमतच्या वृत्तानंतर शेतकºयांना खत उपलब्ध झाले आहे़ दोंडाईचा येथील दुकानातून शेतकºयांनी खत घ्यावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे़आॅनलाईन नोंदणीचे काय झाले?कृषी विभागाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका लिंकवर बियाणे व खतांची बुकिंग करण्याचे आवाहन केले होते. शेतकºयांनी प्रतिसाद देत नोंदणी केली होती़ मात्र या नोंदणीचे पुढे काय झाले हे त्या शेतकºयांना देखील माहित नसल्यामुळे प्रशासनाने शेतकºयांची फसगत असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे.

टॅग्स :Dhuleधुळे