शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

कुकरमुंडा येथील हनुमानाची मूर्ती तुलसीदासांनी दिलेला प्रासादिक ठेवा

By admin | Updated: April 11, 2017 15:34 IST

कुकरमुंडा येथील राममंदिर संस्थानात तुलसीदासांनी हनुमान मूर्ती भेट दिली होती़ हा भक्तीचा ठेवा आजही अत्यंत चांगल्या स्थितीत आह़े

 400 वर्षाची परंपरा : महाराष्ट्र व गुजराथ राज्यातील भाविकांचे नाते होतेय बळकट 

नंदुरबार,दि.11- रामचरितमानस, दोहावली आणि हनुमान चालिसा यासारख्या साहित्याची रचना करणा:या संत तुलसीदास यांचा आणखी एक ठेवा नंदुरबार जिल्ह्यापासून काही अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील कुकरमुडा येथे आजही अबाधित आह़े कुकरमुंडा येथील राममंदिर संस्थानात तुलसीदासांनी हनुमान मूर्ती भेट दिली होती़ हा भक्तीचा ठेवा आजही अत्यंत चांगल्या स्थितीत आह़े  
गुजरात राज्यातील कुकरमुंडा हे गाव संत खंडोजी  महाराजांचे समाधीस्थळ म्हणून सर्वश्रुत आह़े गुजरात आणि खान्देशात वैैष्णवांचे श्रद्धास्थान म्हणूनही खंडोजी महाराजांचे नाव घेतले जात़े याच खंडोजी महाराजांच्या कुकरमुंडा या गावी, साधारण 400 वर्षापूर्वी निवास करणारे संत जसवंत स्वामी हे काशी येथे गेले असता, त्याठिकाणी त्यांची आणि संत तुलसीदास यांची भेट झाली़ या भेटीदरम्यान दोघांमध्ये ब:याच विषयांवर चर्चा झाली़ संत जसवंत स्वामी यांच्या ज्ञानापासून प्रभावित होऊन, त्यांना तुलसीदास यांनी धातूची दोन फूटांची हनुमानाची प्रासादिक मूर्ती भेट म्हणून दिली़ ही मूर्ती कुंकरमुंडा येथील राममंदिर संस्थानात आजही जशीच्या तशी आह़े काळ्या पाषाणातील रामाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होणारी ही मूर्ती भाविकांना अनेक मार्गातून वाट दाखवणारी असल्याची धारणा येथील भाविकांची आह़े गुजरात राज्यातील भाविकांसह महाराष्ट्रातील भाविक राम मंदिरात दर्शनासाठी जातात़ 
कुकरमुंडा येथील ज्येष्ठ नागरिक उमेश शहा यांच्यासोबत यावेळी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, हनुमान जयंतीपेक्षा रामनवमीला याठिकाणी मोठा कार्यक्रम होतो़ रात्रभर तुलसीदासांची विविध पदे गायली जातात़ या पदांच्या दरम्यान लंकादहनाचा सजीव आरास सादर केला जातो़ संस्थानातील जांभळाच्या झाडाला चिंध्या बांधून हनुमानाचा वेश धारण करणा:याकडून हे झाड पेटवत असल्याचा देखावा अनुभवण्यासाठी दोन्ही राज्यातील शेकडो भाविक याठिकाणी दाखल होतात़ 
मूर्तीबाबत अनेक अख्यायिका प्रसिद्ध 
कुकरमुंडा येथील राममंदिरातील हनुमान मूर्तीबाबत एक अख्यायिका प्रसिद्ध आह़े ही अख्यायिका म्हणजे साधारण 100 वर्षापूर्वी कुकरमुंडा गावालगत वाहणा:या तापीनदीला मोठा पूर आला होता़ या पुराचे पाणी गावार्पयत आले होत़े हे पाणी कमी व्हावे म्हणून, नदीकाठावर हनुमानाची मूर्ती ठेवण्या आली़ ही मूर्ती रात्रभर याठिकाणी ठेवल्यानंतर पाणी कमी झाल़े काही दिवसांनी मात्र मूर्तीच्या बेंबीतून पाणी पाझरत असल्याचे दिसून आल़े अनेक वर्ष हे पाणी असेच निघत असल्याचे सांगितले जात़े 
कुकरमुंडा येथील खंडोजी महाराज संस्थानाचे गादीपती ह़भ़प उद्धव महाराज यांना याबाब माहिती विचारली असता, त्यांनी सांगितले की, हा एक अनोखा ठेवा आह़े संत जसवंत स्वामी यांच्या भक्ती आणि ज्ञानाला साद देत तुलसीदासांनी ही भेट दिली होती़ यामुळे दोन प्रांतातील नाते अधिक बळकट झाले होत़े