शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
4
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
5
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
6
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
7
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
8
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
9
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
10
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
11
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
12
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
13
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
14
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
15
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
16
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
17
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
18
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

आदिवासी समाजाचा मोर्चा

By admin | Updated: April 28, 2017 00:53 IST

आदिवासी क्रांती मोर्चा समिती : जिल्हाधिका:यांना निवेदन

धुळे : आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कासाठी व समाजावर होणारे अन्याय थांबविण्याच्या मागणीसाठी  आदिवासी क्रांती मोर्चा समितीच्या वतीने गुरुवारी दुपारी शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देण्यात आले.शासनाच्या आदिवासी समाजाबद्दलच्या उदासीनतेकडेही या माध्यमातून लक्ष्य वेधण्यात आले. शासनाने अॅट्रॉसिटी कायद्याची योग्य ती अंमलबजावणी करावी, आदिवासी विद्याथ्र्याना त्यांच्या शिक्षणाचा योग्य हक्क मिळावा. महिलांवर व मुलींवर होणारे शारीरिक व मानसिक अत्याचार थांबावेत, स्वातंत्र्यापासून आदिवासी समाजाच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. साक्री तालुक्यातील शेवडीपाडा येथील सामूहिक अत्याचार, दोंडाईचा येथील सात वर्षीय मुलीवर झालेला अन्याय-अत्याचार घटनेतील नराधमांना भरचौकात फाशी द्यावी, आदिवासी आरक्षणावर बोगस आदिवासींनी नोक:या बळकावल्या आहेत. अशा लोकांची चौकशी करून त्यांनी घेतलेल्या वेतनाची वसुली करावी. आदिवासींच्या दफनभूमीसाठी शासनाकडून जागा उपलब्ध करून देण्यात यावी, आदिवासींना मासेमारीसाठी पाझर तलाव, धरणे, गावतलाव देण्यात यावे, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्राचे एकत्रीकरण करून स्वतंत्र आदिवासी भिलीस्थान राज्य निर्मिती करावी.     रानमळा येथील समस्या सोडवाधुळे तालुक्यातील मौजे रानमळा येथील आदिवासी भिल्ल समाज गेल्या शंभर वर्षापूर्वीपासून गायरान गावठाण जमिनीवर झोपडय़ा बांधून राहत आहे. काही लोक जबरदस्तीने यावर ताबा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही जागा त्वरित आदिवासींच्या नावावर करावी, अशीही मागणी करण्यात आली. मोर्चामध्ये अशोक धुलकर, डोंगर बागुल, जीवन चव्हाण, संजय मरसाळे, दीना उघाडे, संदीप पाटोळे, दिनेश आटोळे, जयसिंग ठाकरे, सुभाष मोरे व आदिवासी बांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.