शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

वाहतूक सप्ताहातही कोंडी मात्र कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST

शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी प्रमुख चौकांत वाहतूक सिग्नल बसवावेत अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अखेर ही मान्य होत, ...

शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी प्रमुख चौकांत वाहतूक सिग्नल बसवावेत अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अखेर ही मान्य होत, फक्त कमलाबाई चौकात नवीन वाहतूक सिग्नल बसविण्यात आले. मात्र, रस्ता सुरक्षा अभियानाच्या कालावधीत अद्यापही ते सुरू झालेले नाहीत.

शहरातील बारा पत्थर रोडवर सारखी वाहतुकीची वर्दळ असते. या ठिकाणी चाळीसगा, अमळनेरकडून येणाऱ्या बसगाड्या, तसेच मालेगावकडून येणारी वाहने, त्याचबरोबर दुचाकी वाहनांची सारखी वर्दळ असते. त्यातच याच ठिकाणी भंगार बाजार आहे. लोखंड घेऊन या बाजारात एखादे मोठे अवजड वाहन आले की वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे वाहनांच्या लांबलकच रांगा लागतात. त्यातच दुचाकीस्वार मध्येच वाहने टाकत असल्याने, वाहतुकीच्या कोंडीत अधिक भर पडत असते. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा किरकोळ विक्रेत्यांनी ठाण मांडलेले असल्याने, अरुंद रस्ता अधिकच अरुंद होतो. अशा रस्त्यावरून वाहन नेताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. एवढी कठीण परिस्थिती असताना या ठिकाणी ना वाहतूक सिग्नलची व्यवस्था आहे, ना वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्यात आलेली आहे. वाहनधारकच कसे तरी वाहन काढून कोंडीतून मार्ग काढत असतात.

हीच परिस्थिती शहरातील इतर वर्दळीच्या चौकातही कायम आहे. शहरातील ठरावीक दोन-चार चौक सोडले तर कुठेही वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली नाही की, स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नाही. वाहनधारकांना ‘राम भरोसे’वाहने चालवावे लागतात.

रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असताना किमान या अभियानाच्या कालावधीत शहरातील वर्दळीच्या चौकात सुरळीत व सुलभ वाहतूक होईल या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे, अन्यथा शासकीय सभागृहात रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन होत राहील; मात्र रस्त्यावरची कोंडी कायम राहील हे चित्र बदलणे गरजेचे असल्याचे मत वाहनधारक व्यक्त करीत आहेत.