शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

वाहतूक सप्ताहातही कोंडी मात्र कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST

शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी प्रमुख चौकांत वाहतूक सिग्नल बसवावेत अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अखेर ही मान्य होत, ...

शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी प्रमुख चौकांत वाहतूक सिग्नल बसवावेत अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अखेर ही मान्य होत, फक्त कमलाबाई चौकात नवीन वाहतूक सिग्नल बसविण्यात आले. मात्र, रस्ता सुरक्षा अभियानाच्या कालावधीत अद्यापही ते सुरू झालेले नाहीत.

शहरातील बारा पत्थर रोडवर सारखी वाहतुकीची वर्दळ असते. या ठिकाणी चाळीसगा, अमळनेरकडून येणाऱ्या बसगाड्या, तसेच मालेगावकडून येणारी वाहने, त्याचबरोबर दुचाकी वाहनांची सारखी वर्दळ असते. त्यातच याच ठिकाणी भंगार बाजार आहे. लोखंड घेऊन या बाजारात एखादे मोठे अवजड वाहन आले की वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे वाहनांच्या लांबलकच रांगा लागतात. त्यातच दुचाकीस्वार मध्येच वाहने टाकत असल्याने, वाहतुकीच्या कोंडीत अधिक भर पडत असते. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा किरकोळ विक्रेत्यांनी ठाण मांडलेले असल्याने, अरुंद रस्ता अधिकच अरुंद होतो. अशा रस्त्यावरून वाहन नेताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. एवढी कठीण परिस्थिती असताना या ठिकाणी ना वाहतूक सिग्नलची व्यवस्था आहे, ना वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्यात आलेली आहे. वाहनधारकच कसे तरी वाहन काढून कोंडीतून मार्ग काढत असतात.

हीच परिस्थिती शहरातील इतर वर्दळीच्या चौकातही कायम आहे. शहरातील ठरावीक दोन-चार चौक सोडले तर कुठेही वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली नाही की, स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नाही. वाहनधारकांना ‘राम भरोसे’वाहने चालवावे लागतात.

रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असताना किमान या अभियानाच्या कालावधीत शहरातील वर्दळीच्या चौकात सुरळीत व सुलभ वाहतूक होईल या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे, अन्यथा शासकीय सभागृहात रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन होत राहील; मात्र रस्त्यावरची कोंडी कायम राहील हे चित्र बदलणे गरजेचे असल्याचे मत वाहनधारक व्यक्त करीत आहेत.