शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

वाहतूक सप्ताहातही कोंडी मात्र कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST

शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी प्रमुख चौकांत वाहतूक सिग्नल बसवावेत अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अखेर ही मान्य होत, ...

शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी प्रमुख चौकांत वाहतूक सिग्नल बसवावेत अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अखेर ही मान्य होत, फक्त कमलाबाई चौकात नवीन वाहतूक सिग्नल बसविण्यात आले. मात्र, रस्ता सुरक्षा अभियानाच्या कालावधीत अद्यापही ते सुरू झालेले नाहीत.

शहरातील बारा पत्थर रोडवर सारखी वाहतुकीची वर्दळ असते. या ठिकाणी चाळीसगा, अमळनेरकडून येणाऱ्या बसगाड्या, तसेच मालेगावकडून येणारी वाहने, त्याचबरोबर दुचाकी वाहनांची सारखी वर्दळ असते. त्यातच याच ठिकाणी भंगार बाजार आहे. लोखंड घेऊन या बाजारात एखादे मोठे अवजड वाहन आले की वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे वाहनांच्या लांबलकच रांगा लागतात. त्यातच दुचाकीस्वार मध्येच वाहने टाकत असल्याने, वाहतुकीच्या कोंडीत अधिक भर पडत असते. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा किरकोळ विक्रेत्यांनी ठाण मांडलेले असल्याने, अरुंद रस्ता अधिकच अरुंद होतो. अशा रस्त्यावरून वाहन नेताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. एवढी कठीण परिस्थिती असताना या ठिकाणी ना वाहतूक सिग्नलची व्यवस्था आहे, ना वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्यात आलेली आहे. वाहनधारकच कसे तरी वाहन काढून कोंडीतून मार्ग काढत असतात.

हीच परिस्थिती शहरातील इतर वर्दळीच्या चौकातही कायम आहे. शहरातील ठरावीक दोन-चार चौक सोडले तर कुठेही वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली नाही की, स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नाही. वाहनधारकांना ‘राम भरोसे’वाहने चालवावे लागतात.

रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असताना किमान या अभियानाच्या कालावधीत शहरातील वर्दळीच्या चौकात सुरळीत व सुलभ वाहतूक होईल या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे, अन्यथा शासकीय सभागृहात रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन होत राहील; मात्र रस्त्यावरची कोंडी कायम राहील हे चित्र बदलणे गरजेचे असल्याचे मत वाहनधारक व्यक्त करीत आहेत.