शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

मालपूरसह परिसरात यंदा ओल्या दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 22:07 IST

बळीराजा हवालदिल : सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून पिके वाया जाण्याची भीती

मालपूर : मालपूरसह संपूर्ण शिंदखेडा तालुक्यावर यावर्षी देखील दुष्काळाचे सावट कायम आहे. मात्र, कोरड्या दुष्काळाऐवजी यंदा ओल्या दुष्काळाची भिती शेतकऱ्यांना सतावत आहे. डोंगर दºयातून पाणी पाझरत असल्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली येत आहे. तसेच दररोज पावसाची हजेरी लागत असल्यामुळे बाजरी, ज्वारी, मका हे संपूर्ण पिकच वाया जाण्याची भिती व्यक्त होत आहे.शिंदखेडा तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक यावर्षी देखील कायम राहिल. मात्र, कोरडा ऐवजी ओला दुष्काळाचा सामना करावा लागेल, अशी मालपूरसह तालुक्यातील शेतकºयांमध्ये भीती व्यक्त होत आहे.मृग, आर्द्रा हे पाण्याचे नक्षत्र सुरुवातीला कोरडे गेल्यामुळे आणि गेल्या तीन-चार वर्षाचा अनुभव लक्षात घेता पोळा सणानंतर पाऊस होत नसल्यामुळे येथील शेतकºयांनी कमी पाण्यात येणारे बाजरी, ज्वारी, मका, मुग आदी पिकांना पसंती देऊन शेतशिवारात पेरा केला. मात्र, पेरलेला दाणा भरलेले कणिस घेऊन आला असताना येथे दररोज पाऊस होत असल्यामुळे ही संपूर्ण पिकेच वाया गेल्यात जमा होत आहेत. म्हणून येथे ओल्या दुष्काळाची भिती निर्माण झाली आहे.बाजरी, पिक कणसात दाणा भरुन तयार झाले आहे. पावसाची उघडीप होताच या हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र, सायंकाळी पावसासह जोरदार वारा येत असल्यामुळे हे पीक आडवे पडून नष्ट होतांना दिसून येत आहे. काही शेतात जमिनीवर पाणी असल्यामुळे ते मुळासकट वर येत असल्यामुळे पाऊस असाच होत राहिल्यास एक दाणा देखील शेतकºयांच्या हाती लागणार नाही.जास्त पाण्यामुळे तसेच पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे ज्वारी व मका पिकावर अळ्यांचा प्रादुर्भावर होताना दिसून येत आहे. शेतातील पाणी आटत नाही तोपर्यंत दुसरे पाणी येथे जमा होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. एवढा पाऊस होऊनही शेती उत्पादनात यावर्षी घट होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. तयार झालेल्या कणसांवर नाकतोंड्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत आहे.यामुळे अळ्या कणसातील दाणा खाऊन भुणके शिल्लक ठेवत असल्याचे दिसत आहे. या मोठ्या पिकात किटकनाशकांची फवारणी करणे शक्य नसल्यामुळे यावर्षी कोरडा ऐवजी ओला दुष्काळाला सामोरे जावे लागेल, अशी चिंता शेतकºयांना लागली आहे. जास्त पावसामुळे कापूस पिकाचेही नुकसान होत आहे. पावसामुळे कापसाचे जे बोंड परिपक्व झाले आहेत त्यांनाही किड लागून नष्ट होतांना दिसून येत आहे. शेतात पाणीच पाणी जमा होत आहे. विहिरी ओसंडून वाहू लागल्या आहेत.आता उत्तरा नक्षत्र सुरु असून या नक्षत्रात जोरदार व थंड पाऊस होत असतो. या पावसामुळे आता बाजरी, ज्वारीचा चारा देखील गुरांना शिल्लक राहणार नसून हे सर्व ओला दुष्काळाची चिन्हे दिसत आहेत.दरम्यान, शेतकरी जयसिंग गोजेसिंग गिरासे यांनी सांगितले की, २५ वर्षात असा पाऊस पाहिला नाही. असाच पाऊस सुरु राहिल्यास बाजरी, ज्वारीचा दाणा देखील घरात येणार नाही. यावर्षी कोरड्या ऐवजी ओल्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे