शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
3
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
4
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
5
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
6
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
7
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
8
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
9
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
10
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
11
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
12
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
13
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
14
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
15
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
16
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
17
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
18
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
19
टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान
Daily Top 2Weekly Top 5

मालपूरसह परिसरात यंदा ओल्या दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 22:07 IST

बळीराजा हवालदिल : सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून पिके वाया जाण्याची भीती

मालपूर : मालपूरसह संपूर्ण शिंदखेडा तालुक्यावर यावर्षी देखील दुष्काळाचे सावट कायम आहे. मात्र, कोरड्या दुष्काळाऐवजी यंदा ओल्या दुष्काळाची भिती शेतकऱ्यांना सतावत आहे. डोंगर दºयातून पाणी पाझरत असल्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली येत आहे. तसेच दररोज पावसाची हजेरी लागत असल्यामुळे बाजरी, ज्वारी, मका हे संपूर्ण पिकच वाया जाण्याची भिती व्यक्त होत आहे.शिंदखेडा तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक यावर्षी देखील कायम राहिल. मात्र, कोरडा ऐवजी ओला दुष्काळाचा सामना करावा लागेल, अशी मालपूरसह तालुक्यातील शेतकºयांमध्ये भीती व्यक्त होत आहे.मृग, आर्द्रा हे पाण्याचे नक्षत्र सुरुवातीला कोरडे गेल्यामुळे आणि गेल्या तीन-चार वर्षाचा अनुभव लक्षात घेता पोळा सणानंतर पाऊस होत नसल्यामुळे येथील शेतकºयांनी कमी पाण्यात येणारे बाजरी, ज्वारी, मका, मुग आदी पिकांना पसंती देऊन शेतशिवारात पेरा केला. मात्र, पेरलेला दाणा भरलेले कणिस घेऊन आला असताना येथे दररोज पाऊस होत असल्यामुळे ही संपूर्ण पिकेच वाया गेल्यात जमा होत आहेत. म्हणून येथे ओल्या दुष्काळाची भिती निर्माण झाली आहे.बाजरी, पिक कणसात दाणा भरुन तयार झाले आहे. पावसाची उघडीप होताच या हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र, सायंकाळी पावसासह जोरदार वारा येत असल्यामुळे हे पीक आडवे पडून नष्ट होतांना दिसून येत आहे. काही शेतात जमिनीवर पाणी असल्यामुळे ते मुळासकट वर येत असल्यामुळे पाऊस असाच होत राहिल्यास एक दाणा देखील शेतकºयांच्या हाती लागणार नाही.जास्त पाण्यामुळे तसेच पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे ज्वारी व मका पिकावर अळ्यांचा प्रादुर्भावर होताना दिसून येत आहे. शेतातील पाणी आटत नाही तोपर्यंत दुसरे पाणी येथे जमा होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. एवढा पाऊस होऊनही शेती उत्पादनात यावर्षी घट होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. तयार झालेल्या कणसांवर नाकतोंड्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत आहे.यामुळे अळ्या कणसातील दाणा खाऊन भुणके शिल्लक ठेवत असल्याचे दिसत आहे. या मोठ्या पिकात किटकनाशकांची फवारणी करणे शक्य नसल्यामुळे यावर्षी कोरडा ऐवजी ओला दुष्काळाला सामोरे जावे लागेल, अशी चिंता शेतकºयांना लागली आहे. जास्त पावसामुळे कापूस पिकाचेही नुकसान होत आहे. पावसामुळे कापसाचे जे बोंड परिपक्व झाले आहेत त्यांनाही किड लागून नष्ट होतांना दिसून येत आहे. शेतात पाणीच पाणी जमा होत आहे. विहिरी ओसंडून वाहू लागल्या आहेत.आता उत्तरा नक्षत्र सुरु असून या नक्षत्रात जोरदार व थंड पाऊस होत असतो. या पावसामुळे आता बाजरी, ज्वारीचा चारा देखील गुरांना शिल्लक राहणार नसून हे सर्व ओला दुष्काळाची चिन्हे दिसत आहेत.दरम्यान, शेतकरी जयसिंग गोजेसिंग गिरासे यांनी सांगितले की, २५ वर्षात असा पाऊस पाहिला नाही. असाच पाऊस सुरु राहिल्यास बाजरी, ज्वारीचा दाणा देखील घरात येणार नाही. यावर्षी कोरड्या ऐवजी ओल्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे