शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

पिण्याच्या पाण्यासाठी तिसगावला पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 21:35 IST

गुरांच्या पाण्यासाठी विकतचा टॅँकर : दोन कि.मी. अंतरावरून महिला आणतात हंडा-कळशीतून पाणी

प्रदीप पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कतिसगाव ढंढाणे : गेल्या वर्षी पुरेशा पावसाअभावी येथील परिसरात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. तर गुरांसाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून रोज टॅँकरने पाणी मागवावे लागते, अशी कैफीयत पशुपालक व्यक्त करत आहेत. मार्च महिन्यापासून ही परिस्थिती निर्माण झाली असून दिवसेंदिवस परिस्थिती आणखी बिकट होत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.नगाव ग्रुप ग्रामपंचायतींतर्गत तिसगाव हे सुमारे हजार-अकराशे लोकवस्तीचे गाव असून तेथे सर्व धर्म व समाजाची कुटुंबे आहेत. लहान-मोठी १८५ घरे तसेच अतिक्रमित शे-सव्वाशे घरांची लोकवस्ती आहे. त्यांच्यासाठी ७० ते ८० नळकनेक्शन देण्यात आले आहेत. त्यापैकी अर्धे तिसगाव व संपूर्ण आदिवासी, दलित वस्तीत सध्या पाणी पुरवठा केला जात आहे. बाकी उर्वरीत अर्धे गाव खाजगी विहिरीवरून पाणी भरतात. त्यासाठी स्वखर्चाने वीज पंपाद्वारे आपापल्या घरी पाणी नेतात. सध्या तीव्र उन्हामुळे विहिरीची पातळी खोल गेली असून एकाचवेळी सर्वांना पाणी मिळत नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वांना वीज पंप सुरू करून पाणी भरावे लागते. त्यामुळे दिवस-रात्र कोणाला तरी वीज पंप सुरूच ठेवावे लागतात. तेव्हा कुठे पिण्यापुरते पाणी उपलब्ध होते.दुधाळ जनावरांसाठी पशुपालक शेतकऱ्यांकडून प्रयत्नग्रामस्थांसोबत जनावरांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. कोणाकडूनही प्रयत्न होत नसल्याचे पाहून दुग्धोत्पादन व्यवसाय करणाºया शेतकऱ्यांनी आपापल्या दुधाळ जनावरांसाठी टॅँकर मागवून पाण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येकाला त्यासाठी वेगळी तजवीज करावी लागत असून त्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जात आहेत. कोणी टॅँकरने पाणी आणतो, कुणी बैलगाडीद्वारे टाक्यांमधून पाणी आणतो. लहान-मोठ्या जनावरांची संख्या सुमारे हजार-बाराशेपर्यंत आहे. एवढ्या जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था हवी, अशी अपेक्षा व्यक्त होते.गावापासून अर्धा कि.मी. अंतरावर टकाºया वस्ती असून तेथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. सध्या तेथे चार दिवसाआड पाणी मिळते. ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी वादाचे प्रसंग ओढवतात.बंधाºयांच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्षगावाजवळून वाहणाºया भात नदीवरील दोन बंधारे नादुरुस्त असल्याने त्यात पाणीसाठा होत नाही. जि.प.लघुसिंचन विभागाकडे पाठपुरावा करूनही हा विभाग दुरुस्ती करत नसल्यानेही ग्रामस्थांमध्ये संताप आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे बंधारे आहे त्याच स्थितीत आहेत. त्यांची दुरुस्ती झाल्यास गावासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच परिसरातील विहिरींची पातळीही वाढणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे