शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

कोरोनामुळे चोरटेही घरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:45 IST

सन २०२० च्या एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग धुळे जिल्ह्यात सुरू झाला. तत्पूर्वी कठोर लाॅकडाऊन जाहीर झाले आणि सलग तीन ...

सन २०२० च्या एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग धुळे जिल्ह्यात सुरू झाला. तत्पूर्वी कठोर लाॅकडाऊन जाहीर झाले आणि सलग तीन महिने संपूर्ण देश ठप्प होता. कोरोना आणि लाॅकडाऊनने ग्रासलेल्या या वर्षात चोरीच्या ३३४ गुन्ह्यांची नोंद जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये झाली. सन २०१९ मध्ये चोरीच्या तब्बल ५१७ घटना घडल्या होत्या. या वर्षाच्या तुलनेत गेल्यावर्षी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये १८३ गुन्ह्यांची घट झाली आहे. तसेच चोरीचे गुन्हेही कमी झाले आहेत.

मागील दोन्ही वर्षांच्या तुलनेत यावर्षी चोरीचे प्रमाण कमी आहे. चार महिन्यांत केवळ १६ चोऱ्या झाल्याची नोंद पोलिसदफ्तरी आहे. एका वर्षाच्या तुलनेत हा आकडा समाधानकारक असला तरी भविष्यात काय घडेल ते सांगता येत नाही.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. बाधित रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाणदेखील जास्त आहे. अशा परिस्थितीत आणखी १५ दिवस निर्बंध वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने सलग महिनाभर दुकाने बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू असली तरी बाजार मात्र ठप्प आहे. त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आवक घटली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या धास्तीने चोरदेखील जीव मुठीत धरून बसले असले तरी काही प्रमाणात चोऱ्या मात्र होतच आहेत. मोटारसायकल चोरींचे सत्र सुरूच आहे. पोलीस यंत्रणा कोरोनाच्या कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेण्याचे प्रकार चोरटे करू शकतात. त्यामुळे पोलिसांना हे दुहेरी आव्हानदेखील पेलावे लागणार आहे.

बलात्कारही वाढले

कोरोनाचा संसर्ग आणि लाॅकडाऊनमध्ये बलात्काराच्या घटनादेखील वाढल्या आहेत. गेल्या चार महिन्यांत बलात्काराच्या ९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. शिवाय मुली पळविण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

खुनाच्या घटना वाढल्या

या काळात बेरोजगारी आणि रिकामटेकड्यांचे प्रमाण वाढले असून अवैध धंदेही वाढले आहेत. त्यातून निर्माण होणाऱ्या कलहामुळे खुनाच्या घटना वाढल्या आहेत. अवघ्या चार महिन्यांत जिल्ह्यात ८ खून झाले आहेत.